कोलंबो: कुलदीप यादवच्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर भारताने आशिया चषक २०२३मधील(asia cup 2023) सुपर ४ फेरीत श्रीलंकेला ४१ धावांनी हरवले आहे. भारताने विजयासाठी ठेवलेले २१४ धावांचे माफक आव्हानही श्रीलंकेला पूर्ण करता आले नाही.
श्रीलंकेचा संपूर्ण डाव ४१.३ षटकांत १७२ धावांवर आटोपला. पाकिस्तानविरुद्ध पाच बळी घेणाऱ्या कुलदीप यादवने चार गडी बाद करत श्रीलंकेच्या संघाला सुरूंग लावला. जसप्रीत बुमराहने या सामन्यात २ गडी बाद केले. तर रवींद्र जडेजाने २ विकेट घेतल्या.
याआधी टीम इंडियाला श्रीलंकेविरुद्ध मोठी धावसंख्या उभारता आली नाही. श्रीलंकेच्या जबरदस्त गोलंदाजीसमोर भारताच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. भारताचा कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्माने केवळ सर्वाधिक ५३ धावा केल्या. तर इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही.
शुभमन गिलने १९ धावा केल्या तर इशान किशन ३३ धावांवर बाद झाला. के एल राहुल ३९ धावा करू शकला. अक्षर पटेलने २६ धावा केल्या. बाकी फलंदाज चांगली कामगिरी करू शकले नाहीत. यामुळे भारताने ४९.१ षटकांत केवळ २१३ धावा केल्या.श्रीलंकेकडून २० वर्षीय दुनिथ वेलालगेने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या.
इतके लहान आव्हान असताना श्रीलंका हा सामना जिंकेल असे वाटत होते. मात्र भारताच्या गोलंदाजांनी कमाल केली आणि श्रीलंकेचा डाव हाणून पाडला. श्रीलंकेकडून धनंजय डी सिल्वाने ४१ तर दुनिथ वेलालगेने नाबाद ४२ धावा केल्या.
मुंबई: जुलै महिन्याला सुरूवात झाली आहे. जुलै २०२४मध्ये ४ मोठे ग्रह शुक्र, बुध, मंगळ आणि…
मुंबई: भारतीय क्रिकेट संघ अद्याप बार्बाडोसमध्येच अडकला आहे. टीम इंडियाने बार्डाडोसमध्ये फायनल सामना जिंकत टी-२०…
मुंबई:रिलायन्स जिओचे प्लान आजपासून महाग होत आहेत. आता ग्राहकांना रिचार्ज कऱण्यासाठी आधीपेक्षा १२ ते २५…
मुंबई: पोटापासून अनेक आजार सुरू होतात. यासाठी त्यांच्यावर उपचार करणे गरजेचे असते. जर तुम्हीही पोटाच्या…
नवी दिल्ली : आज मला एका गंभीर विषयाकडे तुमचे आणि देशवासीयांचे लक्ष वेधायचे आहे. काल…
कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी लाभार्थींची कसरत! अर्ज करण्यासाठी आता ३१ ऑगस्टपर्यंत मुदत, दोन अटी केल्या शिथिल…