Plane crash: ब्राझीलमध्ये विमान अपघातात १४ जणांचा मृत्यू

मनौस : ब्राझीलच्या उत्तर अॅमेझॉन राज्यात शनिवारी झालेल्या विमान अपघातात(plane crash) १४ जणांचा मृत्यू झाला. राज्याच्या गर्व्हनरनी सांगितले हा अपघात राज्याची राजधानी मनौस येथून साधारण ४०० किमीत दूर बार्सिलोस येथे झाला.


अमेजनस राज्याचे गर्व्हनर विल्सन लीमा म्हमाले, शनिवारी बार्सिलोस येथे झालेल्या विमान अपघातात १२ प्रवाशांचा मृत्यू झाला तर चालक दलातील दोन सदस्यांचा मृत्यू झाल्याप्रकऱणी दु:ख झाले आहे. आमची टीम सर्वतोपरी मदत करत आहे. मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबाप्रती माझी सहानुभूती आणि प्रार्थना नेहमीच सोबत आहे.


रिपोर्टनुसार या विमानात १२ पर्यटक आणि एक पायलट तसेच एक को पायलट उपस्थित होते. ब्राझीलच्या नागरिक सुरक्षाने म्हटले की विमानात उपस्थित असलेल्या कोणत्याही व्यक्तीचा जीव वाचू शकलेला नाही. मीडिया रिपोर्टनुसार हे विमान लँड होत असताना मुसळधार पाऊस असल्याने खराब हवामानामुळे विमानाचा अपघात झाला.


या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नागरिकत्वाबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. दरम्यान यात काही अमेरिकन नागरिक सहभागी होते असे सांगितले जात आहे.

Comments
Add Comment

Terrorist Pannu: खलिस्तानी दहशतवादीच्या हत्येच्या कटात भारतीय नागरिकाला अमेरिकेत २४ वर्षांची शिक्षा; नेमकं प्रकरण काय?

खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्ये संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. पन्नूच्या हत्येचा कट

ट्रम्पच्या नव्या निर्णयामुळे वाढली अमेरिका - इराण युद्धाची शक्यता

वॉशिंग्टन डीसी : अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या निर्णयामुळे अमेरिका - इराण युद्धाची शक्यता वाढली आहे.

Pakistan Hockey Team: पाकिस्तानची पुन्हा नाचक्की; हॉटेलचे बिल न भरल्याने खेळाडू रस्त्यावर

पाकिस्तानी खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की झाली आहे. खेळाडूंच्या हॉटेलचं बिल न भरल्याने खेळाडूंना

बांगलादेश निवडणुकीत बीएनपीचा विजय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

दिल्ली: बांगलादेशच्या १३ व्या संसदीय निवडणुकीने देशाच्या राजकारणाचा मार्ग बदलून टाकला आहे. बीएनपीने (बांगलादेश

Bangladesh: तारिक रहमानच्या नेतृत्वात नवं सरकार स्थापन होण्याची शक्यता

दिल्ली: बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेनंतर पार पडलेल्या ऐतिहासिक निवडणुकीत जनतेने तारिक रहमान यांच्या

आशिष शेलार युनेस्को मुख्यालयात

युनेस्को : छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्को ने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान दिले