Canada Plane Crash : कॅनडामध्ये विमान अपघात; दोन शिकाऊ भारतीय पायलटांचा मृत्यू

  100

ओटावा : कॅनडामध्ये (Canada) विमान कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. कॅनडातील वँकूवरजवळील चिल्लीवॅक येथे हे विमान दुर्घटनाग्रस्त (Plane Crash) झाल्याची माहिती समोर आली आहे. या विमान अपघातात दोन प्रशिक्षणार्थी भारतीय वैमानिकांसह (Trainee Indian pilots) आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. दोन्ही भारतीय मुंबईतील रहिवासी होते. अभय गडरू आणि यश विजय रामुगाडे अशी या दोघांची नावे आहेत. स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोहोचलं असून यासंदर्भात अधिक तपास सुरु आहे.


पायपर पीए-३४ सेनेका हे दुहेरी इंजिन असलेले हलके विमान चिलीवॅक शहरातील मोटेलच्या मागील झाडांवर आदळून हा अपघात झाला, अशी माहिती कॅनडाच्या पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. या अपघातात कोणत्याही सार्वजनिक ठिकाणाचे नुकसान झालेले नाही.


विमान विमानतळावर लँडिंगसाठी येत असताना हा अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले. चिल्लीवॅक विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी विमान खाजगी मालमत्तेवर कोसळल्याची पुष्टी केली. मात्र, विमान अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट असून कॅनडाच्या वाहतूक सुरक्षा मंडळाने या घटनेचा तपास सुरू केला आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Russia Ukraine War: रशियाचा युक्रेनवर ४० क्षेपणास्त्रे आणि ४०० ड्रोनचा भयंकर हल्ला!

रशियाचा युक्रेनवर ड्रोन, क्रूझ आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वर्षाव कीव्ह: रशियाने शुक्रवारी सकाळी

बांगलादेशमध्ये एप्रिल २०२६मध्ये होणार निवडणूक, मुहम्मद युनूस यांनी केली घोषणा

ढाका: बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद यूनुस यांनी देशातील पुढील राष्ट्रीय निवडणुकीची

या ठिकाणी पाच रुपयांचा पार्ले जी बिस्किटांचा पुडा २३०० रुपयांत मिळतो

गाझा : पार्ले जी बिस्कीट एक लोकप्रिय ब्रँड आहे. भारतात मागील अनेक दशकांपासून पार्ले जी बिस्किटांची विक्री सुरू

विनाश ७ जून नंतर अटळ, बाबा वेंगाचे भाकीत

बल्गेरिया : बल्गेरिया येथील बाबा वेंगा यांनी केलेली भविष्यवाणी या नावाने एक भाकीत व्हायर होत आहे. या भाकितानुसार

Shashi Tharoor : 'भारताला कोणत्याही तिसऱ्या पक्षाची गरज नाही', राहुल गांधींच्या विधानावर थरूर यांची प्रतिक्रिया

राहुल गांधींच्या ‘सरेंडर’ विधानाशी शशी थरूर असहमत वॉशिंग्टन : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान