Team india: विश्वचषकाआधी टीम इंडियाला मोठा झटका

मुंबई: विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्याआधी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचा क्रिकेटर शुभमन गिल याची डेंग्यूची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. यामुळे रविवारी होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात खेळण्याबाबत साशंकता आहे. टीम मॅनेजमेंट काही परीक्षणानंतर या स्टार फलंदाजाच्या उपलब्धतेबाबत निर्णय घेईल.


शुभमन गिल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्याआधी आजारी पडला आहे. अशातच भारतीय संघासाठी हा मोठा झटका मानला जात आहे. दरम्यान, तो पहिला सामना खेळणार की नाही याबाबतची स्थिती स्पष्ट नाही आहे.


भारतीय रविवारी आपल्या विश्चचषकातील अभियानाला सुरूवात करत आहे. त्यांचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होत आहे. अशातच पहिल्या सामन्यात टीम इंडिया स्टार फलंदाज शुभमन गिलशिवाय मैदानात उतरू शकते. मीडिया रिपोर्टनुसार टीम इंडियाच्या या स्टार फलंदाजाने गुरूवारी एम ए चिदम्बरम स्टेडियममध्ये टीम इंडियाच्या नेट सेशनमध्येही भाग घेतला होता. यानंतर त्याची डेंग्यूची टेस्ट करण्यात आली. यानंतर त्याच्यावर उपचार सुरू आहेत.


टीम इंडियाचे मॅनेजमेंट सातत्याने गिलच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहेत. शुक्रवारी आणखी एक राऊंड टेस्ट घेतली जाईल. त्यानंतर हे ठरवले जाईल की शुभमन गिल कांगांरूंविरोधात खेळणार की नाही.



कोण करणार सलामी, इशान किशन दावेदार?


दरम्यान, शुभमन गिल जर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळू शकला नाही तर सलामीवीराची भूमिका ईशान किशनकडे दिली जाऊ शकते. तसेच यासाठी आणखीही एक दावेदार आहे तो म्हणजे लोकेश राहुल.

Comments
Add Comment

T20 World Cup 2026 Ind vs Nam: सामन्यापूर्वी भारताला मोठा झटका; बुमराच्या बॉलमुळे ईशान जखमी

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला असून गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारत

T20 World Cup 2026 Ind vs Nam: नामिबिया विरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माला आराम ?

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला असून गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारत

भारतीय संघाचा नामिबियाविरुद्ध सावध पवित्रा

नवी दिल्ली  : टी-२० विश्वचषक २०२६ च्या सलामीच्या सामन्यात अमेरिकेवर मात केल्यानंतर, भारत आता आपल्या दुसऱ्या

वेस्ट इंडीजचा इंग्लंडवर ३० धावांनी विजय

रदरफोर्डची वादळी फलंदाजी अन् मोटीची 'फिरकी' ठरली निर्णायक मुंबई  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये वेस्ट इंडीजने आपल्या

भारताला मोठा धक्का, नामिबियाविरुद्धच्या सामन्याआधी महत्त्वाचा खेळाडू रुग्णालयात

मुंबई : भारताने अमेरिकेविरुद्धचा सामना २९ धावांनी जिंकला. आता गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारताचा सामना नामिबिया

वानिंदू हसरंगा विश्वचषकातून बाहेर

कोलंबो  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये जेतेपदाचे स्वप्न पाहणाऱ्या श्रीलंकन संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा मुख्य