Pitrupaksha : पितृ पक्षावर महागाई, दुष्काळाचे सावट

पंगत होतेय नजरे आड


खामखेडा : सध्या पितृपक्षाचे (Pitrupaksha) दिवस, पितृ पंधरवडा असल्याने वाढत्या मागणीमुळे भाजीपाल्याचे दर तेजीत आहेत.


मराठी महिन्यातील भाद्रपद पौर्णिमेपासून पितृपक्षाचे आगमन होते. या पंधरा दिवसाच्या कालावधीत मृत झालेल्या घरातील वाडवडील आई, भाऊ, काका, काकू, आदी आप्तांचे श्राद्ध करावे लागते. या श्राद्धाच्या नैवद्यासाठी कारले, गिलके, दोड़के, गवार, चवळी, चक्की, आळुचे पान, आदि भाजीपाला महत्वाचा मानला जातो. गोड नैवद्य म्हणून गव्हाची खीर, कड़ी, भात असे पक्वान्न हमखास असते. करावे लागते.


या जेवणासाठी भाऊबंद, नोकरी निमित्ताने बाहेर गावी असलेले कुटुंबीय, सगे-सोयरे, मित्र यांना विशेष निमंत्रण असते. एकूणच पितृपक्षात पूर्वजांच्या स्मरणात पंगत उठविण्याची रीत आहे.


यंदा मात्र ही रीत गेल्या दोन वर्षाप्रमाणेच खंडीत झाल्याचे दिसते. दोन वर्षांपूर्वी आलेल्या महामारीने गर्दीला अटकाव बसल्याने घरातल्या घरातच श्राद्ध घातले गेले. तर यंदा वाढलेली महागाई त्यात पिक पाणी नाही, दुष्काळ सदृश्य परिस्थिती, यामुळे खर्चाला फाटा देण्याकडे कल दिसत असल्याने अपवाद वगळता श्राद्धाच्या पंगतीही नजरे आड होत आहेत.

Comments
Add Comment

'Deool Band-2' Movie : ‘देऊळ बंद २’चा महाराष्ट्रभर धुमाकूळ! पहिल्याच दिवशी शो हाऊसफुल

मुंबई : महाराष्ट्रभर ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा गजर घुमवत बहुचर्चित मराठी चित्रपट ‘देऊळ बंद २ : आता परीक्षा

Davkhare : गावदेवी भाजी मंडई आग दुर्घटनेप्रकरणी दुर्घटनाग्रस्तांना नुकसानभरपाई द्या, आमदार डावखरेंची मागणी

Thane : ठाण्यातील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या गजबजलेल्या गावदेवी भाजी मंडईमध्ये आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागून

Prasad Lad : प्रसाद लाड यांनी स्वीकारले जरांगे पाटील यांचे चर्चेचे निमंत्रण; उद्या आंतरवलीत भेट

मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार?; २३ मे च्या 'डेडलाईन'पूर्वी सरकारच्या वतीने मध्यस्थी मुंबई : मराठा आरक्षणाच्या

आता गावकऱ्यांना मिळणार मोफत मिळकत पत्रिका

सनद फी माफ करण्याची महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा; ग्रामविकास विभाग प्रस्ताव तयार करणार मुंबई : ग्रामपंचायत

वाई येथे लघुकुंभमेळ्याचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते संपन्न

वाईच्या लघुकुंभ मेळ्याची महती संपूर्ण राज्यात पसरणार:-जयकुमार गोरे सातारा वाई नगरीला “दक्षिण काशी” अशी ओळख

पक्षसंघटनेची एकजुटीने मजबूत बांधणी करणार

प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांचा निर्धार मुंबई; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व समज-गैरसमज दूर झाले आहेत.