Navratri poems : काव्यरंग

दसरा


चैतन्य उधळीत
दिवस उगवला हसरा
उत्सव आनंदाचा
घेऊन आला दसरा

रांगोळी शोभे अंगणी
झेंडूचे तोरण दारी
स्नेहभाव वाढवूनी
कटुता विसरूया सारी

आपट्याची पानं
सोनं म्हणून लुटूया
सुख-समाधान
एक दुसऱ्याला वाटूया

श्रीरामाचा आदर्श घेऊनी
अहंकाराचा करूया नाश
एकतेचा मंत्र जपूनी
तोडूया विषमतेचे पाश

आदराने नमस्कार करूनी
थोरांना देऊया मान
मराठी सणांचा
आम्हा सदा अभिमान

- रवींद्र व्ही. चालीकवार, महागाव, जि. यवतमाळ

नारीशक्तीला सलाम!!


नवरात्रीच्या नऊ नारी
आहेत लय भारी...

पहिला मान -
आपल्या हृदयी आईला
तिने शिकविले बोलायला...

दुसरा मान -
आपल्या क्रांतिज्योती सावित्री मातेला
तिने शिकविले लिहायला...

तिसरा मान -
आपल्या राष्ट्रमाता जिजाऊ मातेला
तिने शिकविले
न्याय करायला...

चौथा मान -
आपल्या त्यागमूर्ती
रमाई मातेला
तिने शिकविले त्यागातून प्रोत्साहन द्यायला...

पाचवा मान -
आपल्या राजमाता अहिल्यामातेला
तिने शिकविले समानतावादी राहायला...

सहावा मान -
आपल्या झाशीची
राणी लक्ष्मीमातेला
तिने शिकविले अत्याचाराशी लढायला...

सातवा मान -
आपल्या ऑफिस
बाॅस मॅडमला
तिने शिकविले
वेळेवर यायला...

आठवा मान -
आपल्या सर्व शेजारणींला
तिने शिकविले सहकार्य करायला...

आणि शेवटचा
नववा मान -
समस्त सर्व पत्नीवर्गाला
तिने शिकविले
तडजोड करायला...

~ विलास देवळेकर
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

समाजमाध्यमांच्या आहारी...

दखल : मंजिरी ढेरे अलीकडच्या काही महिन्यांमध्ये ऑस्ट्रेलियासारख्या देशांनी मुलांच्या ‌‘सोशल मीडिया‌’ वापरावर

जादू जेवर विमानतळाची

पैलू : अजय तिवारी नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हा एव्हिएशन क्षेत्रातील ‌‘आर्थिक गळती‌’ थांबवण्याचा लक्षवेधी

गावची जत्रा - आठवणींचा दरवळ

स्मृतीगंध : लता गुठे वेळ दुपारची, एसी गाडीतही जाणवणारं रणरणतं ऊन, डांबरी सडकेवर खेळणारं मृगजळ आणि रस्त्याच्या

‘उठो, हमारा सलाम ले लो’

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे ‘मुगले आझम’(१९६०)मध्ये दिलीपकुमार (सलीम उर्फ जहांगीर) आणि मधुबाला (अनारकली)

आम्ही चालवू हा पुढे वारसा...

स्पंदन : अश्विनी शिंदे - भोईर गावाचं गावपण राखून असलेलं बोर्डी हे डहाणू तालुक्यातील निसर्गरम्य गाव. भारत

ब्रह्मचर्य व गृहस्थ धर्म

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे भारतीय परंपरेत मानवी जीवन चार आश्रमात विभागले आहे. ब्रह्मचर्याश्रम,