सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या पहिल्या दिवशी चमकले जितेश शर्मा, रहाणे, गायकवाड

  86

नवी दिल्ली: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२३ची सुरूवात १६ ऑक्टोबरपासून झाली आहे. टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेत पहिल्याच दिवशी अनेक स्टार खेळाडूंनी शानदार कामगिरी केली.


पहिल्या दिवशी महाराष्ट्रासाठी खेळणाऱ्या ऋतुराज गायकवाडने ८० धावांची तडाखेबंद खेळी करत संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि विदर्भचा युवा विकेटकीपर जितेश शर्मा यांनी नाबाद राहत तुफान खेळी केली.



गायकवाडने महाराष्ट्राला मिळवून दिला विजय


बंगालविरुद्ध विजयासाठी १५९ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या महाराष्ट्राकडून गायकवाडने ४० बॉलमध्ये २०५च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना ८२ धावांची तडाखेबंद खेळी केली. यात ९ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश आहे. गायकवाडच्या शानदार खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने अवघ्या १४.२ षटकांत हे २ विकेट गमावत पूर्ण केले. या दरम्यान कर्णधार केदार जाधव २ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४० धावांवर नाबाद राहिला.



कर्णधार रहाणेची जबरदस्त खेळी


स्पर्धेत मुंबईची कमान सांभाळणाऱ्या अजिंक्य रहाणेने हरयाणाविरुद्धच्या सामन्यात १४८ धावांचा पाठलाग करताना ४३ बॉलमध्ये १७६.७६च्या स्ट्राईक रेटने नाबाद ७६ धावांची खेळी केली. यात ६ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे.पावसामुळे हा सामना १८ ओव्हरचा खेळवण्यात आला यात मुंबईने डकवर्थ लुईस नियमानुसार ८ विकेट राखत विजय मिळवला.

Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी