Ind vs Pak : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी अहमदाबादमध्ये पोहोचली टीम इंडिया

अहमदाबाद: विश्वचषकाची सुरूवात होऊन आठवडा झाला आहे. टीम इंडियाने या विश्वचषकातील आपले पहिले दोन सामने जिंकले आहेत. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला सामना जिंकला. त्यानंतर अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातही भारताने शानदार विजय मिळवला. भारतीय संघ आता विश्वचषकातील तिसरा सामना खेळण्यासाठी अहमदाबादमध्ये पोहोचला आहे.


१२ ऑक्टोबरला भारतीय संघाने दिल्लीवरून अहमदाबादसाठी उड्डाण केले. काही तासांतच भारतीय संघ गुजरातमध्ये पोहोचला. भारत आणि पाकिस्तानचा संघ १४ ऑक्टोबरला नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आमनेसामने असणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडिया अहमदाबादेत पोहोचली आहे.


 


एका क्रिकेट चाहत्याने ही माहिती सोशल मीडियावरून दिली. पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडिया पाकिस्तानपेक्षा पुढे आहे. भारताने आतापर्यंतचे दोनही सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तानने केवळ एक सामना जिंकला आहे. पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध रोमांचक विजय मिळवला.


भारत आणि पाकिस्तानचचा संघ एकदिवसीय विश्वचषकात आतापर्यंत ७ वेळा आमनेसामने आले आहेत. पाकिस्तानचा संघाला एकदिवसीय विश्वचषकात आतापर्यंत एकदाही भारताला हरवता आलेले नाही. १४ ऑक्टोबरला होणाऱ्या सामन्यात काय निकाल लागणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दोन्ही संघादरम्यान कडवी टक्कर पाहायला मिळू शकते. दोन्ही संघातील खेळाडू शानदार फॉर्मात आहेत.

Comments
Add Comment

क्रिकेट विश्वात जेमिमाच्या मैत्रीचीच चर्चा!

वाईट काळामधून स्मृती मानधनाला बाहेर काढायला मदत नवी दिल्ली : मैत्रीण कशी असावी, याचे उत्तम उदाहरण जेमिमा

Rohit Sharma-Virat Kohli Vijay Hazare Trophy 2025-26 : रोहित-विराटचा पहिल्या सामन्यात शतकी धमाका! दुसऱ्या फेरीत कोणाशी भिडणार? जाणून घ्या वेळ, मैदान आणि लाइव्ह अपडेट्सची ए टू झेड माहिती

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या 'विराट-रोहित' नावाच्या वादळाने चाहत्यांना भुरळ घातली असून, विजय हजारे

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख