हांगझोऊ : चीनमध्ये रंगलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) भारत आपल्या उत्तमोत्तम खेळाडूंसह चमकदार कामगिरी करत आहे. नेमबाजीत तर आजच्या दिवसात दुसरे सुवर्णपदक मिळवत भारताने आतापर्यंत एकूण पाच सुवर्णपदकांची कमाई केली आहे. ५० मीटर रायफल स्पर्धेत भारताच्या सिफ्ट कौर सामरानं (Sift kaur samra) सुवर्णपदक पटकावलं आहे. तर भारताची नेमबाज आशी चौक्सीनं (Ashi Chouksey) कांस्यपदक मिळवलं आहे. दरम्यान, भारताच्या खात्यात ५ सुवर्ण, ५ रौप्य आणि ८ कांस्यपदक अशी एकूण १८ पदकं आली आहेत.
याआधी २५ मीटर एअर पिस्तुल टीम इव्हेंटमध्ये मनु भाकर, इशा सिंह आणि रिदम सांगवानच्या टीमने सुवर्णपदक पटकावले. ५० मीटर रायफल स्पर्धेत सामरा हिने ४४३ गुणांसह अव्वल स्थान पटकावले. तर दुसऱ्या स्थानी ४४१.९ गुणांसह चीनची क्युंगो झांग आणि भारताची आशी चौकसी ४३७.८ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…