ही ICCची नाही तर BCCI ची स्पर्धा वाटतेय, पराभवानंतर भडकले मिकी आर्थर

नवी दिल्ली: भारताने विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धची आपली विजयी मालिका कायम राखली आहे. शनिवारी अहमदाबादमध्ये खेळवण्यात आलेल्या विश्वचषक २०२३मधील सामन्यात भारताने पाकिस्तानला ७ विकेटनी हरवले.


हा पराभव पाकिस्तान संघाचे डायरेक्टर मिकी आर्थर यांच्या पचनी पडलेला नाही. ते पराभवामुळे चांगलेच भडकलेत. त्यांनी या सामन्यानंतर बीसीसीआयवर जोरदार टीका केली आहे. मिकीने म्हटले की ही आयसीसीची स्पर्धा आहे असं वाटत नाही तर बीसीसीआयची स्पर्धा असल्यासारखे वाटते आहे.


पाकिस्तानी क्रिकेट संघाचे डायरेक्टर मिकी आर्थर म्हणाले, खरं सांगायचं तर भारत वि पाकिस्तान हा सामना आयसीसीची स्पर्धा असल्यासारखा वाटत नाही. से वाटते की ही द्वीपक्षीय मालिका सुरू आहे. बीसीसीआयची स्पर्धा असल्यासारखे वाटत आहे.


असे मानले जात होते की भारत आणि पाकिस्तान यांच्यात जोरदार टक्कर रंगेल मात्र असे झाले नाही. भारताने पाकिस्तानवर ७ विकेटनी एकतर्फी विजय मिळवला. जेव्हा मिकी आर्थरला विचारण्यात आले की विश्वचषकात पक्षपातपूर्ण माहोल असणे योग्य आहे आणि याला मंजुरी मिळायला हवी का? यावर त्यांनी सांगितले की मला नाही वाटतं की मी यावर काही कमेंट करायला हवी. मला स्वत:ला दंड लावून घ्यायचा नाही आहे.

Comments
Add Comment

अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा विजय

कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील अमेरिकेविरुद्धच्या साखळी सामन्यात पाकिस्तानचा ३२ धावांनी विजय

T20 World Cup 2026 NZ vs UAE: यूएईला धूळ चारत न्यूझीलंडचा एकतर्फी विजय

चेन्नई: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला आहे. आज म्हणजेच मंगळवार १० फेब्रुवारी

T20 World Cup 2026 NED vs NAM: नेदरलॅंड्सच्या विजयी खेळीचा पाकिस्तानला फटका

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला आहे. आज म्हणजेच मंगळवार १० फेब्रुवारी

IND vs PAK सामना निश्चित; ICCच्या हस्तक्षेपानंतर पाकिस्तानने १० दिवसात टेकले गुडघे

मुंबई : भारत–पाकिस्तान क्रिकेट सामना होणार की नाही, या मुद्द्यावर निर्माण झालेला तिढा अखेर सुटला आहे. टी-20 वर्ल्ड

BCCI Central Contracty Players List: बीसीसीआयच्या केंद्रीय करार यादीतून 'या' पाच मोठ्या खेळाडूंची नावे गायब

दिल्ली: बीसीसीआयच्या केंद्रीय करार यादीतून दुर्लक्षित खेळाडू: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पुढील हंगामासाठी

Palghar: आंतरराष्ट्रीय नेमबाज संभाजी पाटीलचा भीषण अपघातात मृत्यू

पालघर: भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणारा नेमबाज संभाजी शिवाजी पाटील याचा वयाच्या २७ व्या