दैनिक ‘प्रहार’च्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व वाचक, जाहिरातदार आणि हितचिंतकांना मन:पूर्वक शुभेच्छा!
‘जी-२०’ ही आंतरराष्ट्रीय परिषद देशात नुकतीच संपन्न झाली. ही परिषद पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यशस्वी करून दाखवली. तसेच ‘जी-२०’ ने जगात भारताचे नाव उंचावले. गेल्या साडेनऊ वर्षांत भारत जगात एक महाशक्ती म्हणून पुढे आला आहे, ते पंतप्रधान मोदींच्या कुशल नेतृत्वामुळेच. विश्वमान्य नेतृत्व म्हणून सारे जग मोदीजींकडे बघत आहे, ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे.
गेली २७ वर्षे प्रलंबित असणारे महिला आरक्षण विधेयक मोदींच्या नेतृत्वामुळेच संसदेच्या दोन्ही सभागृहांनी सर्वसंमतीने संमत करून नवा इतिहास घडवला. पंतप्रधानांनी तरुणांना उद्योजक म्हणून उत्तेजन देणारी व देशाच्या विकासाला गती देणारी ‘विश्वकर्मा’ योजना जाहीर करून देशाला नवी दिशा दिली आहे.
केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री म्हणून राज्यात व देशात उद्योगांचे जाळे पसरविण्याचा आणि तरुणांना उद्योग-व्यवसायाची दारे उघडून देण्याचा माझा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस-अजित पवार असे महायुतीचे सरकार असल्याने विकासाचा गाडा गतिमान होतो आहे. राज्यात महायुतीचे सरकार आल्याने राज्यातील शेतकरी, कामगार, व्यावसायिक, व्यापारी, लहान-मोठे उद्योजक अशा सर्वांची भरभराट व्हावी, अशा शुभेच्छा मी ‘प्रहार’ वर्धापन दिनाच्या निमित्ताने देत आहे. - नारायण राणे, केंद्रीय सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगमंत्री






