India Vs Pakistan: राखीव दिवशी सामना नाही झाला तर काय? पावसाची किती शक्यता...घ्या जाणून

कोलंबो: आशिया चषक २०२३मध्ये (asia cup 2023) सातत्याने भारत(india) आणि पाकिस्तान (pakistan) यांच्यातील सामन्यात पावसाचाच खेळ सुरू आहे. या स्पर्धेतील संघांदरम्यानचा दुसरा सामना रविवारी खेळवण्यात आला. मात्र पावसाने या सामन्यात खोडा घातल्याने हा सामना पूर्ण होऊ शकला नाही. आज म्हणजेच सोमवारी राखीव दिवशी हा सामना होमार आहे.


टॉस हारल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या भारतीय संघाला या सामन्यात २४.१ षटकांचाच खेळ करता आला. त्यानंतर पाऊस थांबण्याचे नावच घेईना अखेर हा सामना थांबवण्यात आला. मुसळधार पावसामुळे रविवारी सामना पूर्ण होऊ शकला नाही. आशिया चषक २०२३च्या फायनल आणि भारत-पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला. आता हा सामना आज म्हणजेच सोमवारी ११ सप्टेंबरला होईल.


भारतीय संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना २४.१ षटकांत १४७ धावा केल्या होत्या. आता राखीव दिवशी याच धावसंख्येवरून पुढील सामना सुरू होईल. मात्र सोमवारीही कोलंबोचे हवामान चांगले दिसत नाही आहे.


कोलंबोमध्ये सोमवारी पावाची ९९ टक्के शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. म्हणजेच सामना रंगण्याची कोणतीही आशा नाही. दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता ९५ टक्के आहे. हवेचा वेगही ४१ किमी/प्रति तास राहील.



राखीव दिवशी पाऊस आला तर काय?


राखीव दिवशी भारताच्या २ बाद १४७ वरून डाव सुरू होईल. मात्र तेथील हवामान पाहता चाहत्यांच्या मनात सवाल येत आहे की जर राखीव दिवशी सामन्यात पावसाचा व्यत्यय आला तर काय होईल? याचे उत्तर आहे की जर राखीव दिवशी सामना झाला नाही तर तो रद्द करण्यात येईल. अशातच दोन्ही संघांना प्रत्येकी एकएक गुण दिला जाईल.


नियमानुसार एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये निकालासाठी दोन्ही डावांत कमीत कमी २०-२० षटकांचा खेळ होणे गरजेचे असते. जर राखीव दिवशी पाऊस आला तर पाकिस्तानला कमीत कमी २० षटकांचा खेळ करावा लागेल. पाकिस्तानचा संघ २० षटकेही खेळू शकला नाही तर सामना रद्द होईल.

Comments
Add Comment

श्रीलंका टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

मुंबई : वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघ अखेरीस मोठ्या विश्रांतीनंतर मैदानावर उतरणार आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक

कटकमध्ये भारताचा १०१ धावांनी विजय, दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव

कटक : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी २० मालिकेत भारताने विजयाने शुभारंभ केला. भारताने कटकमध्ये झालेला सामना १०१

भारताचे द. आफ्रिकेसमोर १७६धावांचे लक्ष्य, हार्दिक पांड्याचे धमाकेदार अर्धशतक

कटक (वृत्तसंस्था) : कटकच्या मैदानात सध्या हार्दिक पांड्याच्या बॅटने आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली.

IPL 2026 Players Auction : अंतिम यादी जाहीर; ७७ जागांसाठी ३५० खेळाडूंवर बोली, त्यापैकी २४० भारतीय

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगचा २०२६ चा खेळाडू लिलाव १६ डिसेंबरला अबुधाबी येथे होणार असून, या वेळी एकूण ३५०

IPL 2026 Auction: टॉप 5 गटात 34 खेळाडूंवर लागणार बोली

IPL 2026 मिनी लिलावासाठी एकूण 350 खेळाडूंची नावं निश्चित करण्यात आलेली आहे . टॉप खेळाडूंसाठी पाच गट करण्यात आले आहेत.

Fruad In Cricket : क्रिकेटविश्वातला महाघोटाळा, एकाच पत्त्यावर आढळले १२ खेळाडू

पुद्दुचेरी : भारतीय क्रिकेटचा जागतिक पातळीवर दबदबा आहेच. बीसीसीआयची आर्थिक ताकद, आयपीएलसारख्या जगातील सर्वात