Kandivali fire news : कांदिवलीतील इमारतीला भीषण आग; दोघांचा मृत्यू तर तीन जण जखमी

  229

मृतांमध्ये आठ वर्षांच्या चिमुकल्याचा समावेश


मुंबई : कांदिवली येथील महावीरनगर परिसरात वीणा संतूर इमारतीला भीषण आग (Kandivali fire news) लागली. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये आठ वर्षांच्या एका चिमुकल्याचाही समावेश आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल (Fire Brigade) ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्यात यश आले असून आगीचे कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.


कांदिवली येथील वीणा संतूर इमारतीच्या ग्राउंड प्लस पहिल्या मजल्यावर दुपारी बाराच्या सुमारास ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळ गाठून आग विझवण्याचा प्रयत्न केला. या आगीत अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. परंतु आगीमुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशी लागली, याचा स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक तपास करत आहेत.


या आगीत एका चिमुकल्यासह दोघांना आपला जीव गमवावा लागला तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ग्लोरी (४३ वर्षे), जोसू रॉबर्ट (८ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. तर लक्ष्मी बुरा (वय ४० वर्षे), राजेश्वरी भरतारे (२४ वर्षे), रंजन शाह (७६ वर्षे) अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर सरकारतर्फे उपचार करण्यात येणार आहेत.

Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही