ही ICCची नाही तर BCCI ची स्पर्धा वाटतेय, पराभवानंतर भडकले मिकी आर्थर

नवी दिल्ली: भारताने विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धची आपली विजयी मालिका कायम राखली आहे. शनिवारी अहमदाबादमध्ये खेळवण्यात आलेल्या विश्वचषक २०२३मधील सामन्यात भारताने पाकिस्तानला ७ विकेटनी हरवले.


हा पराभव पाकिस्तान संघाचे डायरेक्टर मिकी आर्थर यांच्या पचनी पडलेला नाही. ते पराभवामुळे चांगलेच भडकलेत. त्यांनी या सामन्यानंतर बीसीसीआयवर जोरदार टीका केली आहे. मिकीने म्हटले की ही आयसीसीची स्पर्धा आहे असं वाटत नाही तर बीसीसीआयची स्पर्धा असल्यासारखे वाटते आहे.


पाकिस्तानी क्रिकेट संघाचे डायरेक्टर मिकी आर्थर म्हणाले, खरं सांगायचं तर भारत वि पाकिस्तान हा सामना आयसीसीची स्पर्धा असल्यासारखा वाटत नाही. से वाटते की ही द्वीपक्षीय मालिका सुरू आहे. बीसीसीआयची स्पर्धा असल्यासारखे वाटत आहे.


असे मानले जात होते की भारत आणि पाकिस्तान यांच्यात जोरदार टक्कर रंगेल मात्र असे झाले नाही. भारताने पाकिस्तानवर ७ विकेटनी एकतर्फी विजय मिळवला. जेव्हा मिकी आर्थरला विचारण्यात आले की विश्वचषकात पक्षपातपूर्ण माहोल असणे योग्य आहे आणि याला मंजुरी मिळायला हवी का? यावर त्यांनी सांगितले की मला नाही वाटतं की मी यावर काही कमेंट करायला हवी. मला स्वत:ला दंड लावून घ्यायचा नाही आहे.

Comments
Add Comment

Ind beat Sa 1st ODI : थरार शेवटच्या षटकापर्यंत! रांची वनडेत टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेवर १७ धावांनी विजय; विराटचे शतक, कुलदीपचा भेदक मारा

रांची : भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील (ODI Series) पहिला रोमांचक सामना

Virat Kohli Century : रांचीत किंग कोहलीचा धमाका! वनडेत ५२ वे शतक झळकावत विराट कोहलीने रचला इतिहास; तेंडुलकरचा ५१ शतकांचा विक्रम मोडला

रांची : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील (IND vs SA) रांची येथील JSCA आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या

Rohit sharma....रोहित शर्मा ODI क्रिकेटचा नवा 'सिक्सर किंग'

रांची : भारतीय संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्मा वनडे क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचत ‘सिक्सर किंग’ बनला आहे. दक्षिण

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेने टीम इंडिया विरुद्ध टॉस जिंकत ऋतुराज गायकवाड याला संधी; रिषभ पंतला डच्चू

रांची : रांची येथे भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना रंगत आहे. आयसीसी चॅम्पियन्स

IND VS SA : एस. बद्रीनाथने निवडली वनडे मालिकेची टीम.. रोहित शर्मा, विराट कोहली यांचा समावेश; पण रिषभ पंत?

रांची IND vs SA : रांची येथे उद्यापासून भारत-दक्षिण आफ्रिका वनडे मालिकेला सुरुवात होत आहे. कसोटी मालिकेतील पराभवानंतर

कधी सुरू होणार भारत - दक्षिण आफ्रिका ODI ?

रांची : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेने ०-२ अशी जिंकली. आता रविवार ३० नोव्हेंबर