Ind vs Pak : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी अहमदाबादमध्ये पोहोचली टीम इंडिया

अहमदाबाद: विश्वचषकाची सुरूवात होऊन आठवडा झाला आहे. टीम इंडियाने या विश्वचषकातील आपले पहिले दोन सामने जिंकले आहेत. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला सामना जिंकला. त्यानंतर अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातही भारताने शानदार विजय मिळवला. भारतीय संघ आता विश्वचषकातील तिसरा सामना खेळण्यासाठी अहमदाबादमध्ये पोहोचला आहे.


१२ ऑक्टोबरला भारतीय संघाने दिल्लीवरून अहमदाबादसाठी उड्डाण केले. काही तासांतच भारतीय संघ गुजरातमध्ये पोहोचला. भारत आणि पाकिस्तानचा संघ १४ ऑक्टोबरला नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आमनेसामने असणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडिया अहमदाबादेत पोहोचली आहे.


 


एका क्रिकेट चाहत्याने ही माहिती सोशल मीडियावरून दिली. पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडिया पाकिस्तानपेक्षा पुढे आहे. भारताने आतापर्यंतचे दोनही सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तानने केवळ एक सामना जिंकला आहे. पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध रोमांचक विजय मिळवला.


भारत आणि पाकिस्तानचचा संघ एकदिवसीय विश्वचषकात आतापर्यंत ७ वेळा आमनेसामने आले आहेत. पाकिस्तानचा संघाला एकदिवसीय विश्वचषकात आतापर्यंत एकदाही भारताला हरवता आलेले नाही. १४ ऑक्टोबरला होणाऱ्या सामन्यात काय निकाल लागणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दोन्ही संघादरम्यान कडवी टक्कर पाहायला मिळू शकते. दोन्ही संघातील खेळाडू शानदार फॉर्मात आहेत.

Comments
Add Comment

Ranji Trophy: १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी बिहार रणजी संघाचा उपकर्णधार

साकिबुल गनीकडे नेतृत्वाची धुरा मुंबई : १५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफी २०२५-२६ हंगामासाठी बिहार

कुलदीप यादवने दिल्लीमध्ये केले नको ते शतक, बनवला हा खराब रेकॉर्ड

नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाचा चायनामन फिरकी

भारताला शेवटच्या दिवशी जिंकण्यासाठी हव्या ५८ धावा

नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये कसोटी सामना सुरू आहे. या

भारताला जिंकण्यासाठी हव्या १२१ धावा

नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये कसोटी सामना सुरू आहे. या

IND vs WI:चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात, भारताला विकेटची प्रतीक्षा

नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या खेळाला

वर्ल्डकपमध्ये दोन पराभव, टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहोचू शकेल का? जाणून घ्या समीकरण

मुंबई: महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये रविवारी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाच्या हातून पराभवास सामोरे जावे लागले. या