Asia cup 2023: फायनलमध्ये भारत-श्रीलंका रंगणार सामना, पाकिस्तानचा पराभव

  137

कोलंबो: आशिया चषक २०२३च्या(asia cup 2023) फायनलचे दोन संघ अखेर ठरले आहेत. भारत(india) आणि श्रीलंका(srilanka) हे दोन संघ फायनलमध्ये आमनेसामने भिडणार आहेत. येत्या १७ सप्टेंबरला आशिया चषकाची फायनल रंगणार आहे. गुरूवारी झालेल्या सामन्यात श्रीलंकेने डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानला दोन विकेटनी हरवत फायनल गाठली.


पावसामुळे श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील सामना ४२ षटकांचा ठेवण्यात आला होता. पाकिस्तानने ४२ षटकांत पहिल्यांदा फलंदाजी करताना ७ बाद २५२ धावा केल्या. तर श्रीलंकेने हे आव्हान ८ विकेट गमावत पूर्ण केले आणि दोन विकेट राखत विजय मिळवला.


पाकिस्तानकडून फलंदाजी करताना सलामीवीर चांगली सलामी करू शकले नाहीत. फखर झमान ४ धावा करून बाद झाला तर कर्णधार बाबर आझम २९ धावा करू शकला. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या मोहम्मद रिझवानने या सामन्यात नाबाद ८६ धावांची खेळी केली. तर इफ्तिखार अहमदने ४७ धावांची खेळी केली.


त्यानंतर श्रीलंकेने डावाला सुरूवात करताना त्यांची सुरूवात बरी झाली. श्रीलंकेचा यष्टिरक्षक कुशल मेंडिसने ९१ धावांची खेळी केली. तर सदीरा समरविक्रमाने ४८ धावा करत त्याला चांगली साथ दिली. चरिथ अस्लांकाने ४९ धावा ठोकल्या. यामुळे श्रीलंकेला हे आव्हान पार करता आले. शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना रंगला होता. पाकिस्तानने श्रीलंकेला विजयासाठी झुंजवले.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार