Navratri poems : काव्यरंग

  145

दसरा


चैतन्य उधळीत
दिवस उगवला हसरा
उत्सव आनंदाचा
घेऊन आला दसरा

रांगोळी शोभे अंगणी
झेंडूचे तोरण दारी
स्नेहभाव वाढवूनी
कटुता विसरूया सारी

आपट्याची पानं
सोनं म्हणून लुटूया
सुख-समाधान
एक दुसऱ्याला वाटूया

श्रीरामाचा आदर्श घेऊनी
अहंकाराचा करूया नाश
एकतेचा मंत्र जपूनी
तोडूया विषमतेचे पाश

आदराने नमस्कार करूनी
थोरांना देऊया मान
मराठी सणांचा
आम्हा सदा अभिमान

- रवींद्र व्ही. चालीकवार, महागाव, जि. यवतमाळ

नारीशक्तीला सलाम!!


नवरात्रीच्या नऊ नारी
आहेत लय भारी...

पहिला मान -
आपल्या हृदयी आईला
तिने शिकविले बोलायला...

दुसरा मान -
आपल्या क्रांतिज्योती सावित्री मातेला
तिने शिकविले लिहायला...

तिसरा मान -
आपल्या राष्ट्रमाता जिजाऊ मातेला
तिने शिकविले
न्याय करायला...

चौथा मान -
आपल्या त्यागमूर्ती
रमाई मातेला
तिने शिकविले त्यागातून प्रोत्साहन द्यायला...

पाचवा मान -
आपल्या राजमाता अहिल्यामातेला
तिने शिकविले समानतावादी राहायला...

सहावा मान -
आपल्या झाशीची
राणी लक्ष्मीमातेला
तिने शिकविले अत्याचाराशी लढायला...

सातवा मान -
आपल्या ऑफिस
बाॅस मॅडमला
तिने शिकविले
वेळेवर यायला...

आठवा मान -
आपल्या सर्व शेजारणींला
तिने शिकविले सहकार्य करायला...

आणि शेवटचा
नववा मान -
समस्त सर्व पत्नीवर्गाला
तिने शिकविले
तडजोड करायला...

~ विलास देवळेकर
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

रांगोळीचे किमयागार

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर गुणवंत मांजरेकर म्हणजे रांगोळीचे विद्यापीठ! अस्सल स्पष्टवक्ता मालवणी माणूस...! वरून कडक

बोल, बोल, बोल, जागेवाले की जय...

साक्षी माने  येत्या १६ ऑगस्टला देशभरात दहीहंडी उत्सव साजरा होईल, तेव्हा शहरातील सर्वात मोठी दहीहंडी फोडण्याचा

भांडण - बालपणाचे विरजण!

ओंजळ : पल्लवी अष्टेकर घर हे माणसाचे पहिले शिक्षणस्थान असते. घरात मिळालेला स्नेह, विश्वास, संवाद आणि प्रेमाची भाषा

गौरवशाली भारतीय शिल्पकला

विशेष : लता गुठे बदलत्या काळाबरोबर समाज बदलत असतो. त्याबरोबरच संस्कृती बदलते आणि संस्कृती बदलल्यामुळे समाजातील

“दिल मिले या न मिले...”

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे ताराचंद बडजात्यांचा १९६४ साली आलेला सिनेमा होता ‘दोस्ती’. त्या वर्षीच्या

सृष्टी निर्माता

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करण्यापूर्वी हे सर्व विश्व पाण्यात बुडालेले