IND Vs PAK: कोहली, राहुलची शानदार शतके, पाकिस्तानसमोर ३५७ धावांचे आव्हान

  88

कोलंबो: भारत(india) आणि पाकिस्तान(pakistan) यांच्यातील आशिया चषक २०२३मधील (asia cup 2023) सुपर ४ सामन्यात भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी ३५७ धावांचे आव्हान ठेवले आहे.


विराट कोहली आणि के एल राहुल यांच्या शानदार शतकांच्या जोरावर भारताने ३५६ धावांची खेळी केली. राहुलने आपले सहावे आणि कोहलीने ४७वे वनडे शतक ठोकले. राहुलने १०६ चेंडूत १११ आणि कोहलीने ९४ बॉलमध्ये १२२ धावांची नाबाद खेळी केली. दोघांनी १९४ चेंडूत २३३ धावांची भागीदारी केली.


याआधी रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात केवळ २४.१ षटकांचा खेळ झाला होता. पावसाने सामन्यात खोडा घातल्याने पुढील सामना होऊ शकला नव्हता. पाकिस्तानने टॉस जिंकत भारताला फलंदाजीचे निमंत्रण दिले. भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिलने दमदार सुरूवात करून दिली होती. रोहितने ४९ चेंडूत जबरदस्त ५६ धावांची खेळी केली होती. या दरम्यान ४ षटकार आणि ६ चौकार ठोकले. तर शुभमन गिलने ५२ चेंडूत ५८ धावांची खेळी केली होती.


त्यानंतर २ बाद १४७ धावांवरून आज खेळ सुरू झाला. विराट कोहली आणि लोकेश राहुलने या सामन्यात दमदार कामगिरी केली. या दोघांनी शतके ठोकत भारताला साडेतीनशे पार धावसंख्या उभारून दिली.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार