Nitesh Rane : मराठी माणसाच्या भविष्याचा खून करून स्वतःच्या अंगावर बरबटलेलं रक्त आधी पुसा...

  89

नितेश राणे यांचा संजय राऊतांवर पलटवार


मुंबई : मुंबईतील मुलुंडसारख्या ठिकाणी केवळ मराठी असल्यामुळे तृप्ती देवरुखकर (Trupti Deorukhkar) यांना ऑफिससाठी जागा नाकारण्यात आली ही बाब आता सर्वच राजकीय पक्षांनी (Political Parties) उचलून धरली आहे. त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशीच सर्वांची भूमिका आहे. मात्र, उबाठा गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी या घटनेला भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना जबाबदार धरत गलिच्छ राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे. यावर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनीदेखील त्यांच्यावर पलटवार केला आहे.


नितेश राणे म्हणाले, मुलुंड घटनेला जबाबदार भाजप आणि शिंदे आहेत असं बोलण्याअगोदर संजय राजाराम राऊतला लाज वाटली पाहिजे. मुंबईतला मराठी माणसाचा टक्का का घसरला? इतकी वर्षे महापालिकेत उद्धव ठाकरे यांची सत्ता होती ना? मग तरीही मुंबईतला मराठी माणूस आज मीरा रोड, वसई, विरार, भाईंदर, कल्याण, डोंबिवली या ठिकाणी का राहायला गेला? मुंबईमध्ये त्यांना का घर घ्यावंसं वाटलं नाही? का त्याला आर्थिक सक्षम केलं नाही? का वडापावच्या गाडी पुरतं ठेवलं? असे प्रश्न उपस्थित करत नितेश राणे यांनी संजय राऊतांचा खरपूस समाचार घेतला.


पुढे नितेश राणे म्हणाले, पत्राचाळमध्ये काय मराठी माणसं राहत नव्हती? खंबाटा आणि एअर इंडियामध्ये मराठी कामगार काम करत नव्हते का? मग त्याला जबाबदार कोण आहे? स्वतःच्या अंगावर मराठी माणसाच्या भविष्याचा खून करून बरबटलेलं जे रक्त आहे ते आधी पुसा आणि मग भाजप आणि शिंदे साहेबांवर बोट ठेवा, असा हल्लाबोल नितेश राणे यांनी केला.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

उबाठाचे १० ते १५ माजी नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, महिन्याभरात होणार प्रवेश

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उबाठा सेनेला आणखी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. येत्या

बेस्ट तोट्यात जाण्यास तत्कालीन सत्ताधारी उबाठा शिवसेनाच जबाबदार, काँग्रेसचा घरचा आहेर!

काँग्रेसचे माजी आमदार मधु चव्हाण यांचा आरोप भाडेतत्वावरील खासगी बसेस बंद करा मुंबई : बेस्ट उपक्रम आर्थिक संकटात

Dadar Kabutar Khana Controversy: कबुतर खानाच्या राड्यानंतर देवेंद्र फडणविसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले "लोकांचे आरोग्य..."

मुंबई: मुंबईतील दादरमधील कबुतरखाना बंद करण्यावरून जैन समाज आज आक्रमक झाल्याचे दिसून आले. मुंबई उच्च

हत्तीण आणि कबुतरखाना प्रकरणात मनसेचा यू टर्न

मुंबई : न्यायालयाच्या आदेशामुळे मुंबईतले कबुतरखाने बंद करण्याची कारवाई महापालिकेने सुरू केली आहे. तसेच

जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसावर खटला

मुंबई : जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेस रेल्वेत गोळीबार आणि हत्या प्रकरणात बडतर्फ कॉन्स्टेबल चेतनसिंह चौधरी

Dadar Kabutar Khana : प्रार्थना संपली... आता प्रतिकार! कबुतरखान्यावर जैन समाज संतप्त, पोलिसांसोबत बाचाबाची

मुंबई : मुंबईतील कबूतरखाना परिसर पुन्हा एकदा तणावाच्या वातावरणात सापडला आहे. जैन समाजाने यापूर्वी जाहीर केलेले