१,००० कोटींच्या क्रिप्टो-पोंझी घोटाळ्यात गोविंदाची चौकशी होणार!

ओदिशा : बॉलिवूडचा सदाबहार, लोकप्रिय अभिनेता गोविंदाची १००० कोटींच्या एका घोटाळ्यात चौकशी होणार आहे. ओदिशा आर्थिक गुन्हे शाखा (EOW) ने १३ सप्टेंबरला सांगितले की, ते भारतातील १००० कोटी रुपयांच्या ऑनलाइन पोंझी घोटाळ्या संदर्भात गोविंदाची चौकशी करतील.


अधिकाऱ्यांनी सांगितले की, अनेक देशांमध्ये ऑनलाइन उपस्थिती असलेली सोलर टेक्नो अलायन्स (STA-Token) बेकायदेशीरपणे क्रिप्टो गुंतवणुकीत घोटाळा करत असल्याचे उघड झाले आहे.





गोविंदाने काही प्रमोशनल व्हिडिओंमध्ये क्रिप्टो-पोंझी कंपनीच्या ऑपरेशन्सचे समर्थन केले होते.


ईओडब्ल्यूचे महानिरीक्षक जे एन पंकज यांनी सांगितले की, "जुलैमध्ये गोव्यात सोलर टेक्नो अलायन्सच्या भव्य समारंभात सहभागी झालेल्या आणि काही व्हिडिओंमध्ये कंपनीची जाहिरात करणाऱ्या फिल्मस्टार गोविंदाची चौकशी करण्यासाठी आम्ही लवकरच एक टीम मुंबईला पाठवू."


गोविंदा या प्रकरणात संशयित किंवा आरोपी नाही. गोविंदाची नेमकी भूमिका तपासानंतरच स्पष्ट होईल. जर आम्हाला आढळले की त्यांची भूमिका त्यांच्या व्यावसायिक करारानुसार केवळ उत्पादनाच्या (STAToken ब्रँड) समर्थनापुरती मर्यादित होती, तर आम्ही त्याला आमच्या खटल्यात सरकारी साक्षीदार बनवू, असे अधिकारी पंकज म्हणाले.


भद्रक, केओंझार, बालासोर, मयूरभंज आणि भुवनेश्वरमधील दहा हजार लोकांकडून या कंपनीने ३० कोटी रुपये गोळा केले. त्यामुळे आता या प्रकरणाला कोणते वळण येणार हे पाहायचे आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच

रोखीपेक्षा डिजिटलला पसंती

एका वर्षात २,३६० एटीएमना टाळे एटीएम बंद करण्यात खासगी बँका आघाडीवर नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटच्या वाढत्या