IND Vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहित शर्मा, विराट कोहलीला का दिला आराम, समोर आले कारण

  111

मुंबई: वर्ल्डकपच्या आधी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या(india vs australia) वनडे मालिकेत कर्णधार रोहित शर्मा(rohit sharma) आणि विराट कोहलीला(virat kohli) आराम देण्याच्या निर्णयावरून सवाल उपस्थित केले जात आहेत. वनडे मालिका सुरू होण्याच्या एक दिवस आधीच प्रशिक्षक राहुल द्रविडने या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल द्रविडचे म्हणणे आहे की वर्ल्डकप पाहता विराट कोहली आणि रोहित शर्माला आराम देण्यात आला आहे.


विराट कोहली आणि रोहित शर्मा ऑस्ट्रेलयाविरुद्ध पहिल्या दोन वनडे सामन्यात संघाचा भाग असणार नाहीत. दरम्यान, तिसऱ्या वनडेसाठी हे दोघेही संघात परतणार आहेत. राहुल द्रविड म्हणाला, आराम देण्याचा निर्णय खेळाडूंशी बोलूनच घेतला आहे. वर्ल्डकपच्या आधी हे दोन्ही खेळाडू शारिरीक आणि मानसिकरित्या फिट असणे संघासाठी महत्त्वाचे आहे.


याआधीही गेल्या महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध खेळवण्यात आलेल्या वनडे मालिकेतही रोहित शर्मा आणि विराट कोहलीला शेवटच्या दोन सामन्यांमध्ये आराम देण्यात आला. आशिया चषकात जरी कर्णधार रोहित शर्मा सर्व सामन्यांमध्ये प्लेईंग ११चा भाग होता. मात्र विराट कोहलीला फायनलआधी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात आराम देण्यात आला होता.



विराट आणि रोहितवरून केले सवाल


वर्ल्डकपआधी या दोन्ही खेळाडूंना कमी वनडे सामने खेळायला देणे यावरून सवाल उपस्थित केले जात होते. विराट कोहली जगातील सर्वात फिट क्रिकेटर मानला जातो. असे असतानाही इतक्या सामन्यात विराटला आराम देणे हे समजण्याच्या पलीकडे आहे. इतकंच नव्हे तर गेल्या वर्षी झालेल्या टी-२० वर्ल्डकपनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली सगळ्यात छोट्या फॉरमॅटमध्ये टीम इंडियासाठी एकदाही मोदानात उतरलेले नाहीत. टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये या दोन्ही खेळाडूंना पुन्हा संधी मिळणार की नाही यावरही आता सवाल केले जात आहेत.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार