आयसीसीकडून वनडे वर्ल्डकप विजेत्या संघाला मिळणार ३३ कोटींचे बक्षीस

Share

नवी दिल्ली : एकदिवसीय विश्वचषकासाठी भारत एकट्याने या भव्य स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची ही पहिलीच वेळ आहे. ही स्पर्धा भारतामध्ये ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या दरम्यान, होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघ जोरदार तयारी करत आहेत. दरम्यान, आयसीसीने विजेते, उपविजेते, उपांत्य फेरीतील आणि गट टप्प्यातील सर्व संघांसाठी बक्षिसांची रक्कम जाहीर केली. यात आयसीसीकडून अंदाजे ८३ कोटी रुपये बक्षिसांसाठी रक्कम वितरीत करेल.

यापैकी, विजेत्याला रु. ३३ कोटी तर उपविजेत्याला १७ कोटी मिळतील. याचा अर्थ विजेत्या संघासोबत अतिम फेरीत हरणा-या संघाला देखील मोठे बक्षीस मिळणार आहे.

उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघाला सुमारे ६ कोटी रुपये आणि गट फेरीतून बाहेर पडलेल्या संघाला सुमारे ८२ लाख रुपये मिळतील. यावेळी जाहीर करण्यात आलेली बक्षीस रक्कम गेल्या हंगामाप्रमाणेच आहे.

परिषदेने पूर्वीच्या सुमारे ८३ कोटी रुपयांच्या बक्षीस रकमेत कोणताही बदल केलेला नाही. गेल्या मोसमातील चॅम्पियन इंग्लंडला सुमारे ३३ कोटी रुपये मानधन मिळाले होते.

टी-२० विश्वचषक विजेत्याला १३ कोटी रुपये

गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० विश्वचषक जिंकणा-या इंग्लंड संघाला १३ कोटी ५ लाख ३५ हजार रुपये मिळाले होते. तर उपविजेत्या पाकिस्तान संघाला ६ कोटी ५२ लाख ६४ हजार रुपये मिळाले होते.

एकदिवसीय विश्वचषक भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ४६ दिवस चालेल, ज्यामध्ये ४८ सामने खेळले जातील. पहिला सामना हा ५ ऑक्टोबरला अहमदाबाद येथे होणार आहे. हा सामना मागील विश्वचषक विजेते आणि उपविजेते इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे.

१४ तारखेला भारत-पाकिस्तान सामना

टीम इंडियाचा पहिला सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. तर भारत-पाकिस्तान सामना १४ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

Tags: icc

Recent Posts

कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चार मराठी चित्रपट प्रदर्शित होणार

मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…

58 minutes ago

Summer Food Alert : उन्हाळ्यात शरीराची उष्णता वाढवणारे ‘हे’ पदार्थ टाळा

मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…

1 hour ago

Health Tips: कडक उन्हामुळे चक्कर येत असेल तर हे पेय प्या!

तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…

1 hour ago

प्रसिद्ध डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी महिलेला पोलीस कोठडी

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…

1 hour ago

Central Railway News : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; बदलापुरातील फलाट क्रमांक १ कायमस्वरूपी बंद!

बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…

2 hours ago

संग्राम थोपटे २२ एप्रिल रोजी भाजपात प्रवेश करणार, काँग्रेसला दिली सोडचिठ्ठी

पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार महायुतीच्या वाटेवर…

2 hours ago