Greenfield Konkan Expressway : 'ग्रीनफिल्ड कोकण एक्स्प्रेस वे'च्या भूसंपादनाला शासनाची मान्यता

  871

पेण (बळवली गाव) ते रायगड, रायगड ते गुहागर- रत्नागिरी, रत्नागिरी ते सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग ते महाराष्ट्र-गोवा या चार टप्प्यांत ३८८.४५ कि.मी. होणार बांधकाम


  • देवा पेरवी


पेण : मुंबई ते सिंधुदुर्ग या सहापदरी ग्रीनफिल्ड कोकण एक्स्प्रेस वेच्या (Greenfield Konkan Expressway) कामासाठी शंभर मीटर रूंद भूसंपादनाला शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे ३८८.४५ किलोमीटरच्या महामार्ग उभारणीला वेग येणार आहे. हे काम चार टप्प्यात होणार आहे. हा महामार्ग नवी मुंबई येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळास जोडला जाणार आहे.


महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) या Greenfield Konkan Expressway महामार्गासाठी अंमलबजावणी संस्था म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यानुसार एमएसआरडीसीने या महामार्गासाठी विविध पर्यायी आखणींचा अभ्यास करून चार टप्प्यातील अंतिम आखणी प्रस्ताव सादर केला आहे. या महामार्गावर ताशी १०० किलोमीटर वेगाने प्रवास करता येणार आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना जोडणारा मुंबई ते सिंधुदुर्ग असा ग्रीनफिल्ड कोकण द्रुतगती मार्ग उभारण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आला. तत्कालीन नगरविकास मंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १४ मार्च २०२० ला विधीमंडळात या संदर्भातील घोषणा केली होती. त्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबतचा शासननिर्णय प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार प्रवेश नियंत्रित सहापदरी ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्ग बांधणे, १०० किमी प्रतितास वेगासाठी महामार्ग संकल्पित करणे, महामार्गासाठी १०० मीटर रूंद भूसंपादन करण्यास मान्यता देण्यात आले आहे.


हा Greenfield Konkan Expressway महामार्ग नवी मुंबई येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळास जोडला जाणार असल्याने कोकणातून आंतरराष्ट्रीय प्रवास सोयीचा होणार आहे. या मार्गाची आखणी कोकणपट्टीच्या किनार्‍याजवळून करण्यात येणार असल्याने या मार्गावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांना कोकणचे निसर्गसौंदर्य पाहता येणार आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार लोकहिताचे काम करत आहे. सहापदरी ग्रीनफिल्ड कोकण एक्स्प्रेस वेच्या कामासाठी शंभर मीटर रूंद भूसंपादनाला शासनाने मान्यता दिली आहे. शेतकऱ्यांनी हा प्रकल्प होण्यासाठी सहकार्य करावे, म्हणजे वेळेत प्रकल्प पूर्ण करता येईल. यावरून मुंबईतील चाकरमान्यांना कमी वेळेत घर गाठता येईल.



चार टप्प्यांत ३८८.४५ कि.मी. होणार बांधकाम


पेण (बळवली गाव) ते रायगड, रत्नागिरी जिल्हा सीमा : ९५.४० कि.मी.


रायगड-रत्नागिरी जिल्हा सीमा ते गुहागर-चिपळूण (रत्नागिरी जिल्हा) : ६९.४९ कि.मी.


गुहागर-चिपळूण (रत्नागिरी जिल्हा) ते रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा सीमा : १२२.८१ कि.मी.


रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा सीमा ते पत्रादेवी महाराष्ट्र-गोवा राज्य सीमा : १००.८४ कि.मी.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

रत्नागिरी नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण

खेडमधील खवटी गावाजवळ खासगी बस आणि कारचा भीषण अपघात, तिघेजण गंभीर जखमी

खेडमधील खवटी गावाजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

रत्नागिरीत युनिट टेस्टमध्ये कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

रत्नागिरी जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षेतील कमी गुणांमुळे भविष्याच्या चिंतेतून आईने हटकले