Bigg Boss 17 : म्हणून अंकिता लोखंडे बिग बॉस १७ मध्ये आली!

Share

मुंबई : भारतीय मनोरंजन उद्योगातील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेने तिचा पती विकी जैन सोबत बिग बॉस १७ च्या (Bigg Boss 17) घरात प्रवेश करून चर्चेत आले आहेत. डिसेंबर २०२१ मध्ये लग्न करणारे हे जोडपे या सीझनमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या स्पर्धकांपैकी एक आहेत पण टीव्ही आणि चित्रपटांमधील यशस्वी कारकीर्दीनंतर अंकिता लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये का सामील झाली? तिने बिग बॉस मध्ये येण्याचा निर्णय का घेतला हे तिने स्वतःच स्पष्ट सांगितले आहे.

अंकिताने बिग बॉस १७ मध्ये सहभागी होण्याच्या तिच्या निर्णयामागील खरे कारण उघड केले. अंकिता म्हणते “मी बिग बॉस १७ शोमध्ये आले आहे कारण लोक मला अर्चना म्हणून ओळखतात, आता त्यांनी अंकिताला ओळखावे, माझी खरी ओळख अंकिता म्हणून व्हावी, अशी माझी इच्छा आहे. मी जशी आहे तसं मला लोकांनी स्वीकारावं असं मला वाटतं.”

अंकिता “पवित्र रिश्ता” मधल्या अर्चना देशमुखच्या तिच्या प्रतिष्ठित भूमिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहचली. अंकिताने २००९ ते २०२४ पर्यंत पाच वर्षे अर्चनाची भूमिका केली आणि तिच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कार मिळवले. अंकिता लोखंडे ही बिग बॉस १७ मधील सर्वात लोकप्रिय आणि प्रिय स्पर्धकांपैकी एक आहे. तिला तिच्या चाहत्यांकडून आणि इंडस्ट्रीतील मित्रांकडून खूप पाठिंबा मिळत आहे आणि कौतुक होत आहे. शोमध्ये तिच्या उपस्थितीने प्रेक्षक खऱ्या अंकिता लोखंडेला बघण्यासाठी उत्सुक आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

महाराष्ट्र लोक हक्क अधिनियम २०१५च्या कायद्याची १५ दिवसात होणार अंमलबजावणी

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी लागू करण्यात आलेले महाराष्ट्र लोक…

10 mins ago

तुम्ही Jio युजर्स आहात का? तर हे जरूर वाचा

मुंबई: रिलायन्स जिओने(reliance jio) आपल्या प्लानचे दर बदलले आहे. आजपासून नवे दर लागू झाले आहेत.…

22 mins ago

एलईडी मासेमारी पूर्णतः बंद करा; आमदार नितेश राणे विधानसभेत आक्रमक

मोठ्या रक्कमेचा दंड आणि शिक्षा होईल अशा पद्धतीचे कायदे अमलात आणा आमदार नितेश राणेंच्या मागणी…

53 mins ago

नार्वेकरांमुळेच काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचा होणार पराभव

शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांनी वर्तविले भाकीत मुंबई : ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची विधानपरिषद निवडणुकीसाठी…

1 hour ago

मुंबईमध्ये पावसाळी साथीच्या आजारांचा ‘टक्का’ घसरला

गेल्या वर्षीच्या जूनच्या तुलनेत यंदा निम्म्याहून कमी प्रकरणे मुंबई : गेल्या वर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत…

1 hour ago

कारभार सुधारा अन्यथा कारवाई करू – नितीन गडकरी

पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेबाबत पालघरचे खा.हेमंत सवरा यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन…

1 hour ago