अहमदाबाद: विश्वचषकाची सुरूवात होऊन आठवडा झाला आहे. टीम इंडियाने या विश्वचषकातील आपले पहिले दोन सामने जिंकले आहेत. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला सामना जिंकला. त्यानंतर अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातही भारताने शानदार विजय मिळवला. भारतीय संघ आता विश्वचषकातील तिसरा सामना खेळण्यासाठी अहमदाबादमध्ये पोहोचला आहे.
१२ ऑक्टोबरला भारतीय संघाने दिल्लीवरून अहमदाबादसाठी उड्डाण केले. काही तासांतच भारतीय संघ गुजरातमध्ये पोहोचला. भारत आणि पाकिस्तानचा संघ १४ ऑक्टोबरला नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आमनेसामने असणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडिया अहमदाबादेत पोहोचली आहे.
एका क्रिकेट चाहत्याने ही माहिती सोशल मीडियावरून दिली. पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडिया पाकिस्तानपेक्षा पुढे आहे. भारताने आतापर्यंतचे दोनही सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तानने केवळ एक सामना जिंकला आहे. पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध रोमांचक विजय मिळवला.
भारत आणि पाकिस्तानचचा संघ एकदिवसीय विश्वचषकात आतापर्यंत ७ वेळा आमनेसामने आले आहेत. पाकिस्तानचा संघाला एकदिवसीय विश्वचषकात आतापर्यंत एकदाही भारताला हरवता आलेले नाही. १४ ऑक्टोबरला होणाऱ्या सामन्यात काय निकाल लागणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दोन्ही संघादरम्यान कडवी टक्कर पाहायला मिळू शकते. दोन्ही संघातील खेळाडू शानदार फॉर्मात आहेत.
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…