दिवाकरांची नाट्यछटा

मायभाषा: डॉ. वीणा सानेकर


मराठी साहित्यविश्वातील नाट्यछटा हा महत्त्वाचा साहित्यप्रकार रुजवण्याचे श्रेय शंकर काशिनाथ गर्गे अर्थात दिवाकर यांना जाते. एक व्यक्ती इतर व्यक्तींशी बोलते आहे, असे भासवत संपूर्ण प्रसंग नाट्यपूर्ण रीतीने या साहित्यप्रकारात रचला जातो. दिवाकरांनी प्रथमत: १९११ साली पहिली नाट्यछटा लिहिली. लघू आकारातील हा साहित्यप्रकार सादरीकरणाच्या अंगाने महत्त्वाचा ठरतो. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थीजगतात आजही दिवाकरांच्या नाट्यछटांना महत्त्वाचे स्थान आहे.


विरोध, क्रौर्य, कारुण्य, विसंगती, दंभ अशा अनेक पैलू व भाव-भावनांभोवती दिवाकर आपल्या नाट्यछटा विणत गेले, तर एखादी ‘किती वर्णनात्मक देखावा हा, पण इकडे…’ यासारखी नाट्यछटा त्यांनी ललित निबंधाप्रमाणे रचली आहे. मानवी स्वभावातील विरोध ही त्यांची खास विसंगती आहे. मुलांना व्यवहारज्ञान नाही अशी तक्रार करणारा बाप ‘कार्ट्या अजून कसे तुला जगातले ज्ञान नाही’ या नाट्यछटेत दिसतो. पाहुण्या आलेल्या मित्राच्या खिशातली पडलेली नोट तो लपवतो. त्याचा निरागस मुलगा “मी काकांच्या खिशातून पडलेला कागद बाबांकडे दिला” असे सांगून टाकतो, यावरून त्याला जग समजत नाही, असे म्हणत हे महाशय गीतेवरील प्रवचन ऐकायला जातात. यातला विरोध वाचकाच्या लक्षात येतो, तेव्हा दिवाकरांच्या शैलीचे कौतुक वाटते.


‘हे फारच बोवा’, ‘म्हातारा न इतुका’, ‘हलवाई’ या मानवी स्वभावातील विरोध दाखवणाऱ्या नाट्यछटा आहेत. घरात विधवा मुलगी असताना उतारवयात स्वत:चे दुसरे लग्न करायला निघालेला बाप ‘अशा शुभदिनी रडून कसे चालेल’ या नाट्यछटेत दिसतो, तर ‘कोण मेले म्हणजे रडू येत नाही’ या नाट्यछटेत आनंदी नावाच्या विधवा स्त्रीचा मृत्यू हा विषय आहे. दिवाकर यांना स्त्रियांवरील अन्यायांची व त्यांच्या व्यथांची स्पष्ट जाणीव होती, हे या नाट्यछटांमधून जाणवते.
माणसांबरोबरच दिवाकरांनी मुक्या प्राण्यांच्या वेदना पकडण्याचा प्रयत्न केला आहे. ‘शेवटची किंकाळी’ या नाट्यछटेतून एका कुत्र्याचा आक्रोश मुखर होतो. दिवाकर यांनी काही नाट्यछटांमध्ये काव्यमय शैली योजली आहे, तर काही ठिकाणी रूपकात्मक रचना केली आहे.


‘पंत मेले, राव चढले…’ ही नाट्यछटा म्हणजे एका कुशल नाटककाराच्या शैलीचा आविष्कार आहे. ‘असे केल्याशिवाय जगात भागत नाही’ या नाट्यछटेत मिश्किल अंगाने स्तुतीपाठक व खुशामतखोर यांचे व्यक्तिचित्रच उभे केले आहे.m १९११ सालच्या अखेरीस दिवाकरांना स्पष्टपणे दिसेनासे झाले. आपल्याला अंधत्व आले, तर हा विचार त्यांच्या मनात वारंवार येत असावा. स्वतःचा हा दुखद अनुभव ‘सगळे जग मला दुष्ट नाही का म्हणणार’ या नाट्यछटेतून साकारला आहे. स्वतःला पडलेल्या स्वप्नांंवर त्यांनी लिहिले तसेच आपल्या वेदनेलाही त्यांनी नाट्यछटारूप दिले. जीवनाचे व माणसाचे अनेकविध रंग दिवाकरांनी छोट्याशा साहित्यप्रकारातून रेखाटले. जीवनरंगाच्या नानाविध छटा म्हणजेच दिवाकरांच्या नाट्यछटा!



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment

गॅस टंचाई, पॅरासीटामॉल, खत समस्या ते हेलियम - सामान्य माणसाच्या घरात पोचत आलेले इराण युद्धाचे परिणाम!

विनय जोशी, आयसीआरआर - संघर्ष संशोधन आणि निराकरण संस्था इराणवर अमेरिकन, इस्रायली हल्ले सुरू होऊन आता महिना होत आला.

विदर्भ साहित्य संघाचा नवा अध्याय

वार्तापत्र : विदर्भ विदर्भातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित अशा विदर्भ साहित्य संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत

राज्याच्या उपराजधानीत नवे विधान भवन

वार्तापत्र : विदर्भ नागपूर येथे नवे विधान भवन उभारण्याच्या कामाला आता गती मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

कामगारांच्या जीवावर उठलेले स्फोटक कारखाने

वार्तापत्र : विदर्भ कळमेश्वर तालुक्यात राउळगाव येथील एसबीएल स्फोटक कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण

राष्ट्र, संस्कार आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी श्री गुरू तेग बहादुर यांची अमर शहादत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘‘जिन्हूं न निंदा दुखी करदी है, न उसतत खुश करदी हैः जो मान-अपमान नूं बराबर समझदा

राष्ट्रपतींच्या भेटीने शेगाव संत नगरीत चैतन्याचे वातावरण

वार्तापत्र : विदर्भ देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकतीच बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव या संतनगरीला