World cup 2023: भारताचा अफगाणिस्तानवर धमाकेदार विजय

नवी दिल्ली: रोहित शर्माच्या(rohit sharma) शानदार शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने विश्वचषक २०२३मध्ये(world cup 2023) अफगाणिस्तानवर धमाकेदार विजय मिळवला आहे. अफगाणिस्तानच्या संघाने विजयासाठी दिलेले २७३ धावांचे आव्हान भारतान ८ विकेट राखत पूर्ण केले.


भारताचा जबरदस्त फलंदाज विराट कोहलीने या सामन्यातही अर्धशतकी खेळी केली. त्याने धमाकेदार नाबाद ५५ धावा ठोकल्या. तर श्रेयस अय्यरने नाबाद २५ धावांची खेळी केली. याआधी भारताचा सलामीवीर रोहित शर्माने १३१ धावांची तडाखेबंद खेळी करत भारताच्या विजयाचा पारा रचला होता. इशान किशननेही या सामन्यात ४७ धावा ठोकल्या. त्याचे अर्धशतक तीन धावांनी हुकले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताचे दोनही सलामीवीर अपयशी ठरले होते. मात्र त्यांनी या सामन्यात ती चूक भरून काढली.


तत्पूर्वी, अफगाणिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५० षटकांत ८ बाद २७२ धावा केल्या होत्या. अफगाणिस्तानचा कर्णधार हश्मतुल्लाह शाहिदी याने ८० धावांची खेळी केली तर अझमतुल्लाह ओमरजाई याने ६२ धावांची खेळी केली. त्यामुळे संघाला अडीचशे पार धावसंख्या उभारता आली.


भारताकडून यावेळी जसप्रीत बुमराहने ४ विकेट घेतल्या. तर हार्दिक पांड्याने २ विकेट घेतल्या. शार्दूल ठाकूर आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.



रोहित शर्माचा ऐतिहासिक रेकॉर्ड


रोहित शर्मा विश्वचषकात सर्वाधिक ७ शतके ठोकणारा पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने सचिन तेंडुलकरच्या ६ शतकांचा रेकॉर्ड मोडला. यासोबतच रोहित विश्वचषकात सर्वात वेगवान एक हजार धावा करणारा संयुक्तरित्या पहिला फलंदाज ठरला आहे.

Comments
Add Comment

T20 World Cup 2026 Ind vs Nam: सामन्यापूर्वी भारताला मोठा झटका; बुमराच्या बॉलमुळे ईशान जखमी

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला असून गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारत

T20 World Cup 2026 Ind vs Nam: नामिबिया विरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माला आराम ?

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला असून गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारत

भारतीय संघाचा नामिबियाविरुद्ध सावध पवित्रा

नवी दिल्ली  : टी-२० विश्वचषक २०२६ च्या सलामीच्या सामन्यात अमेरिकेवर मात केल्यानंतर, भारत आता आपल्या दुसऱ्या

वेस्ट इंडीजचा इंग्लंडवर ३० धावांनी विजय

रदरफोर्डची वादळी फलंदाजी अन् मोटीची 'फिरकी' ठरली निर्णायक मुंबई  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये वेस्ट इंडीजने आपल्या

भारताला मोठा धक्का, नामिबियाविरुद्धच्या सामन्याआधी महत्त्वाचा खेळाडू रुग्णालयात

मुंबई : भारताने अमेरिकेविरुद्धचा सामना २९ धावांनी जिंकला. आता गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारताचा सामना नामिबिया

वानिंदू हसरंगा विश्वचषकातून बाहेर

कोलंबो  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये जेतेपदाचे स्वप्न पाहणाऱ्या श्रीलंकन संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा मुख्य