Eclipse : ग्रहण काळ शुभ की अशुभ? श्राद्ध विधींवर काय होणार परिणाम?

Share

मुंबई : पूर्वजांच्या आशीर्वाद प्राप्तीसाठी किबहुना त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्ष पंधरवड्यात तिथीनुसार श्राद्धविधी केले जातात. पूर्वजांच्या तिथींची माहिती नसणारे सर्वपित्री अमावस्येला विधी करतात. मात्र यंदा सर्वपित्री अमावस्येला वर्षातील दुसरे सूर्यग्रहण (solar eclipse 2023) आहे. त्यामुळे श्राद्ध विधी १४ ऑक्टोबर रोजी (sarvapitri amavasya) कशा कराव्या, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

दरवर्षी पितृपक्ष भाद्रपद पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन अमावस्येला संपतो. मात्र यंदा अधिक मास आल्यामुळे पितृपक्ष पंधरा दिवस उशीराने आला आहे. या पंधरवड्यातील प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो. त्यामध्ये नवमी श्राद्ध, भरणी श्राद्ध आणि सर्वपित्री अमावस्या या तिथींना अधिक महत्त्व दिले जाते. यंदा वर्षातले दुसरे सूर्यग्रहण सर्वपित्री अमावस्येला आल्यामु‌ळे श्राद्धविधी करता येतील की नाही याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम आहे.

मात्र हे ग्रहण भारतात दिसणार नसून याचा कुठलाही परिणाम श्राद्धविधीवर होणार नसल्याचे मत खगोलशास्त्र अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी म्हटले आहे.

शास्त्रानुसार ग्रहणकाळ पूजा, पाठ, यासाठी अशुभ मानला जातो. म्हणून पितरांच्या आशीर्वाद प्राप्तीसाठी श्राद्धविधी करावा की नाही याबाबत संभ्रम दिसून येत आहे. पण सर्वपित्री अमावस्येला जरी ग्रहण आले असले तरीही पूर्वजांच्या श्राद्धविधींवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. उलट पूर्वगृह, दुराग्रह हे सर्व बाजूला ठेवून एकमेकांचा आदर करून केलेल्या श्राद्धविधी या पुर्वजांच्या मनाला शांती देणाऱ्या ठरतील, असेही सोमण यांनी सांगितले. त्यामुळे कोणतीही शंका मनात न ठेवता आपल्या पूर्वजांच्या श्राद्ध विधी तुम्ही करण्यास हरकत नाही, असे सोमण यांनी स्पष्ट केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

49 mins ago

प्रहार बुलेटीन: ०५ जुलै २०२४

दिवसभरातील (Prahaar Bulletin) महत्वाच्या बातम्या… टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीत काही चाहते आजारी तर काही झाले…

3 hours ago

Mumbai News : व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या ‘या’ विद्यार्थिनींना मिळणार मोफत प्रवेश!

राज्य मंत्रिमंडळाने घेतला मोठा निर्णय मुंबई : सरकारने माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर आता…

3 hours ago

NEET PG Exam पुढे ढकलली! नवीन तारीख आली समोर

प्रश्नपत्रिका तयार करतानाच घेणार 'ही' खास काळजी मुंबई : NEET PG परीक्षा रद्द झाल्यानंतर जवळपास…

4 hours ago

Ranjeet Nimbalkar : राहुल गांधींनी पंढरपुरच्या वारीत कॅट वॉक करायला येऊ नये!

यांचा वारीतला सहभाग केवळ राजकीय फायद्यासाठी भाजपाच्या माजी खासदारांची विरोधकांवर बोचरी टीका सोलापूर : आषाढी…

4 hours ago

Nitesh Rane : गुजरातच्या बसवर टीका करणारा मविआचा नेता अदानींचा खास ड्रायव्हर!

आमदार नितेश राणे यांचा रोहित पवारांना अप्रत्यक्ष टोला कोणाची बुद्धी लहान याबाबत राहुल गांधी आणि…

5 hours ago