Nawab Malik : काकांची साथ सोडून दादांना पाठिंबा... राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे 'ते' ४२ वे आमदार नवाब मलिक!

शरद पवारांना मोठा धक्का


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) २ जुलै या दिवशी मोठी फूट पडली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) काही आमदारांना सोबत घेत सरकारमध्ये सामील झाले. त्यामुळे शरदकाका विरुद्ध अजितदादा हा संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दोन्ही गट आपल्याकडे सर्वाधिक आमदार असल्याचे दावे करत आहेत. यावर निवडणूक आयोगात पुढील सुनावणी ९ ऑक्टोबर रोजी होणार आहे. मात्र, त्याआधीच शरद पवार (Sharad Pawar) गटाला एक मोठा धक्का बसणार आहे. राष्ट्रवादीचे मोठे नेते नवाब मलिक (Nawab Malik) अजितदादांना पाठिंबा देणार आहेत. अजित पवार गटाने आपल्या बाजूला ४२ आमदार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे नवाब मलिक हेच ते ४२ वे आमदार असणार आहेत.


काही दिवसांपूर्वी नवाब मलिक यांची आजारी असल्याच्या कारणामुळे जामिनावर सुटका करण्यात आली होती. त्यानंतर दोन्ही गटांनी त्यांना आपल्या बाजूला वळवण्याचे प्रयत्न सुरु केले होते. तुरुंगातून बाहेर आल्यावर दोनच दिवसांत दोन्ही गटांच्या पदाधिकारी व नेत्यांनी नवाब मलिक यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. परंतु त्यावेळेस नबाव यांनी कोणतीही भूमिका स्पष्ट केली नव्हती. काही दिवसांत आपला निर्णय कळवेन असं ते म्हणाले होते. त्यांच्या बोलण्यावरुन आणि इतर प्रतिक्रियांवरुन ते शरद पवार गटात जाण्याची शक्यता जास्त होती. मात्र, सर्व अंदाज आणि तर्कवितर्क चुकीचे ठरवत नवाब मलिक यांनी अजितदादांना पाठिंबा द्यायचे ठरवले आहे.


निवडणूक आयोगात सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान अजित पवार गटाने आपल्याकडे राष्ट्रवादीच्या एकूण ५३ आमदारांपैकी ४२ आमदार पाठीशी असल्याचा दावा केला होता. यातील ४१ आमदारांची यादी सोशल मीडियावर व्हायरल होत होती, मात्र ४२वे आमदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत होता. अजित पवार गटाने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरी नवाब मलिक हेच ते ४२ वे आमदार आहेत, अशी माहिती आहे.


राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. दोन्ही गटांनी पक्ष आपलाच असल्याचं सांगत दावे-प्रतिदावे केले आहेत. याबाबत पुढील सुनावणी ९ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी नेमकी कोणाची याबाबत निवडणूक आयोग काय निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Sagar Mitra : किनारपट्टीवरील ९१ अति संवेदनशील लँडिंग पॉईंटवर ‘सागर मित्र’ नेमणार

मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा; मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या विविध प्रकल्पांना मिळणार गती मुंबई :

Meghana Sakore-Bordikar : रायगड महावितरणची अपूर्ण कामे मान्सून पूर्वी गतीने पूर्ण करावीत; १०० केव्हीचे २५ ट्रान्सफॉर्मर देण्याचे निर्देश

MUMBAI : रायगड जिल्ह्यातील महावितरणची अपूर्ण असणारी सर्व कामे मान्सून सुरू होण्याअगोदर गतीने पूर्ण करावीत. अलिबाग

NITESH RANE : अवैध मासेमारीविरोधातील कारवाई आणखी तीव्र करा मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

MUMBAI : "राज्यातील सागरी सीमांमध्ये होणाऱ्या बेकायदेशीर मासेमारीला पूर्णपणे आळा घालण्यासाठी ड्रोन आधारित देखरेख

MARINA PROJECT : मच्छीमारांना विश्वासात घेऊनच 'मरीना' प्रकल्प पूर्ण करणार- मंत्री नितेश राणे यांची ग्वाही

MUMBAI : "मुंबईतील कफ परेड येथे साकारण्यात येणारा प्रस्तावित 'मरीना' प्रकल्प हा मुंबईच्या सागरी पर्यटन, जलवाहतूक आणि

Mumbai Airport Customs Seize 29 Exotic Animals : सुटकेस उघडली अन् आत होते अजगर, गिबन आणि...मुंबई विमानतळावर विदेशी प्राण्यांची तस्करी उघडकीस

बँकॉकवरून आणलेल्या २९ दुर्मिळ वन्यजीवांची सुटका मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Chhatrapati

Dharavi Redevelopmen : सिंगापूर-हाँगकाँगच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास

मुंबई : सिंगापूर आणि हाँगकाँगमधील आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करण्यात यावा.