Asia cup 2023: कुलदीपची कमाल, लंकेला हरवत भारत आशिया चषकच्या अंतिम फेरीत

कोलंबो: कुलदीप यादवच्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर भारताने आशिया चषक २०२३मधील(asia cup 2023) सुपर ४ फेरीत श्रीलंकेला ४१ धावांनी हरवले आहे. भारताने विजयासाठी ठेवलेले २१४ धावांचे माफक आव्हानही श्रीलंकेला पूर्ण करता आले नाही.


श्रीलंकेचा संपूर्ण डाव ४१.३ षटकांत १७२ धावांवर आटोपला. पाकिस्तानविरुद्ध पाच बळी घेणाऱ्या कुलदीप यादवने चार गडी बाद करत श्रीलंकेच्या संघाला सुरूंग लावला. जसप्रीत बुमराहने या सामन्यात २ गडी बाद केले. तर रवींद्र जडेजाने २ विकेट घेतल्या.


याआधी टीम इंडियाला श्रीलंकेविरुद्ध मोठी धावसंख्या उभारता आली नाही. श्रीलंकेच्या जबरदस्त गोलंदाजीसमोर भारताच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. भारताचा कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्माने केवळ सर्वाधिक ५३ धावा केल्या. तर इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही.


शुभमन गिलने १९ धावा केल्या तर इशान किशन ३३ धावांवर बाद झाला. के एल राहुल ३९ धावा करू शकला. अक्षर पटेलने २६ धावा केल्या. बाकी फलंदाज चांगली कामगिरी करू शकले नाहीत. यामुळे भारताने ४९.१ षटकांत केवळ २१३ धावा केल्या.श्रीलंकेकडून २० वर्षीय दुनिथ वेलालगेने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या.


इतके लहान आव्हान असताना श्रीलंका हा सामना जिंकेल असे वाटत होते. मात्र भारताच्या गोलंदाजांनी कमाल केली आणि श्रीलंकेचा डाव हाणून पाडला. श्रीलंकेकडून धनंजय डी सिल्वाने ४१ तर दुनिथ वेलालगेने नाबाद ४२ धावा केल्या.


Comments
Add Comment

आयसीसी क्रमवारीत भारतीय महिलांचा डंका

शफाली, रेणुकाची झेप; दीप्तीचा 'नंबर १' कायम नवी दिल्ली: आयसीसीच्या ताज्या महिला टी-२० क्रमवारीत भारतीय खेळाडूंनी

विराटसाठी २८ हजार धावांचा टप्पा हाकेच्या अंतरावर

सचिन-संगकाराच्या क्लबमध्ये एन्ट्रीसाठी २५ धावांची गरज मुंबई : भारतीय क्रिकेटचा 'किंग' विराट कोहली पुन्हा एकदा

भारताचे मिशन ‘क्लीन स्वीप’ यशस्वी

हरमनप्रीतच्या ६८ धावा; मालिका ५-० ने खिशात तिरुवनंतपुरम : भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२०

टी-२० सामन्यात सोनम येशेचा ८ बळींचा जागतिक विक्रम

भूतानच्या फिरकीपटूने म्यानमारविरुद्ध रचला इतिहास; ४ षटकांत दिल्या ७ धावा भूतान : फिरकीपटू सोनम येशे याने इतिहास

न्यूझीलंडविरुद्ध वनडेतून ३ स्टार खेळाडूंचा पत्ता कट ? दिग्गजांचं कमबॅक ?

मुंबई : जानेवारीत न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी बीसीसीआय लवकरच संघाची घोषणा करणार

गौतम गंभीरच भारताचा कसोटी प्रशिक्षक

नवी दिल्ली : गौतम गंभीर भारताचा कसोटी प्रशिक्षक म्हणू्न कायम राहील. बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट