IND vs AUS: भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय, मालिकेत १-० अशी आघाडी

मोहाली: वर्ल्डकपच्या आधी सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या(india vs australia) मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ५ विकेट राखत विजय मिळवला आहे. शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला हरवले.


भारताने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार लोकेश राहुलचा हा निर्णय मोहम्मद शमीने योग्य ठरवला. शमीने या सामन्यात ५ विकेट घेत इतिहास रचला. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाला तीनशे धावांचा टप्पा गाठता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून डेविड वॉर्नरने ५२ धावा केल्या तर जोश इग्निसने ४५ धावांची खेळी केली.


त्यानंतर प्रत्युत्तर देण्यासाठी भारताचा संघ मैदानात उतरला. भारताची सुरूवात दमदार झाली. भारताच्या सलामीवीरांनी अर्धशतक ठोकत भारताच्या विजयाचा पाया मजबूत रचला. ऋतुराज गायकवाडने ७१ धावांची खेळी केली तर शुभमन गिलने ७४ धावांची खेळी केली. त्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यरला फक्त ३ धावांची खेळी केली. अय्यर झटपट बाद झाल्यानंतर कर्णधार शुभमन गिलने आपल्या हाती कमान घेतली. लोकेश राहुलने नाबाद ५८ धावांची खेळी केली. तर सूर्यकुमार यादवनेही त्याला चांगली साथ दिली.


सूर्यकुमार यादव ५० धावा करून बाद झाला. इशान किशनही या सामन्यात मोठी खेळी करू शकला नाही. तो १८ धावांवर असताना पॅट कमिन्सने त्याला माघारी धाडले. भारताने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

Comments
Add Comment

शुभमन गिलच्या तब्येतीमध्ये सुधारणा, मात्र दुसरा कसोटी सामना खेळणार का?

कोलकाता: कोलकातामधील ईडन गार्डन्सवर झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय

गुवाहाटीत पहिल्यांदाच होणार कसोटी सामना! दक्षिण आफ्रिकेच्या पराभवासाठी काय असणार भारताची रणनीती ?

गुहावटी: भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून हार पत्कारावी लागली. फिरकीपटूंसाठी फायदेशीर

केशव महाराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी हॅटट्रिक नाही ! का जाणून घ्या

कोलकाता : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा

गुवाहाटी कसोटीपूर्वी भारतावर दबाव; दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या तपासणीने वाढली चर्चा

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना भारताने गमावला.

'महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास

टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील फुटबॉल

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे