World cup 2023: भारताचा अफगाणिस्तानवर धमाकेदार विजय

Share

नवी दिल्ली: रोहित शर्माच्या(rohit sharma) शानदार शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने विश्वचषक २०२३मध्ये(world cup 2023) अफगाणिस्तानवर धमाकेदार विजय मिळवला आहे. अफगाणिस्तानच्या संघाने विजयासाठी दिलेले २७३ धावांचे आव्हान भारतान ८ विकेट राखत पूर्ण केले.

भारताचा जबरदस्त फलंदाज विराट कोहलीने या सामन्यातही अर्धशतकी खेळी केली. त्याने धमाकेदार नाबाद ५५ धावा ठोकल्या. तर श्रेयस अय्यरने नाबाद २५ धावांची खेळी केली. याआधी भारताचा सलामीवीर रोहित शर्माने १३१ धावांची तडाखेबंद खेळी करत भारताच्या विजयाचा पारा रचला होता. इशान किशननेही या सामन्यात ४७ धावा ठोकल्या. त्याचे अर्धशतक तीन धावांनी हुकले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताचे दोनही सलामीवीर अपयशी ठरले होते. मात्र त्यांनी या सामन्यात ती चूक भरून काढली.

तत्पूर्वी, अफगाणिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५० षटकांत ८ बाद २७२ धावा केल्या होत्या. अफगाणिस्तानचा कर्णधार हश्मतुल्लाह शाहिदी याने ८० धावांची खेळी केली तर अझमतुल्लाह ओमरजाई याने ६२ धावांची खेळी केली. त्यामुळे संघाला अडीचशे पार धावसंख्या उभारता आली.

भारताकडून यावेळी जसप्रीत बुमराहने ४ विकेट घेतल्या. तर हार्दिक पांड्याने २ विकेट घेतल्या. शार्दूल ठाकूर आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

रोहित शर्माचा ऐतिहासिक रेकॉर्ड

रोहित शर्मा विश्वचषकात सर्वाधिक ७ शतके ठोकणारा पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने सचिन तेंडुलकरच्या ६ शतकांचा रेकॉर्ड मोडला. यासोबतच रोहित विश्वचषकात सर्वात वेगवान एक हजार धावा करणारा संयुक्तरित्या पहिला फलंदाज ठरला आहे.

Recent Posts

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २१ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…

15 minutes ago

Summer Tips : उन्हाळ्यात कशी घ्यावी डोळ्यांची काळजी, जाणून घ्या ‘या’ गोष्टी!

मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…

35 minutes ago

क्रिकेटपटूंच्या कराराची BCCI ने केली घोषणा, ३४ खेळाडूंशी करार; फक्त चार खेळाडूंचा ए+ मध्ये समावेश

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…

1 hour ago

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा २६/११ च्या हल्ल्यामागे अदृश्य हात, भाजपाच्या माधव भांडारींचा आरोप

मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…

2 hours ago

Benefits Of Watermelon : कलिंगड खा अन् हायड्रेट राहा!

ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…

2 hours ago