IND vs AUS: भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय, मालिकेत १-० अशी आघाडी

मोहाली: वर्ल्डकपच्या आधी सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या(india vs australia) मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ५ विकेट राखत विजय मिळवला आहे. शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला हरवले.


भारताने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार लोकेश राहुलचा हा निर्णय मोहम्मद शमीने योग्य ठरवला. शमीने या सामन्यात ५ विकेट घेत इतिहास रचला. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाला तीनशे धावांचा टप्पा गाठता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून डेविड वॉर्नरने ५२ धावा केल्या तर जोश इग्निसने ४५ धावांची खेळी केली.


त्यानंतर प्रत्युत्तर देण्यासाठी भारताचा संघ मैदानात उतरला. भारताची सुरूवात दमदार झाली. भारताच्या सलामीवीरांनी अर्धशतक ठोकत भारताच्या विजयाचा पाया मजबूत रचला. ऋतुराज गायकवाडने ७१ धावांची खेळी केली तर शुभमन गिलने ७४ धावांची खेळी केली. त्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यरला फक्त ३ धावांची खेळी केली. अय्यर झटपट बाद झाल्यानंतर कर्णधार शुभमन गिलने आपल्या हाती कमान घेतली. लोकेश राहुलने नाबाद ५८ धावांची खेळी केली. तर सूर्यकुमार यादवनेही त्याला चांगली साथ दिली.


सूर्यकुमार यादव ५० धावा करून बाद झाला. इशान किशनही या सामन्यात मोठी खेळी करू शकला नाही. तो १८ धावांवर असताना पॅट कमिन्सने त्याला माघारी धाडले. भारताने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

Comments
Add Comment

IND vs AUS : सेमीफायनलवर पावसाचं सावट, सामना रद्द झाल्यास काय होणार?

नवी मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक आता अत्यंत रोमांचक वळणावर पोहोचला आहे. उपांत्य फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया

हर्षित राणाची जागा जाणार? टीम इंडियात आणखी एका खेळाडूचे पुनरागमन !

मुंबई : टीम इंडियामध्ये आणखी एक वरिष्ठ खेळाडू संघात परतण्याच्या तयारीत असून, त्याच्या पुनरागमनामुळे मुख्य

टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरची प्रकृती सुधारतेय: भारतात कधी परतणार?

ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर पुन्हा एकदा दुखापतीच्या संकटात सापडला आहे. नुकताच

भारत - ऑस्ट्रेलिया पहिला T20 सामना २९ ऑक्टोबरला, पहा टीम इंडियाची संभाव्य Playing XI

मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचा पराभव झाला. ही मालिका ऑस्ट्रेलियाने २-१

बाईपण भारी देवा ! ७ महिन्यांची गरोदर तरीही १४५ किलो वजन उचलत जिंकली वेटलिफ्टिंग स्पर्धा

दिल्ली : आयुष्यात काहीही अशक्य नसत फक्त जिद्द असायला हवी . दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल सोनिका यादव यांनी हे सिद्ध

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचा २९ ऑक्टोबरपासून थरार

दुपारी १.४५ वाजता सामन्यांना होणार सुरुवात मुंबई  : भारतीय संघाचा सध्या ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे. नुकतीच तीन