Ind vs Pak : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी अहमदाबादमध्ये पोहोचली टीम इंडिया

अहमदाबाद: विश्वचषकाची सुरूवात होऊन आठवडा झाला आहे. टीम इंडियाने या विश्वचषकातील आपले पहिले दोन सामने जिंकले आहेत. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला सामना जिंकला. त्यानंतर अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातही भारताने शानदार विजय मिळवला. भारतीय संघ आता विश्वचषकातील तिसरा सामना खेळण्यासाठी अहमदाबादमध्ये पोहोचला आहे.


१२ ऑक्टोबरला भारतीय संघाने दिल्लीवरून अहमदाबादसाठी उड्डाण केले. काही तासांतच भारतीय संघ गुजरातमध्ये पोहोचला. भारत आणि पाकिस्तानचा संघ १४ ऑक्टोबरला नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आमनेसामने असणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडिया अहमदाबादेत पोहोचली आहे.


 


एका क्रिकेट चाहत्याने ही माहिती सोशल मीडियावरून दिली. पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडिया पाकिस्तानपेक्षा पुढे आहे. भारताने आतापर्यंतचे दोनही सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तानने केवळ एक सामना जिंकला आहे. पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध रोमांचक विजय मिळवला.


भारत आणि पाकिस्तानचचा संघ एकदिवसीय विश्वचषकात आतापर्यंत ७ वेळा आमनेसामने आले आहेत. पाकिस्तानचा संघाला एकदिवसीय विश्वचषकात आतापर्यंत एकदाही भारताला हरवता आलेले नाही. १४ ऑक्टोबरला होणाऱ्या सामन्यात काय निकाल लागणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दोन्ही संघादरम्यान कडवी टक्कर पाहायला मिळू शकते. दोन्ही संघातील खेळाडू शानदार फॉर्मात आहेत.

Comments
Add Comment

ICC Worldcup 2025 : भारताच्या लेकींनी विश्वचषक जिंकून इतिहास घडवला! वर्ल्ड कप जिंकून देशवासियांना दिला 'हा' सर्वात मोठा संदेश

नवी मुंबई : नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्पोर्ट्स ॲकॅडमीच्या (DY Patil Sports Academy) रोषणाईत, २ नोव्हेंबर (रविवार) रोजी भारतीय

ICC Women's Cricket World Cup 2025 : जीत लिया जहां... PM मोदींनी केले अभिनंदन, तर 'मास्टर ब्लास्टर' सचिनला आठवली '१९८३' ची गाथा!

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने (Indian Women's Cricket Team) रविवारी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर (Dr. DY Patil Stadium) एक ऐतिहासिक

Rohit Sharma : महिला संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर रोहित शर्माचे डोळे पाणावले; 'त्या' भावूक क्षणाचा फोटो होतोय व्हायरल!

नवी मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने (Indian Women's Cricket Team) अखेर आपला पहिला वनडे वर्ल्ड कप (First ODI World Cup) जिंकून इतिहास रचला आहे.

भारताच्या मुलींची कमाल, वर्ल्डकप जिंकून केली धमाल; फक्त १० मुद्यात वाचा टीम इंडियाच्या विजयाची गोष्ट

नवी मुंबई : भारताच्या महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वचषक २०२५ (ICC Women World Cup 2025) जिंकला

अखेर स्वप्न पूर्ण, भारताने जिंकला महिला विश्वचषक; दीप्तीने घेतल्या ५ विकेट

नवी मुंबई : अखेर भारताचे स्वप्न साकार झाले. भारताच्या महिला संघाने आयसीसी वर्ल्डकप पहिल्यांदाच जिंकला. नाणेफेक

अजित पवार सलग चौथ्यांदा राज्याच्या ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची सलग चौथ्यांदा राज्याच्या