सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या पहिल्या दिवशी चमकले जितेश शर्मा, रहाणे, गायकवाड

नवी दिल्ली: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२३ची सुरूवात १६ ऑक्टोबरपासून झाली आहे. टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेत पहिल्याच दिवशी अनेक स्टार खेळाडूंनी शानदार कामगिरी केली.


पहिल्या दिवशी महाराष्ट्रासाठी खेळणाऱ्या ऋतुराज गायकवाडने ८० धावांची तडाखेबंद खेळी करत संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि विदर्भचा युवा विकेटकीपर जितेश शर्मा यांनी नाबाद राहत तुफान खेळी केली.



गायकवाडने महाराष्ट्राला मिळवून दिला विजय


बंगालविरुद्ध विजयासाठी १५९ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या महाराष्ट्राकडून गायकवाडने ४० बॉलमध्ये २०५च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना ८२ धावांची तडाखेबंद खेळी केली. यात ९ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश आहे. गायकवाडच्या शानदार खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने अवघ्या १४.२ षटकांत हे २ विकेट गमावत पूर्ण केले. या दरम्यान कर्णधार केदार जाधव २ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४० धावांवर नाबाद राहिला.



कर्णधार रहाणेची जबरदस्त खेळी


स्पर्धेत मुंबईची कमान सांभाळणाऱ्या अजिंक्य रहाणेने हरयाणाविरुद्धच्या सामन्यात १४८ धावांचा पाठलाग करताना ४३ बॉलमध्ये १७६.७६च्या स्ट्राईक रेटने नाबाद ७६ धावांची खेळी केली. यात ६ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे.पावसामुळे हा सामना १८ ओव्हरचा खेळवण्यात आला यात मुंबईने डकवर्थ लुईस नियमानुसार ८ विकेट राखत विजय मिळवला.

Comments
Add Comment

क्रिकेट विश्वात जेमिमाच्या मैत्रीचीच चर्चा!

वाईट काळामधून स्मृती मानधनाला बाहेर काढायला मदत नवी दिल्ली : मैत्रीण कशी असावी, याचे उत्तम उदाहरण जेमिमा

Rohit Sharma-Virat Kohli Vijay Hazare Trophy 2025-26 : रोहित-विराटचा पहिल्या सामन्यात शतकी धमाका! दुसऱ्या फेरीत कोणाशी भिडणार? जाणून घ्या वेळ, मैदान आणि लाइव्ह अपडेट्सची ए टू झेड माहिती

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या 'विराट-रोहित' नावाच्या वादळाने चाहत्यांना भुरळ घातली असून, विजय हजारे

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख