IND vs AUS: भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय, मालिकेत १-० अशी आघाडी

मोहाली: वर्ल्डकपच्या आधी सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या(india vs australia) मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ५ विकेट राखत विजय मिळवला आहे. शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला हरवले.


भारताने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार लोकेश राहुलचा हा निर्णय मोहम्मद शमीने योग्य ठरवला. शमीने या सामन्यात ५ विकेट घेत इतिहास रचला. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाला तीनशे धावांचा टप्पा गाठता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून डेविड वॉर्नरने ५२ धावा केल्या तर जोश इग्निसने ४५ धावांची खेळी केली.


त्यानंतर प्रत्युत्तर देण्यासाठी भारताचा संघ मैदानात उतरला. भारताची सुरूवात दमदार झाली. भारताच्या सलामीवीरांनी अर्धशतक ठोकत भारताच्या विजयाचा पाया मजबूत रचला. ऋतुराज गायकवाडने ७१ धावांची खेळी केली तर शुभमन गिलने ७४ धावांची खेळी केली. त्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यरला फक्त ३ धावांची खेळी केली. अय्यर झटपट बाद झाल्यानंतर कर्णधार शुभमन गिलने आपल्या हाती कमान घेतली. लोकेश राहुलने नाबाद ५८ धावांची खेळी केली. तर सूर्यकुमार यादवनेही त्याला चांगली साथ दिली.


सूर्यकुमार यादव ५० धावा करून बाद झाला. इशान किशनही या सामन्यात मोठी खेळी करू शकला नाही. तो १८ धावांवर असताना पॅट कमिन्सने त्याला माघारी धाडले. भारताने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

Comments
Add Comment

आयसीसी क्रमवारीत भारतीय महिलांचा डंका

शफाली, रेणुकाची झेप; दीप्तीचा 'नंबर १' कायम नवी दिल्ली: आयसीसीच्या ताज्या महिला टी-२० क्रमवारीत भारतीय खेळाडूंनी

विराटसाठी २८ हजार धावांचा टप्पा हाकेच्या अंतरावर

सचिन-संगकाराच्या क्लबमध्ये एन्ट्रीसाठी २५ धावांची गरज मुंबई : भारतीय क्रिकेटचा 'किंग' विराट कोहली पुन्हा एकदा

भारताचे मिशन ‘क्लीन स्वीप’ यशस्वी

हरमनप्रीतच्या ६८ धावा; मालिका ५-० ने खिशात तिरुवनंतपुरम : भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२०

टी-२० सामन्यात सोनम येशेचा ८ बळींचा जागतिक विक्रम

भूतानच्या फिरकीपटूने म्यानमारविरुद्ध रचला इतिहास; ४ षटकांत दिल्या ७ धावा भूतान : फिरकीपटू सोनम येशे याने इतिहास

न्यूझीलंडविरुद्ध वनडेतून ३ स्टार खेळाडूंचा पत्ता कट ? दिग्गजांचं कमबॅक ?

मुंबई : जानेवारीत न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी बीसीसीआय लवकरच संघाची घोषणा करणार

गौतम गंभीरच भारताचा कसोटी प्रशिक्षक

नवी दिल्ली : गौतम गंभीर भारताचा कसोटी प्रशिक्षक म्हणू्न कायम राहील. बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट