IND Vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहित शर्मा, विराट कोहलीला का दिला आराम, समोर आले कारण

मुंबई: वर्ल्डकपच्या आधी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या(india vs australia) वनडे मालिकेत कर्णधार रोहित शर्मा(rohit sharma) आणि विराट कोहलीला(virat kohli) आराम देण्याच्या निर्णयावरून सवाल उपस्थित केले जात आहेत. वनडे मालिका सुरू होण्याच्या एक दिवस आधीच प्रशिक्षक राहुल द्रविडने या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल द्रविडचे म्हणणे आहे की वर्ल्डकप पाहता विराट कोहली आणि रोहित शर्माला आराम देण्यात आला आहे.


विराट कोहली आणि रोहित शर्मा ऑस्ट्रेलयाविरुद्ध पहिल्या दोन वनडे सामन्यात संघाचा भाग असणार नाहीत. दरम्यान, तिसऱ्या वनडेसाठी हे दोघेही संघात परतणार आहेत. राहुल द्रविड म्हणाला, आराम देण्याचा निर्णय खेळाडूंशी बोलूनच घेतला आहे. वर्ल्डकपच्या आधी हे दोन्ही खेळाडू शारिरीक आणि मानसिकरित्या फिट असणे संघासाठी महत्त्वाचे आहे.


याआधीही गेल्या महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध खेळवण्यात आलेल्या वनडे मालिकेतही रोहित शर्मा आणि विराट कोहलीला शेवटच्या दोन सामन्यांमध्ये आराम देण्यात आला. आशिया चषकात जरी कर्णधार रोहित शर्मा सर्व सामन्यांमध्ये प्लेईंग ११चा भाग होता. मात्र विराट कोहलीला फायनलआधी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात आराम देण्यात आला होता.



विराट आणि रोहितवरून केले सवाल


वर्ल्डकपआधी या दोन्ही खेळाडूंना कमी वनडे सामने खेळायला देणे यावरून सवाल उपस्थित केले जात होते. विराट कोहली जगातील सर्वात फिट क्रिकेटर मानला जातो. असे असतानाही इतक्या सामन्यात विराटला आराम देणे हे समजण्याच्या पलीकडे आहे. इतकंच नव्हे तर गेल्या वर्षी झालेल्या टी-२० वर्ल्डकपनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली सगळ्यात छोट्या फॉरमॅटमध्ये टीम इंडियासाठी एकदाही मोदानात उतरलेले नाहीत. टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये या दोन्ही खेळाडूंना पुन्हा संधी मिळणार की नाही यावरही आता सवाल केले जात आहेत.

Comments
Add Comment

Ben Austin Dies News : एक चेंडू, सराव आणि जीवन संपलं…भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यापूर्वी १७ वर्षीय क्रिकेटपटूचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

ऑस्ट्रेलिया : सध्या भारतीय संघ (Indian Team) ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून, दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी-२०

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वूमन्स सेमी फायनल सामना पावसामुळे रद्द झाल्यास फायनलचं तिकीट कोणाला मिळणार ? जाणून घ्या नियम

मुंबई : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ ची दुसरी सेमी फायनल आज नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये

भारत ऑस्ट्रेलिया दुसऱ्या T- २० मॅच च्या आधी वाईट बातमी, युवा खेळाडूचा बॉल लागून मृत्यू

मुंबई : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला भारतीय संघ कांगारूं विरुद्ध पाच टी - २० सामन्यांची मालिका खेळत आहे. या

Shreyas Iyer Health Update : 'स्टार बॅट्समन' श्रेयस अय्यरकडून मोठी अपडेट! गंभीर दुखापतीनंतर ICU मधून भावनिक पोस्ट, चाहत्यांना दिलासा!

मुंबई : टीम इंडियाचा स्टार फलंदाज (Star Batsman) श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या एका गंभीर दुखापतीमुळे रुग्णालयात उपचार घेत आहे.

हरमनप्रीत कौर आणि तो ऐतिहासिक विक्रम: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी 'त्या' १७१ धावांची चर्चा!

नवी दिल्ली : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या

WC Semi-Final: पहिल्यांदाच वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचली दक्षिण आफ्रिका, इंग्लंडला १२५ धावांनी हरवले

मुंबई : आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५ मध्ये मोठा उलटफेर झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या