Nitesh Rane : संजय राऊतची ग्रामसेवक आणि पोलीस पाटील बनायची लायकी नाही

शिवसेनेच्या आमदारांना माझा सल्ला आहे की...


आमदार नितेश राणे यांनी सुनावले खडे बोल


मुंबई : उबाठाचे (Ubatha) मुखपत्र असलेल्या सामना वर्तमानपत्रातून मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांच्यावर सातत्याने टीका करण्यात येते. महाराष्ट्राला प्रगतिपथावर नेण्यासाठी काम करणार्‍या महायुती (Mahayuti) सरकारबद्दल असं छापून आणणार्‍या सामनाच्या संपादकांना भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी चांगलेच खडसावले आहे. आजच्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या लायकीवर भाष्य करणार्‍या उबाठाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना नितेश राणे यांनी त्यांचीच लायकी दाखवून दिली.


नितेश राणे म्हणाले, सामना वर्तमानपत्रात आदरणीय देवेंद्र फडणवीस यांची कॅपेसिटी आणि लायकी यावर लिहिलेलं आहे. पण खरं तर रश्मी ठाकरेंना सामनाचे संपादक बनवून, संजय राजाराम राऊतची लायकी काढली, असं आम्ही म्हणायचं का? ग्रामसेवक आणि पोलीस पाटील बनायची लायकी नसलेला संजय राजाराम राऊत २०१९ ला मुख्यमंत्री पदाचे स्वप्न बघत होता. शरद पवार आपलेच नाव चालवणार म्हणून आमदारांना फोन करायला लागला पण याच्या लायकी प्रमाणे २ ते ३ पेक्षा जास्त आमदार याच्या बैठकीला जमलेच नाहीत, हीच याची लायकी आहे, असं नितेश राणे म्हणाले.


राजाराम राऊत यांच्या मुलाला म्हणजे संजयचा बंधू सुनिल राऊत याची उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना लायकी ओळखली आणि म्हणून मविआ सरकारच्या मंत्रिमंडळात संजयने एवढा थयथयाट करुनही सुनिलला साधं राज्यमंत्री पण बनवलं नाही. पण राजाराम राऊत यांच्या कुटुंबियांमध्ये कॅपेसिटी आहे, हे मानलं पाहिजे. ती कॅपेसिटी आहे गरिबांची खिचडी चोरण्यात. कारण अख्ख्या कुटुंबांचं नाव खिचडी घोटाळ्यात आलं आहे. त्यामुळे तुझी आणि तुझ्या मालकाची आधी लायकी, कॅपेसिटी बघ आणि मग फडणवीस साहेबांबद्दल बोल, असे खडे बोल नितेश राणे यांनी सुनावले.



शिवसेनेच्या आमदारांना माझा सल्ला आहे की...


आमचा मित्रपक्ष शिवसेनेच्या आमदारांना मी सांगेन की तुम्ही शिंदेसाहेबांना त्रास देणार याला काही मर्यादा आहेत. कधी अॅडच्या निमित्ताने तर कधी काही वक्तव्यं करुन त्यांना त्रास देता आणि मग शिंदेसाहेबांना स्पष्टीकरण द्यावं लागतं. म्हणून आमच्या फडणवीस साहेबांनी काय करावं, कुठे काम करावं हे बोलण्याइतके आपण मोठे नाही आहोत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना त्यांचं काम व्यवस्थितरित्या करु द्यात. उगाच काहीतरी बडबडून संजय राऊतसारख्या लायकी नसलेल्या माणसाला फुलटॉस देऊ नका, हा सल्ला नितेश राणे यांनी मित्रपक्षाच्या सहकार्‍यांना दिला.



उबाठा सेनेच्या कोर्टातील याचिका आधी मागे घ्या...


आज सकाळी त्यांनी हाही उल्लेख केला की आज पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर होतील, तशा महापालिकेच्या निवडणुकाही आयोगाने जाहीर कराव्यात. पण त्यासाठी तुमच्यासारख्या अनाडी माणसाला मी सांगेन की कोर्टामध्ये उबाठा सेनेच्या ज्या काही याचिका आहेत, त्या आधी मागे घ्या. मग महापालिकेच्या निवडणुका आयोग लगेच लावेल.



...अशा निवडणुका जिंकता येत नाहीत


रायगडमधून ठाकरे गटाने आपला उमेदवार उभा केला आहे याबद्दल पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर नितेश राणे म्हणाले, की त्यांनी कितीही उमेदवारी जाहीर केल्या तरी तिथे आमच्या महायुतीचाच खासदार निवडून येणार, स्वतःच निवडणुका जाहीर करुन, उमेदवारी जाहीर करुन निवडणुका जिंकता येत नाहीत, एवढंच मी सांगेन.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

Sindhu Mahakumbh : सिंधू महाकुंभाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या संदेशाचा महाराष्ट्रात गौरव; राज्यपालांच्या हस्ते इंद्रेश कुमार आणि पाल्गा रिंपोचे यांचा सन्मान

मुंबई : लडाख येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सिंधू महाकुंभ (Sindhu Mahakumbh) उपक्रमाने राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक

Analog Paneer : पनीरच्या ३२ टक्के नमुन्यांमध्ये भेसळ, 'ॲनालॉग पनीर'मध्ये वनस्पती चरबीचा वापर

मुंबई : राज्यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बाजारपेठेतून घेतलेल्या पनीरच्या नमुन्यांपैकी तब्बल ३२ टक्के नमुने

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी घेतला करंजा मत्स्य बंदर प्रकल्पाचा आढावा

- ४ हजार ५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता; अत्याधुनिक यंत्रणेसह अनुभवी मनुष्यबळाचा वापर

Central Railway New Rule : 'धूम्रपान ते फेरीवाले…' रेल्वेत गैरप्रकार करणाऱ्यांची खैर नाही; रेल्वे कायद्यात झाले 'हे' मोठे बदल

मुंबई : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! रेल्वे कायदा, १९८९ मधील अनेक तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आल्या

Maharashtra Rojgar Melava 2026 : महाराष्ट्रातील तरुणांसाठी मोठी संधी! राज्यात होणार १ हजार रोजगार मेळावे; मंत्री मंगलप्रभात लोढांचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई : राज्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व

Nitesh Rane : रत्नागिरीला मिळणार जागतिक ओळख! भगवती बंदरात अत्याधुनिक क्रुझ टर्मिनलला गती; पर्यटन, रोजगाराला मोठी चालना

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील भगवती बंदर (Bhagwati Port) येथे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक क्रुझ टर्मिनल (cruise terminal)