IND vs PAK: पाकिस्तानला हरवल्यानंतर रोहितकडून खेळाडूंचे कौतुक

कोलंबो: टीम इंडियाने (team india) आशिया चषक २०२३च्या (asia cup 2023) सुपर ४ फेरीतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानला(pakistan) २२८ धावांनी हरवले. भारताने दिलेल्या ३५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ ३२ षटकांत १२८ धावांवर आटोपला. धावांच्या हिशोबाने पाकिस्तानविरुद्ध भारताचा हा सगळ्यात मोठा विजय आहे.


या सामन्यात टीम इंडियाकडून विराट कोहली आणि के एल राहुल यांनी शानदार शतके ठोकली. या मोठ्या विजयानंतर संघाचा कर्णधार रोहित शर्माने खेळाडूंचे जोरदार कौतुक केले.



कर्णधार रोहितने खेळाडूंचे कौतुक केले


कर्णधार रोहित शर्माने सामन्यानंतर म्हटले, आम्हाला फक्त काही वेळासाठी मैदानात जायचे होते. मैदानावरील कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर हे शक्य झाले. मला माहित आहे की संपूर्ण मैदान झाकणे आणि कव्हर हटवणे किती कठीण आहे. संपूर्ण संघाकडून आम्ही त्यांना धन्यवाद म्हणतो.


फलंदाजीबाबत बोलताना रोहित म्हणाला, आम्हाला माहीत होते की विकेट चांगली आहे आणि आम्हाला पावसासोबत ताळमेळ बसवावा लागेल. विराट कोहली आणि लोकेश राहुलला पकड मिळवण्यासाठी थोडा वेळ लागेल आणि आम्ही त्यानंतर पुढे जाऊ शकतो.



बुमराहच्या पुनरागमनाबाबत


वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने चांगली कामगिरी केली. रोहित म्हणाला, बुमराह चांगला वाटत आहे. त्याने बॉल दोन्ही बाजूनी फिरवला गेल्या ८-१० महिन्यांत त्याने कठोर मेहनत घेतली. बुमराह केवळ २९ वर्षांचा आहे त्याने सामना सोडणे आदर्श नाही मात्र तो ज्या पद्धतीने गोलंदाजी केली त्यावरून समजते की तो काय करत आहे.


विराटने छान खेळई केली. आणि केएल राहुल दुखापतीतून परतल्यानंतर आणि टॉसच्या ५ मिनिटे आधी खेळण्यास आम्ही त्याला तयार होण्यास सांगितले. ही खेळाडूची मानसिकता दर्शवते.

Comments
Add Comment

WC Semi-Final: पहिल्यांदाच वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचली दक्षिण आफ्रिका, इंग्लंडला १२५ धावांनी हरवले

मुंबई : आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५ मध्ये मोठा उलटफेर झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टी२० सामना पावसामुळे रद्द : दुसरा सामना ३१ ऑक्टोबरला!

ऑस्ट्रेलिया : मनुका ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणारा पहिला टी२० सामना अखेर सततच्या

टी२० मध्ये पुन्हा पावसाचे विघ्न: २० ऐवजी १८ षटकांचा सामना !

कॅनबेरा : कॅनबेरातील मनुका ओव्हल स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत–ऑस्ट्रेलिया पहिल्या टी२० सामन्यात पुन्हा एकदा

भारताला मोठा धक्का: दुखापतीमुळे नितीश कुमार रेड्डी तीन T20 सामन्यांमधून बाहेर!

कॅनबेरा : भारतीय क्रिकेट संघासाठी धोक्याची घंटा वाजवणारी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने बुधवारी दिलेल्या

७ महिन्यांच्या गर्भवती सोनिकाने जिंकले वेटलिफ्टिंग स्पर्धेत कांस्य पदक

दिल्ली : आयुष्यात काहीही अशक्य नाही, फक्त जिद्द असायला हवी. दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल सोनिका यादव यांनी हे खरे

वन डे रँकिंगमध्ये स्मृती मानधनाचे वर्चस्व कायम

मुंबई : आयसीसी महिला एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेत भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना हिने चमकदार कामगिरी केली