Kandivali fire news : कांदिवलीतील इमारतीला भीषण आग; दोघांचा मृत्यू तर तीन जण जखमी

मृतांमध्ये आठ वर्षांच्या चिमुकल्याचा समावेश


मुंबई : कांदिवली येथील महावीरनगर परिसरात वीणा संतूर इमारतीला भीषण आग (Kandivali fire news) लागली. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये आठ वर्षांच्या एका चिमुकल्याचाही समावेश आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल (Fire Brigade) ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्यात यश आले असून आगीचे कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.


कांदिवली येथील वीणा संतूर इमारतीच्या ग्राउंड प्लस पहिल्या मजल्यावर दुपारी बाराच्या सुमारास ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळ गाठून आग विझवण्याचा प्रयत्न केला. या आगीत अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. परंतु आगीमुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशी लागली, याचा स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक तपास करत आहेत.


या आगीत एका चिमुकल्यासह दोघांना आपला जीव गमवावा लागला तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ग्लोरी (४३ वर्षे), जोसू रॉबर्ट (८ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. तर लक्ष्मी बुरा (वय ४० वर्षे), राजेश्वरी भरतारे (२४ वर्षे), रंजन शाह (७६ वर्षे) अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर सरकारतर्फे उपचार करण्यात येणार आहेत.

Comments
Add Comment

सलग सुट्ट्यांमुळे महामार्गांवर वाहतूक कोंडी; दृतगती मार्गासह, मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांचा खोळंबा

मुंबई : सलग सुट्ट्यामुळे रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गांवर शनिवारी दिवसभर वाहतूक कोंडी निर्माण झाली

भिवंडीमध्ये मानवतेला काळीमा; कॅन्सरशी झुंज देणाऱ्या पत्नीवर हुंड्यासाठी ......, पतीसह सात आरोपींवर गुन्हा

भिवंडी : कर्करोगाच्या चौथ्या टप्प्यात उपचार सुरू असताना एका महिलेवर हुंड्याच्या हव्यासापोटी अमानुष छळ

Mumbai Vileparle : मुंबईकरांच्या पार्ले-जीचा सुगंध आता कायमचा हरवणार! ८७ वर्षांचा पार्ले-जीचा कारखाना होणार जमीनदोस्त; नेमकं कारण काय ?

मुंबई : मुंबईच्या विलेपार्ले (पूर्व) परिसरातील ज्या कारखान्यामुळे या उपनगराला एक वेगळी ओळख मिळाली, तो पार्ले

77th Republic Day : ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, संविधानातील नियमांचा रोजच्या जीवनातील महत्व आणि ताकद जाणून घ्या

मुंबई : २६ जानेवारी हा दिवस भारताच्या लोकशाही प्रवासातील निर्णायक टप्पा मानला जातो. १९५० साली याच दिवशी भारतीय

युनेस्को दर्जाप्राप्त गडकिल्ल्यांची स्वच्छता आणि संवर्धन मोहीम

पर्यटन वाढीमुळे निर्माण झालेल्या कचऱ्यावर आळा मुंबई : युनेस्कोचा जागतिक वारसास्थळाचा दर्जा प्राप्त झालेल्या

प्रभाकर शिंदे ‘स्थायी’, तर खणकर सभागृह नेता?

मुंबई : मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेना महायुतीचा महापौर बसणार हे आता जवळपास निश्चित झाले असून तसे झाल्यास सभागृह