IND Vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहित शर्मा, विराट कोहलीला का दिला आराम, समोर आले कारण

मुंबई: वर्ल्डकपच्या आधी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या(india vs australia) वनडे मालिकेत कर्णधार रोहित शर्मा(rohit sharma) आणि विराट कोहलीला(virat kohli) आराम देण्याच्या निर्णयावरून सवाल उपस्थित केले जात आहेत. वनडे मालिका सुरू होण्याच्या एक दिवस आधीच प्रशिक्षक राहुल द्रविडने या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल द्रविडचे म्हणणे आहे की वर्ल्डकप पाहता विराट कोहली आणि रोहित शर्माला आराम देण्यात आला आहे.


विराट कोहली आणि रोहित शर्मा ऑस्ट्रेलयाविरुद्ध पहिल्या दोन वनडे सामन्यात संघाचा भाग असणार नाहीत. दरम्यान, तिसऱ्या वनडेसाठी हे दोघेही संघात परतणार आहेत. राहुल द्रविड म्हणाला, आराम देण्याचा निर्णय खेळाडूंशी बोलूनच घेतला आहे. वर्ल्डकपच्या आधी हे दोन्ही खेळाडू शारिरीक आणि मानसिकरित्या फिट असणे संघासाठी महत्त्वाचे आहे.


याआधीही गेल्या महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध खेळवण्यात आलेल्या वनडे मालिकेतही रोहित शर्मा आणि विराट कोहलीला शेवटच्या दोन सामन्यांमध्ये आराम देण्यात आला. आशिया चषकात जरी कर्णधार रोहित शर्मा सर्व सामन्यांमध्ये प्लेईंग ११चा भाग होता. मात्र विराट कोहलीला फायनलआधी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात आराम देण्यात आला होता.



विराट आणि रोहितवरून केले सवाल


वर्ल्डकपआधी या दोन्ही खेळाडूंना कमी वनडे सामने खेळायला देणे यावरून सवाल उपस्थित केले जात होते. विराट कोहली जगातील सर्वात फिट क्रिकेटर मानला जातो. असे असतानाही इतक्या सामन्यात विराटला आराम देणे हे समजण्याच्या पलीकडे आहे. इतकंच नव्हे तर गेल्या वर्षी झालेल्या टी-२० वर्ल्डकपनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली सगळ्यात छोट्या फॉरमॅटमध्ये टीम इंडियासाठी एकदाही मोदानात उतरलेले नाहीत. टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये या दोन्ही खेळाडूंना पुन्हा संधी मिळणार की नाही यावरही आता सवाल केले जात आहेत.

Comments
Add Comment

श्रीलंका टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

मुंबई : वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघ अखेरीस मोठ्या विश्रांतीनंतर मैदानावर उतरणार आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक

कटकमध्ये भारताचा १०१ धावांनी विजय, दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव

कटक : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी २० मालिकेत भारताने विजयाने शुभारंभ केला. भारताने कटकमध्ये झालेला सामना १०१

भारताचे द. आफ्रिकेसमोर १७६धावांचे लक्ष्य, हार्दिक पांड्याचे धमाकेदार अर्धशतक

कटक (वृत्तसंस्था) : कटकच्या मैदानात सध्या हार्दिक पांड्याच्या बॅटने आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली.

IPL 2026 Players Auction : अंतिम यादी जाहीर; ७७ जागांसाठी ३५० खेळाडूंवर बोली, त्यापैकी २४० भारतीय

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगचा २०२६ चा खेळाडू लिलाव १६ डिसेंबरला अबुधाबी येथे होणार असून, या वेळी एकूण ३५०

IPL 2026 Auction: टॉप 5 गटात 34 खेळाडूंवर लागणार बोली

IPL 2026 मिनी लिलावासाठी एकूण 350 खेळाडूंची नावं निश्चित करण्यात आलेली आहे . टॉप खेळाडूंसाठी पाच गट करण्यात आले आहेत.

Fruad In Cricket : क्रिकेटविश्वातला महाघोटाळा, एकाच पत्त्यावर आढळले १२ खेळाडू

पुद्दुचेरी : भारतीय क्रिकेटचा जागतिक पातळीवर दबदबा आहेच. बीसीसीआयची आर्थिक ताकद, आयपीएलसारख्या जगातील सर्वात