ही ICCची नाही तर BCCI ची स्पर्धा वाटतेय, पराभवानंतर भडकले मिकी आर्थर

नवी दिल्ली: भारताने विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धची आपली विजयी मालिका कायम राखली आहे. शनिवारी अहमदाबादमध्ये खेळवण्यात आलेल्या विश्वचषक २०२३मधील सामन्यात भारताने पाकिस्तानला ७ विकेटनी हरवले.


हा पराभव पाकिस्तान संघाचे डायरेक्टर मिकी आर्थर यांच्या पचनी पडलेला नाही. ते पराभवामुळे चांगलेच भडकलेत. त्यांनी या सामन्यानंतर बीसीसीआयवर जोरदार टीका केली आहे. मिकीने म्हटले की ही आयसीसीची स्पर्धा आहे असं वाटत नाही तर बीसीसीआयची स्पर्धा असल्यासारखे वाटते आहे.


पाकिस्तानी क्रिकेट संघाचे डायरेक्टर मिकी आर्थर म्हणाले, खरं सांगायचं तर भारत वि पाकिस्तान हा सामना आयसीसीची स्पर्धा असल्यासारखा वाटत नाही. से वाटते की ही द्वीपक्षीय मालिका सुरू आहे. बीसीसीआयची स्पर्धा असल्यासारखे वाटत आहे.


असे मानले जात होते की भारत आणि पाकिस्तान यांच्यात जोरदार टक्कर रंगेल मात्र असे झाले नाही. भारताने पाकिस्तानवर ७ विकेटनी एकतर्फी विजय मिळवला. जेव्हा मिकी आर्थरला विचारण्यात आले की विश्वचषकात पक्षपातपूर्ण माहोल असणे योग्य आहे आणि याला मंजुरी मिळायला हवी का? यावर त्यांनी सांगितले की मला नाही वाटतं की मी यावर काही कमेंट करायला हवी. मला स्वत:ला दंड लावून घ्यायचा नाही आहे.

Comments
Add Comment

सामन्याच्या अंतिम क्षणी केवळ बायबलच्या त्या ओळी म्हटल्या, विजयानंतर भावूक झाली जेमिमा

नवी मुंबई : ऑस्ट्रेलियाला महिला वर्ल्ड कपच्या सेमीफायनल सामन्यात धूळ चारल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्सच्या डोळ्यात

भारत वि ऑस्ट्रेलिया दुसरा टी-20 सामना मेलबर्नमध्ये रंगणार

कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न येथे खेळवला

IND W vs AUS W : भारतीय संघ दिमाखात फायनलमध्ये, ऑस्ट्रेलियाला केले चारीमुंड्या चीत, आता द. आफ्रिकेशी होणार लढत

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला वनडे वर्ल्डकपच्या सेमीफायनल सामन्यात भारताने बलाढ्य

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

कोहलीचा १८ नंबर घेऊन पंत मैदानात: सोशल मीडियावर व्हायरल फोटो!

आसाम : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागला. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात

WC Semifinal: स्मृती मंधानाच्या विकेटवरून वाद, मैदानावर उभे असलेले अंपायरही झाले हैराण

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी महिला क्रिकेट वनडे वर्ल्डकपचा सेमीफायनल