Asian Games 2023: हॉकीमध्ये टीम इंडियाला सुवर्णपदक, जपानला ५-१ने हरवले

होंगझाऊ: आशियाई स्पर्धा २०२३मध्ये(asian games 2023) भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदकाला गवसणी घातली. टीम इंडियाने अंतिम सामन्यात गेल्या वेळचा आशियाई स्पर्धेचा विजेता संघ जपानला ५-१ असे हरवले. याआधी पूल राऊंडमध्येही भारत आणि जपान आमनेसामने आले होते. त्यावेळेसही भारताने जपानला ४-२ असे हरवले होते.


अंतिम सामन्यात टीम इंडियाने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत जपानला नामोहरम केले. भारताने जपानला केवळ एक गोल करण्याची संधी दिली.


या सुवर्णपदकासह भारतीय हॉकी संघाने २०२४मध्ये पॅरिसमध्ये खेळवल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली आहे. सामन्याबाबत बोलायचे झाल्यास पहिल्या क्वार्टरमध्ये दोनही संघांना गोल करता आला नाही. त्यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये २५व्या मिनिटाला भारताकडून पहिला गोल करण्यात आला. मनदीप सिंहने हा गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली.


तिसऱ्या क्वार्टरमध्ये ३२व्या मिनिटाला भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंहने दुसरा गोल करत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. तिसरा क्वार्टर संपण्याच्या आधी अमित रोहिदास भारतासाठी तिसरा गोल केला. या पद्धतीने भारताने तिसऱ्या क्वार्टरपर्यंत ३-० अशी आघाडी घेत आपला विजय पक्का केला.



चौथ्या क्वार्टरमध्ये भारताचे दोन गोल


चौथ्या क्वार्टरच्या सुरूवातीच्या तीन मिनिटांनीच म्हणजेच४८व्या मिनिटाला अभिषेकने भारतासाठी चौथा गोल केला. या गोलसह भारताने ४-० अशी आघाडी घेतली. यानंतर तीन मिनिटांनी म्हणजेच ५१व्या मिनिटाला जपानने आपले खाते खोलले आणि संघाला पहिला गोल केला. सामना संपण्यास एक मिनिट बाकी असताना भारताने पाचवा गोल केला. ५९व्या मिनिटाला कर्णधार हरमनप्रीत सिंहने संघासाठी पाचवा गोल करत जपानविरुद्ध ५- १ असा विजय मिळवला.

Comments
Add Comment

BCCI : आता दृष्टिहीन क्रिकेट संघाला मिळणार रॉयल ट्रीटमेंट; बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय अंध क्रिकेट असोसिएशन (सीएबीआय) साठी एक योजना जाहीर केली आहे. या

T20 World Cup 2026 : अभिषेक शर्माच्या फॉर्मची काळजी करणाऱ्यांची मला काळजी वाटते : सूर्यकुमार यादव

आयसीसी टी२० २०२६ च्या विश्वचषकाचा गट टप्पा संपला असून आता सुपर ८ चा महत्वाचा टप्पा सुरु झाला आहे. या स्पर्धेत

भारत आणि दक्षिण आफ्रिका रविवारी आमनेसामने

अहमदाबाद : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर

शिखर धवन दुसऱ्यांदा अडकला विवाहबंधनात

नवी दिल्ली : माजी भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनने दुसऱ्यांदा लग्न केले. आयर्लंडच्या सोफी शाइनसोबत शिखर धवनने लग्न

सुपर एट फेरीतला पहिलाच सामना पावसामुळे रद्द

कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंडी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतला पहिला सामना पावसामुळे रद्द झाला आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धची टी ट्वेंटी मालिका भारताने २-१ अशी जिंकली, सिडनी आणि अॅडलेडमध्ये भारताचा विजय

अॅडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांदरम्यान तीन सामन्यांची टी ट्वेंटी मालिका झाली. ही मालिका भारताने