IND Vs PAK: कोहली, राहुलची शानदार शतके, पाकिस्तानसमोर ३५७ धावांचे आव्हान

कोलंबो: भारत(india) आणि पाकिस्तान(pakistan) यांच्यातील आशिया चषक २०२३मधील (asia cup 2023) सुपर ४ सामन्यात भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी ३५७ धावांचे आव्हान ठेवले आहे.


विराट कोहली आणि के एल राहुल यांच्या शानदार शतकांच्या जोरावर भारताने ३५६ धावांची खेळी केली. राहुलने आपले सहावे आणि कोहलीने ४७वे वनडे शतक ठोकले. राहुलने १०६ चेंडूत १११ आणि कोहलीने ९४ बॉलमध्ये १२२ धावांची नाबाद खेळी केली. दोघांनी १९४ चेंडूत २३३ धावांची भागीदारी केली.


याआधी रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात केवळ २४.१ षटकांचा खेळ झाला होता. पावसाने सामन्यात खोडा घातल्याने पुढील सामना होऊ शकला नव्हता. पाकिस्तानने टॉस जिंकत भारताला फलंदाजीचे निमंत्रण दिले. भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिलने दमदार सुरूवात करून दिली होती. रोहितने ४९ चेंडूत जबरदस्त ५६ धावांची खेळी केली होती. या दरम्यान ४ षटकार आणि ६ चौकार ठोकले. तर शुभमन गिलने ५२ चेंडूत ५८ धावांची खेळी केली होती.


त्यानंतर २ बाद १४७ धावांवरून आज खेळ सुरू झाला. विराट कोहली आणि लोकेश राहुलने या सामन्यात दमदार कामगिरी केली. या दोघांनी शतके ठोकत भारताला साडेतीनशे पार धावसंख्या उभारून दिली.

Comments
Add Comment

मेलबर्नमध्ये भारताचा पराभव: ऑस्ट्रेलियाची १-० ने आघाडी!

मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेतील दुसरा सामना मेलबर्नमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने

भारताची फलंदाजी कोलमडली, अभिषेक शर्माचे लढाऊ अर्धशतक व्यर्थ: टी-२० सामन्यात पुन्हा निराशाजनक कामगिरी

मेलबर्न : वनडे मालिकेत पराभवाचा धक्का बसल्यानंतर टी-२० मालिकेत पुनरागमनाची स्वप्नं पाहणाऱ्या भारतीय संघाला

सामन्याच्या अंतिम क्षणी केवळ बायबलच्या त्या ओळी म्हटल्या, विजयानंतर भावूक झाली जेमिमा

नवी मुंबई : ऑस्ट्रेलियाला महिला वर्ल्ड कपच्या सेमीफायनल सामन्यात धूळ चारल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्सच्या डोळ्यात

भारत वि ऑस्ट्रेलिया दुसरा टी-20 सामना मेलबर्नमध्ये रंगणार

कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न येथे खेळवला

IND W vs AUS W : भारतीय संघ दिमाखात फायनलमध्ये, ऑस्ट्रेलियाला केले चारीमुंड्या चीत, आता द. आफ्रिकेशी होणार लढत

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला वनडे वर्ल्डकपच्या सेमीफायनल सामन्यात भारताने बलाढ्य

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि