Use of satellites : उपग्रहांचा उपयोग

Share
  • कथा : प्रा. देवबा पाटील

उपग्रहांच्या साहाय्याने सभोवतीच्या वातावरणाचा, हवामानाचा अभ्यास, पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राची माहिती, ग्रह-उपग्रहांचे नि विविध ता­ऱ्यांचे निरीक्षण व छायाचित्रण, विश्वकिरणांचा, उल्का, लघुग्रह, धूमकेतूंचा अभ्यास करता येतो.

दीपा व संदीप हे बहीणभाऊ यक्षाच्या यानातून अवकाशप्रवास करीत असताना त्यांचे संगणकाकडे बारीक लक्ष होते. एवढ्यात त्यांना संगणकावर काहीतरी संदेश आलेला दिसला. तो बघून “कोणत्याही कृत्रिम उपग्रहावरून पृथ्वीवर व पृथ्वीवरून उपग्रहावर संदेश कसे जात येत राहतात?” संदीपने प्रश्न केला.

यक्ष सांगू लागला, “कोणत्याही कृत्रिम उपग्रहाकडून पृथ्वीकडे व पृथ्वीकडून उपग्रहाकडे हे सारे संदेश रेडिओ तरंगांद्वारे येत-जात राहतात. उपग्रहातील प्रक्षेपक उपकरण उपग्रहाच्या निरीक्षणाचे विविध संदेश पृथ्वीकडे पाठवितो. पृथ्वीवरील ग्रहणकेंद्रात ते संदेश ग्रहण केल्या जातात. शास्त्रज्ञ त्यांचा अभ्यास करून त्यावरून उचित निष्कर्ष काढतात. उपग्रहांच्या साहाय्याने पृथ्वीभोवतीच्या वातावरणाचा, हवामानाचा अभ्यास, पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राची माहिती, ग्रह-उपग्रहांचे नि विविध ता­ऱ्यांचे निरीक्षण व छायाचित्रण, विश्वकिरणांचा अभ्यास, उल्का, लघुग्रह, धूमकेतूंचा अभ्यास करता येतो. उपग्रहांच्या साहाय्याने रेडिओ, दूरदर्शन संदेशांचे वहन सुलभ होते.”

यक्ष पुढे सांगू लागला, “दूर अंतरावरून एखाद्या यंत्राकडून पाठविल्या जाणाऱ्या संकेत ग्रहण करण्याच्या पद्धतीला टेलिमिटरिंग म्हणतात. अंतराळात भ्रमण करणा­ऱ्या यानांत आणि पृथ्वीवरील संपर्क (प्रक्षेपण व ग्रहण) केंद्रात दळणवळण-संदेशवहन प्रस्थापित करणे याला टेलिमिटरी किंवा दूरमापन म्हणतात. हे सारे संदेश रेडिओ लहरींद्वारे येत-जात राहतात.”

“कृत्रिम उपग्रह किती काळापर्यंत कार्य करतो?” दीपाने विचारले.

“त्याचा शेवट कसा होतो?” संदीपने प्रश्न दीपाच्या प्रश्नासोबत आपला प्रश्न जोडला.

“जोपर्यंत उपग्रहांना त्यावरील सौरघट विद्युत ऊर्जा पुरवतात, तोपर्यंत उपग्रह कार्यरत राहतात. जेव्हा उपग्रह आकाशात फिरतात, तेव्हा त्या सौरघाटांवर सूक्ष्म उल्काकणांचा व अवकाशातील इतर काही अतिसूक्ष्म अणूकणांचा मारा होत राहतो. त्यामुळे सौरघटांना चरे पडतात व त्यांची वीजनिर्मिती करण्याची क्षमता कमी होत जाते. काही कालावधीनंतर ते यानाला पुरेशी वीज पुरवू शकत नाही. त्यामुळे उपग्रहातील इलेक्ट्रॉनिक यंत्रणा बंद पडते व उपग्रहाचे कार्य थांबते. अशा रीतीने उपग्रहाचा शेवट होतो. उपग्रहाचे कार्य थांबले म्हणजे त्याच्यावर नियंत्रण ठेवता येत नाही. कधी कधी तो अवकाशात भरकटतो. अशा स्थितीत तो काही वर्षे फिरत राहतो. फिरता फिरता त्याची कक्षा लहान-लहान होत जाते. शेवटी तो पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतो. वातावरणाशी घर्षण होऊन त्याचे तुकडे होतात व ते जळून जातात किंवा पृथ्वीवर पडतात.” यक्षाने सांगितले.

“एवढा अफाट खर्च करून कशासाठी पाठवतात हे उपग्रह आकाशात?” संदीपने प्रश्न केला.

यक्ष म्हणाला, “अशा उपग्रहांचा उपयोग पृथ्वीवासीयांना त्या संबंधित ग्रहाबद्दलची अनेक उपयुक्त शास्त्रीय माहिती पुरविणे यासाठी होतो. तसेच ते पृथ्वी निरीक्षण करतात, पृथ्वीभोवतीच्या हवामानाची माहिती पृथ्वीवर पाठवतात, त्यांच्या साहाय्याने वादळवा­ऱ्यांचा, पूर-महापुरांचा अंदाज करता येतो. शत्रू सैन्याच्या हालचाल्लींची नोंद ठेवता येते. नकाशे दिशादर्शन करण्यासाठीही त्यांचा उपयोग होतो. संदेशवहन व दळणवळण करणे अशा अनेक कामांसाठी होतो. तुम्ही पृथ्वीवर जो रेडिओ ऐकता, टीव्ही बघता, मोबाइलवर बोलता, संगणकावर इंटरनेटद्वारे जी माहिती मिळवता त्यांचे सर्व संदेशवहन अवकाशात सोडलेल्या संदेशवाहक उपग्रहाद्वारेच होत असते.”

यक्ष पुढे सांंगू लागला, “तसेच पृथ्वीवरील खनिज संपत्तीचा जसे खनिज तेल, तांबे, लोखंड, दगडी कोळसा, सोने, चांदी वगैरे अशा गोष्टींचा मानव अगदी मन मानेल तसा दुरुपयोग करून घेत आहे. हा साठा येत्या ५० वर्षांत पूर्णपणे संपून जाईल. काही ग्रहांवर, त्यांच्या उपग्रहांवर व इतर लघुग्रहांवर ही खनिजसंपत्ती विपुल प्रमाणात आहे. तिचा मानवाला स्वविकासासाठी उपयोग करून घेता येईल. त्याचप्रमाणे पृथ्वीवरील लोकसंख्या अचाट वेगाने वाढत आहे. एक दिवस असा येईल की, ही पृथ्वीही मानवाला राहण्यासाठी अपुरी पडू लागेल. वाढत्या लोकसंख्येला पृथ्वीवरील अन्नही पुरणार नाही. त्यावेळी मानव एखाद्या ग्रहावर किंवा उपग्रहावरसुद्धा वस्ती करू शकेल. माणूस तेथे वेगवेगळी पिकं घेण्याचा प्रयत्न करेल. आज रोजीच चंद्रावर वसाहत करण्याच्या योजना मानवाने आखल्या आहेत व त्यांनुसार त्याचे प्रयत्नही सुरू आहेत.”

“चला आपणही जाऊ अवकाशात राहायला.” असे संदीप म्हणाला व दीपा नि यक्ष त्यांच्या बोलण्यावर खळखळून हसले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

Jio युजर्सला हवे Unlimited 5G डेटा, इतके रुपयांचा करावा लागेल रिचार्ज

मुंबई: जिओने आपला रिचार्ज पोर्टफोलिए अपडेट केला आहे. कंपनीने सर्व प्लान्सच्या किंमतीत बदल केला आहे.…

3 hours ago

IND vs ZIM: अभिषेक-गायकवाडचे वादळ, आवेश-मुकेशचा कहर, झिम्बाब्वेला १०० धावांनी हरवले

मुंबई: भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेला १०० धावांनी हरवले आहे. यासोबतच टीम इंडियाने पाच सामन्यांच्या…

4 hours ago

१००० कोटीहून अधिक नेटवर्थ…क्रिकेटच नव्हे तर बिझनेसमध्येही हिट धोनी

मुंबई: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आज वाढदिवस आहे. कॅप्टन कूल ४३ वर्षांचा झाला…

5 hours ago

Tomato Price Hike : टोमॅटोची ‘लाली’ आणखी वाढणार

नवी दिल्ली : टोमॅटोच्या दरात मोठी (Tomato Price Hike) वाढ झाली आहे. टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये…

7 hours ago

Ashadhi Ekadashi : आषाढीमुळे विठुरायाचे व्हीआयपी दर्शन बंद!

दर्शन रांगेतील भाविकांना मोठा दिलासा पंढरपूर : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आता जवळ येऊ लागली…

8 hours ago

ग्राहकांची दिशाभूल टाळण्यासाठी FSSAI ची नवी नियमावली!

आता कंपन्यांना द्यावी लागणार मोठ्या अक्षरात माहिती मुंबई : एफएसएसआयचे (FSSAI) अध्यक्ष अपूर्व चंद्र यांच्या…

8 hours ago