Sunday, July 7, 2024
Homeक्रीडाWorld Cup 2023Team India: वर्ल्डकपमध्ये टीम इंडियावर राहणार अंबे माताची कृपा

Team India: वर्ल्डकपमध्ये टीम इंडियावर राहणार अंबे माताची कृपा

मुंबई: आयसीसी वनडे क्रिकेट वर्ल्डकपची सुरूवात होण्यास फक्त काहीच दिवस बाकी आहेत. यावेळेस वर्ल्डकपचे आयोजन ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबरपर्यंत भारतात केले जाणार आहे. क्रिकेटच्या इतिहासात हे पहिल्यांदा होत आहे की भारत एकटाच या वर्ल्डकपचे यजमानपद भूषवत आहे. याआधी १९८७, १९९६ आणि २०११च्या वनडे वर्ल्डकपमध्ये भारताने संयुक्तरित्या याचे यजमानपद भूषवले आहे.

या वर्ल्डकपवर साऱ्या क्रिकेट चाहत्यांच्या नजरा असतील, कारण १२ वर्षानंतर पुन्हा तोच इतिहास रचला जाईल अशी आशा प्रत्येक क्रिकेट चाहत्याला आहे. भारताने २०११मध्ये वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत श्रीलंकेला हरवत खिताब जिंकला होता. आताचा हा वर्ल्डकप सणांदरम्यान येत आहे. यावेळेस वर्ल्डकपदरम्यान नवरात्री, दिवाळीसारखे मोठे सण येत आहेत. भारतीय संघांच्या सामन्यावेळीही सणांसारखाच उत्साह असणार आहे.

नवरात्रीदरम्यान भारताचे दोन सामने

९ दिवस चालणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाची सुरूवात १५ ऑक्टोबरपासून होत आहे. नवरात्रीच्या ठीक एक दिवस आधी भारतीय संघ अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पाकिस्तानचा सामना करणार आहे. नवरात्रीदरम्यान भारतीय संघाचे एकूण दोन सामने रंगतील. १९ ऑक्टोबरला भारताचा सामना बांगaलादेशशी होईल. त्यानंतर २२ ऑक्टोबरला भारताचा न्यूझीलंडशी सामना रंगणार आहे.

छटपुजेच्या दिवशी असणार वर्ल्डकपचा अंतिम सामना

वर्ल्डकपदरम्यान १२ नोव्हेंबरला भारतीय संघाचा सामना नेदरलँडशी होणार आहे. त्या दिवशी दिवाळीचा सण आहे. अशातच भारतीय संघ जिंकल्यास दिवाळीचा आनंद द्विगुणीत होईल. भारतीय संघ जर सेमीफायनलमध्ये पोहोचला तर ते १५ ऑक्टोबरला मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये सामना खेळतील. १५ नोव्हेंबरला भाऊबीज आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -