मोहाली: वर्ल्डकपच्या आधी सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या(india vs australia) मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ५ विकेट राखत विजय मिळवला आहे. शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला हरवले.
भारताने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार लोकेश राहुलचा हा निर्णय मोहम्मद शमीने योग्य ठरवला. शमीने या सामन्यात ५ विकेट घेत इतिहास रचला. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाला तीनशे धावांचा टप्पा गाठता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून डेविड वॉर्नरने ५२ धावा केल्या तर जोश इग्निसने ४५ धावांची खेळी केली.
त्यानंतर प्रत्युत्तर देण्यासाठी भारताचा संघ मैदानात उतरला. भारताची सुरूवात दमदार झाली. भारताच्या सलामीवीरांनी अर्धशतक ठोकत भारताच्या विजयाचा पाया मजबूत रचला. ऋतुराज गायकवाडने ७१ धावांची खेळी केली तर शुभमन गिलने ७४ धावांची खेळी केली. त्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यरला फक्त ३ धावांची खेळी केली. अय्यर झटपट बाद झाल्यानंतर कर्णधार शुभमन गिलने आपल्या हाती कमान घेतली. लोकेश राहुलने नाबाद ५८ धावांची खेळी केली. तर सूर्यकुमार यादवनेही त्याला चांगली साथ दिली.
सूर्यकुमार यादव ५० धावा करून बाद झाला. इशान किशनही या सामन्यात मोठी खेळी करू शकला नाही. तो १८ धावांवर असताना पॅट कमिन्सने त्याला माघारी धाडले. भारताने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
मुंबईतील अतिवृष्टीमुळे विधानसभा कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता मुंबई : मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाचा फटका रस्तेवाहतुकीसह…
मुंबई : मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच जोरदार पाऊस (Rain in Mumbai) कोसळत आहे. यामुळे मुंबईच्या अनेक…
पुणे : पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रन प्रकरण घडले आहे. पुण्यात गस्त घालणा-या पोलिसांच्या…
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्घ जिल्ह्यात जोरदार पाऊस जगबुडीने ओलांडली धोक्याची पातळी, खेड, चिपळूण, महाड, दापोली या…
मुंबई : मुंबई महानगरात काल मध्यरात्रीनंतर १ वाजेपासून ते आज सकाळी ७ वाजेपर्यंत या सहा…
मुंबई : मुंबई आणि उपनगरांत रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक भागांत पाणी साचले…