IND vs PAK: कुलदीपचा पाकिस्तानला जोरदार ‘पंच’, भारताचा २२८ धावांनी विजय

Share

कोलंबो: आशिया चषक २०२३च्या (asia cup 2023) सुपर ४च्या फेरीतील सामन्यात भारताने (india) पाकिस्तानवर (pakistan) जबरदस्त विजय मिळवला आहे. भारताने पाकिस्तानला थोडेथोडक्या नव्हे तर तब्बल २२८ धावांनी हरवले. राखीव दिवशी रंगलेल्या या सामन्यात भारताने बाजी मारली. भारताने दिलेले ३५७ धावांचे आव्हान गाठताना पाकिस्तानचा घामच निघाला. त्यांना ३२ षटकांत केवळ १२८ धावा करता आल्या.

विराट कोहली आणि लोकेश राहुल यांची प्रत्येकी शतके तर सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना २ बाद ३५६ धावांचा डोंगर पाकिस्तानसमोर उभारला होता. हा सामना रविवारी होणार होता. मात्र रविवारी भारताच्या २४.१ षटकांत २ बाद १४७ धावा झाल्या होत्या.पावसाने खोडा घातल्याने सामना सोमवारी घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानंतर सोमवारी पुन्हा खेळ सुरू करण्यात आला. तेव्हा विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी जबरदस्त शतके ठोकली. राहुलने १०६ चेंडूत १११ आणि कोहलीने ९४ बॉलमध्ये १२२ धावांची नाबाद खेळी केली. दोघांनी १९४ चेंडूत २३३ धावांची भागीदारी केली. त्यांच्या या जबरदस्त खेळीच्या जोरावर भारताने २ बाद ३५६ धावा केल्या होत्या.

प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या संघाला दीडशे धावांचा टप्पाही गाठता आला नाही. पाकिस्तानचे केवळ चारच फलंदाज दुहेरी धावसंख्या करू शकले. या सामन्यात कुलदीप यादवच्या गोलंदाजीने किमया साधली. त्याने तब्बल ५ विकेट घेत पाकिस्तानच्या डावाला खिंडार पाडले. तर जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवला.

Recent Posts

अनधिकृत इमारतींची संख्या ही ११० ने वाढली

पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…

24 minutes ago

जलवाहिनी फुटल्याने २४ तास ‘पाणीबाणीचे’ मुंबईकरांसमोर संकट

काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…

1 hour ago

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…

2 hours ago

World Book Day : भूतकाळासह भविष्यकाळातील दुवा म्हणजेच ‘पुस्तकं’

मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…

4 hours ago

‘टीनएजर्सच्या पालकांकडून अपेक्षा’

डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…

4 hours ago

समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे

सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…

5 hours ago