IND vs AUS: मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध रचला इतिहास

  121

मोहाली: भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेला २२ सप्टेंबरपासून सुरूवात केली आहे. पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने पहिल्यांदा गोलंदाजी करताना कांगारूंना २७६ धावांवर रोखले. आशिया चषकातील सामन्यांमध्ये प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर ठेवण्यात आलेल्या अनुभवी मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जबरदस्त खेळ केला आहे.


ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा कर्णधार केएल राहुलने टॉस जिंकत गोलंदाजी निवडली. मोहम्मद शमीने पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट मिळवताना संघाला शानदार सुरूवात करून दिली. भारताचे गोलंदाज पाहुण्या संघावर तुटून पडले आणि ऑस्ट्रेलियाचा डाव २७६ धावांवर आटोपला.


१९ महिन्यानंतर एकदिवसीय सामना खेळत असलेल्या आर अश्विननेही एक विकेट मिळवला. जसप्रीत बुमराहआणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी १-१ विकेट आपल्या नावे केला. खरा जलवा तर शमीने दाखवला त्याने ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ तंबूत धाडला.


आशिया चषकादरम्यान मोहम्मद शमीला कर्णधार रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविड यांनी प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर ठेवले होते. जसप्रीत बुमराह खासगी कारणामुळे श्रीलंकेवरून भारतात परतला तेव्हा त्याची जागा शमीला देण्यात आली. मात्र जसे बुमराह परतला तसे शमीला बाहेर करण्यात आले. शमीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात १० ओव्हरमध्ये ५१ धावा देत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ विकेट मिळवल्या.


यासोबतच त्याने नवा इतिहास रचला. भारतात खेळताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत ५ विकेट घेणारा शमी पहिला भारतीय वेगवान गोलंदाज बनला आहे. याआधी कोणत्याही भारतीयाला ही कामगिरी करता आलेली नाही.

Comments
Add Comment

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार

इंग्लंडचा दुसऱ्या कसोटीसाठीचा संघ जाहीर, आर्चरचे पुनरागमन

Archer included in England squad for second Test लंडन : इंग्लंड आणि भारत यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला