ही ICCची नाही तर BCCI ची स्पर्धा वाटतेय, पराभवानंतर भडकले मिकी आर्थर

  85

नवी दिल्ली: भारताने विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धची आपली विजयी मालिका कायम राखली आहे. शनिवारी अहमदाबादमध्ये खेळवण्यात आलेल्या विश्वचषक २०२३मधील सामन्यात भारताने पाकिस्तानला ७ विकेटनी हरवले.


हा पराभव पाकिस्तान संघाचे डायरेक्टर मिकी आर्थर यांच्या पचनी पडलेला नाही. ते पराभवामुळे चांगलेच भडकलेत. त्यांनी या सामन्यानंतर बीसीसीआयवर जोरदार टीका केली आहे. मिकीने म्हटले की ही आयसीसीची स्पर्धा आहे असं वाटत नाही तर बीसीसीआयची स्पर्धा असल्यासारखे वाटते आहे.


पाकिस्तानी क्रिकेट संघाचे डायरेक्टर मिकी आर्थर म्हणाले, खरं सांगायचं तर भारत वि पाकिस्तान हा सामना आयसीसीची स्पर्धा असल्यासारखा वाटत नाही. से वाटते की ही द्वीपक्षीय मालिका सुरू आहे. बीसीसीआयची स्पर्धा असल्यासारखे वाटत आहे.


असे मानले जात होते की भारत आणि पाकिस्तान यांच्यात जोरदार टक्कर रंगेल मात्र असे झाले नाही. भारताने पाकिस्तानवर ७ विकेटनी एकतर्फी विजय मिळवला. जेव्हा मिकी आर्थरला विचारण्यात आले की विश्वचषकात पक्षपातपूर्ण माहोल असणे योग्य आहे आणि याला मंजुरी मिळायला हवी का? यावर त्यांनी सांगितले की मला नाही वाटतं की मी यावर काही कमेंट करायला हवी. मला स्वत:ला दंड लावून घ्यायचा नाही आहे.

Comments
Add Comment

'या' पाकिस्तानी क्रिकेटरला बलात्काराच्या आरोपात ब्रिटनमध्ये अटक

नवी दिल्ली: पाकिस्तानचा २४ वर्षीय क्रिकेटर हैदर अलीला बलात्कार प्रकरणात ब्रिटनमध्ये अटक करण्यात आली आहे.

आशिया कप हॉकी स्पर्धेतून पाकिस्तान संघाची माघार; भारतात येऊन खेळण्यास नकार

नवी दिल्ली : आशिया कप क्रिकेट स्पर्धेतील भारत-पाक यांच्यातील तिढा सुटला असताना दुसऱ्या बाजूला आशिया कप हॉकी

मोहम्मद सिराज आयसीसी क्रमवारीत १५ व्या स्थानावर

इंग्लंड मालिकेमुळे सिराजची १२ स्थानाची झेप नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल येथील पाचव्या आणि शेवटच्या

आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच, गिल, जायसवाल आणि सुदर्शनला संधी मिळण्याची शक्यता

मुंबई : बीसीसीआय ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात आशिया कप २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे. यशस्वी

भारतात परतल्यावर मोहम्मद सिराजचे भव्य स्वागत

हैदराबाद : इंग्लंडमधील जबरदस्त प्रदर्शनानंतर स्टार गोलंदाज मोहम्मद सिराज बुधवार(दि.६) रोजी हैदराबादमध्ये परतले

भारत, विंडीज-आफ्रिकेसोबत कसोटी मालिका खेळणार

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार सामने नवी दिल्ली : भारताने इंग्लंडसोबत पाच कसोटी सामन्यांची मालिका बरोबरीत