World Cup 2023: वर्ल्डकपच्या पॉईंट टेबलमध्ये बदल, पाहा टीम इंडिया कितव्या स्थानावर

नवी दिल्ली: भारतात सुरू असलेल्या विश्वचषक २०२३च्या(world cup 2023) स्पर्धेत अनेक जबरदस्त सामने पाहायला मिळत आहेत. पाच वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला अद्याप विजयाचा सूर गवसलेला नाही तर टीम इंडिया, न्यूझीलंड, पाकिस्तान हे संघ फॉर्मात दिसत आहेत.


विश्वचषक सुरू झाल्यानंतर एक आठवडा होता आहे त्यामुळे गुणतालिकेतही मोठा बदल पाहायला मिळत आहे. ऑस्ट्रेलिया आणि द. आफ्रिका यांच्यात गुरूवारी झालेल्या सामन्यात गुणतालिकेत चांगलाच बदल पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियावर तब्बल १३४ धावांनी विजय मिळवणाऱ्या द. आफ्रिकेने या गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले आहे.


त्यांचा ऑस्ट्रेलियावरील विजय जबरदस्त होता. पहिल्यांदा त्यांनी फलंदाजी करताना ३११ धावा केल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघाला १७७ धावांवर रोखले.



गुणतालिकेत कोण कितव्या स्थानावर


द. आफ्रिकेचा संघ या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. त्यांनी २ पैकी २ सामने जिंकलेत. त्यानंतर न्यूझीलंड दुसऱ्या स्थानावर,भारत तिसऱ्या स्थानावर, पाकिस्तान चौथ्या स्थानावर आहे. या सर्व संघांनी २ पैकी २ सामने जिंकलेत. इंग्लड या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर, बांगलादेश सहाव्या, श्रीलंका सातव्या स्थानावर आहे. नेदरलँडचा संघ आठव्या स्थानावर आहे. तर आश्चर्यजनक ऑस्ट्रेलियाचा संघ नवव्या स्थानावर आहे.

Comments
Add Comment

अपोलो टायर्स टीम इंडियाचा नवीन स्पॉन्सर; प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला देणार ४.५ कोटी रुपये

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन जर्सी स्पॉन्सर म्हणून अपोलो

युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या