Kandivali fire news : कांदिवलीतील इमारतीला भीषण आग; दोघांचा मृत्यू तर तीन जण जखमी

  224

मृतांमध्ये आठ वर्षांच्या चिमुकल्याचा समावेश


मुंबई : कांदिवली येथील महावीरनगर परिसरात वीणा संतूर इमारतीला भीषण आग (Kandivali fire news) लागली. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये आठ वर्षांच्या एका चिमुकल्याचाही समावेश आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल (Fire Brigade) ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्यात यश आले असून आगीचे कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.


कांदिवली येथील वीणा संतूर इमारतीच्या ग्राउंड प्लस पहिल्या मजल्यावर दुपारी बाराच्या सुमारास ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळ गाठून आग विझवण्याचा प्रयत्न केला. या आगीत अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. परंतु आगीमुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशी लागली, याचा स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक तपास करत आहेत.


या आगीत एका चिमुकल्यासह दोघांना आपला जीव गमवावा लागला तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ग्लोरी (४३ वर्षे), जोसू रॉबर्ट (८ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. तर लक्ष्मी बुरा (वय ४० वर्षे), राजेश्वरी भरतारे (२४ वर्षे), रंजन शाह (७६ वर्षे) अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर सरकारतर्फे उपचार करण्यात येणार आहेत.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.