ओशिवरा येथील एका फ्लॅटमध्ये दोघे वयस्कर नवरा बायको राहत होते. गणेश चतुर्थीचा सण तोंडावर होता. देवापुढे गोड मिठाई ठेवायला हवी म्हणून व्यावसायिक आजोबांनी ऑनलाइन मिठाई मागविण्याचा निर्णय घेतला. इमारतीच्या जवळपास मिठाईची दुकाने होती; परंतु तब्येत ठिक नसल्याने खाली जाण्याचे त्यांनी टाळले. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी त्यांनी गुगलवरून प्रसिद्ध मिठाईवाल्यांचे नंबर शोधले. त्यात जुहू येथील तिवारी मिठाईवाला याच्याकडून मिठाई घ्यावी, असे त्यांना वाटले. गुगलवरील सर्च इंजिनमधूनच मिठाईवाल्याचा मोबाइल नंबर शोधून काढला आणि लगेचच इच्छित मिठाईची ऑर्डर दिली. या ऑर्डरपोटी तीन हजार ७७५ रुपये त्यांनी गुगल पेद्वारे हस्तांतरित केले आणि दुसऱ्या दिवशी घरी पार्सल येईल, याची ते वाट पाहत होते. दुपारी गणेशाची पूजा करण्याची वेळ निघून जात होती. तरी मिठाई आली नाही म्हणून ते चिंतेत पडले. वयस्कर आजोबांनी पुन्हा दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला. त्यावेळी त्याची निराशा झाली. आपल्याकडे ऑर्डरची नोंद झाली नाही. त्यामुळे पुन्हा ऑर्डर करावी, असे फोनवरून सांगण्यात आले. या फसवणुकीला बळी पडून, आजोबांनी समोरील व्यक्तीने दिलेल्या निर्देशानुसार गुगल पे द्वारे अतिरिक्त २९ हजार ८७५ रुपये पाठवले.
विशेष म्हणजे घोटाळेबाजाने त्या वृद्ध गृहस्थाचे मन वळविण्यासाठी एक आश्वासन दिले होते. आता पाठवलेली रक्कम केवळ एक कोड आहे, त्याला आश्वासन दिले की, आर्थिक कपात होणार नाही. त्यासाठी आजोबांना कोड इनपुट करण्यास प्रवृत्त केले आणि प्रभावीपणे रक्कम दुसऱ्या खात्यावर वळते केले. ऑनलाइन मिठाईचा प्रकार हा आजोबांच्या डोक्यावरून जायला लागला होता. त्यावेळी त्यांनी वर्सोवा येथे राहणारे त्यांचे ७४ वर्षीय रहिवासी असलेल्या एका मित्राची मदत मागितली. ज्याने खाते सुरू आहे का आणि रक्कम परत मिळावी यासाठी ४५ हजार रुपये हस्तांतरित केले. खेदाची बाब म्हणजे ही रक्कम कधीच परत मिळाली नाही. दरम्यानच्या काळात विश्वास बसावा, यासाठी परतावा प्रक्रिया सक्रिय झाल्याचा भ्रम निर्माण करण्यासाठी आजोबांच्या मित्राला ५० रुपयांची छोटी रक्कम पाठवली होती. मात्र तरीही मिठाई ओशिवरा येथील मित्राच्या घरी न पोहोचल्याने ते तिवारी मिठाईवाला दुकानात प्रत्यक्ष भेट देण्यास गेले. तेव्हा मात्र एक वेगळेच सत्य समोर आले की, मिठाईचे दुकान ऑनलाइन ऑर्डरवर घेत नाही. मग आपण ऑनलाइन ट्रान्स्फर केलेले पैसे गेले कुठे? हा प्रश्न आजोबा आणि त्यांच्या मित्राला पडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांना धक्का बसला. ज्येष्ठ नागरिक आजोबांनी या घटनेची माहिती ओशिवरा पोलिसांना दिली आणि अज्ञात घोटाळेबाजाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर ऑनलाइन मिठाई खरेदी करण्याचा प्रयत्न करत असताना सायबर घोटाळेबाजांनी १ लाख ३८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत नोंद करण्यात आले आहे. फसवणुकीचा प्रकार दुदैवी आहे. तरी ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना नागरिकांनी सावधगिरी बाळगायला हवी. विशेषत: सणासुदीच्या काळात फसवणूक करणारे उत्सवाच्या भावनेचा गैरफायदा घेऊन कसे फसवतात, हे या गुन्ह्यांच्या प्रकारामुळे समोर आले आहे.
ऑनलाइन घोटाळे टाळण्यासाठी हे आहेत प्रतिबंधात्मक उपाय :
maheshom108@gmail.com
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…
महिलांना त्यांच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अँकलेट परिधान करायला फार आवडते. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलींनाही अँकलेट…
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…
बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…