Asia Cup Prize: आशिया चषक जिंकल्यावर टीम इंडियावर पैशांचा वर्षाव

कोलंबो: भारतीय संघाने आशिया चषक २०२३च्या(asia cup 2023) अंतिम सामन्यात श्रीलंकेला १० विकेटनी मात देत तब्बल ५ वर्षांनी हा खिताब आपल्या नावे केला. टीम इंडियाने आशिया चषकाच्या इतिहासात आठव्यांदा या ट्रॉफीवर आपले नाव कोरले.


या स्पर्धेतील विजेत्या संघाला म्हणजेच भारतीय संघाला बक्षीस म्हणून मोठी रक्कम मिळाली आहे. फायनल सामन्यात टीम इंडियाच्या मोहम्मद सिराजने ६ विकेट मिळवत विजयात मोलाची कामगिरी बजावली.


मोहम्मद सिराजने या सामन्यात ६ विकेट मिळवण्यासोबतच श्रीलंकेच्या संघाला ५० धावांवर रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. भारताने श्रीलंकेचे ५० धावांचे आव्हान केवळ ६.१ षटकांत पूर्ण केले, टीम इंडियाला यानंतर बक्षीस म्हणून १५०,००० यूएस डॉलर मिळाले. तर श्रीलंकेच्या संघाला उपविजेता म्हणून ७५,००० यूएस डॉलरची रक्कम मिळाली.



कुलदीप यादवला प्लेयर ऑफ दी टूर्नामेंटचा खिताब


आशिया चषक २०२३मध्ये भारतीय संघाच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. यात कुलदीप यादवचे नाव आघाडीवर आहे. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ५ आणि श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात ४ विकेट मिळवल्या. कुलदीपने या सामन्यात शानदार कामगिरी केली त्याला प्लेयर ऑफ दी टूर्नामेंटचा पुरस्कार देण्यात आला. यात त्याला १५,००० यूएस डॉलरचे बक्षीस देण्यात आले.


मोहम्मद सिराजने फायनल सामन्यात मॅच विनिंग कामगिरी केली. त्याला प्लेयर ऑफ दी मॅचचा खिताब देण्यात आला. सिराजला या अवॉर्डच्या रूपात ५ हजार डॉलर इतकी रक्कम मिळाली.

Comments
Add Comment

केशव महाराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी हॅटट्रिक नाही ! का जाणून घ्या

कोलकाता : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा

गुवाहाटी कसोटीपूर्वी भारतावर दबाव; दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या तपासणीने वाढली चर्चा

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना भारताने गमावला.

'महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास

टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील फुटबॉल

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे

IND vs SA Test : अवघ्या तीन दिवसांत भारताचा पराभव, मालिकेत पिछाडी, गुवाहाटीत ‘करो या मरो’ सामना

कोलकाता : ईडन गार्डन्सवरील पहिली कसोटी अवघ्या तीन दिवसांत संपली. भारताला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला.

कोलकाता कसोटीचा शेवटचा डाव सुरू, जयस्वाल पाठोपाठ केएल राहुलही बाद

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्स