आयसीसीकडून वनडे वर्ल्डकप विजेत्या संघाला मिळणार ३३ कोटींचे बक्षीस

नवी दिल्ली : एकदिवसीय विश्वचषकासाठी भारत एकट्याने या भव्य स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची ही पहिलीच वेळ आहे. ही स्पर्धा भारतामध्ये ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या दरम्यान, होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघ जोरदार तयारी करत आहेत. दरम्यान, आयसीसीने विजेते, उपविजेते, उपांत्य फेरीतील आणि गट टप्प्यातील सर्व संघांसाठी बक्षिसांची रक्कम जाहीर केली. यात आयसीसीकडून अंदाजे ८३ कोटी रुपये बक्षिसांसाठी रक्कम वितरीत करेल.


यापैकी, विजेत्याला रु. ३३ कोटी तर उपविजेत्याला १७ कोटी मिळतील. याचा अर्थ विजेत्या संघासोबत अतिम फेरीत हरणा-या संघाला देखील मोठे बक्षीस मिळणार आहे.


उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघाला सुमारे ६ कोटी रुपये आणि गट फेरीतून बाहेर पडलेल्या संघाला सुमारे ८२ लाख रुपये मिळतील. यावेळी जाहीर करण्यात आलेली बक्षीस रक्कम गेल्या हंगामाप्रमाणेच आहे.


परिषदेने पूर्वीच्या सुमारे ८३ कोटी रुपयांच्या बक्षीस रकमेत कोणताही बदल केलेला नाही. गेल्या मोसमातील चॅम्पियन इंग्लंडला सुमारे ३३ कोटी रुपये मानधन मिळाले होते.



टी-२० विश्वचषक विजेत्याला १३ कोटी रुपये


गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० विश्वचषक जिंकणा-या इंग्लंड संघाला १३ कोटी ५ लाख ३५ हजार रुपये मिळाले होते. तर उपविजेत्या पाकिस्तान संघाला ६ कोटी ५२ लाख ६४ हजार रुपये मिळाले होते.


एकदिवसीय विश्वचषक भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ४६ दिवस चालेल, ज्यामध्ये ४८ सामने खेळले जातील. पहिला सामना हा ५ ऑक्टोबरला अहमदाबाद येथे होणार आहे. हा सामना मागील विश्वचषक विजेते आणि उपविजेते इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे.



१४ तारखेला भारत-पाकिस्तान सामना


टीम इंडियाचा पहिला सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. तर भारत-पाकिस्तान सामना १४ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

Comments
Add Comment

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचा २९ ऑक्टोबरपासून थरार

दुपारी १.४५ वाजता सामन्यांना होणार सुरुवात मुंबई  : भारतीय संघाचा सध्या ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे. नुकतीच तीन

श्रेयस अय्यर आयसीयूमधून बाहेर

गंभीर दुखापतीनंतर प्रकृती स्थिर मुंबई  : भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज श्रेयस अय्यर याची प्रकृती अद्यापही

मला चिंता नाही, सूर्यकुमार यादवच्या खराब फॉर्मवर प्रशिक्षक गौतम गंभीरचा पूर्ण पाठिंबा!

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आगामी टी-२० मालिकेपूर्वी टीम इंडियाचे मुख्य

भारत-ऑस्ट्रेलिया महिला वर्ल्डकप उपांत्य सामना पावसामुळे रद्द झाल्यास काय होईल? वाचा नियम

मुंबई : महिला वनडे वर्ल्डकप २०२५ आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, क्रिकेट चाहत्यांना उपांत्य फेरीतील रोमांचक

भारताला मोठा धक्का! प्रतीका रावल दुखापतीमुळे विश्वचषक उपांत्य फेरीतून बाहेर

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर प्रतीका रावल हिला झालेल्या दुखापतीमुळे ती

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मालिका, भारत-आफ्रिका आमनेसामने; दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर

मुंबई : ऑस्ट्रेलिया मालिकेचं आव्हान संपण्याआधीच टीम इंडिया आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेची तयारी करत