India vs Pakistan: पावसाने सामना धुतल्यास पाकिस्तानला किती धावांचे मिळणार आव्हान

कोलंबो: आशिया चषक २०२३च्या (asia cup 2023) सुपर ४मध्ये भारतीय संघ (indian team) आणि पाकिस्तान (pakistan) यांच्यातील महामुकबाल कोलंबोच्या के आर प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. मात्र या सामन्यात पावसाने खोडा घातला आहे. कोलंबोमध्ये मुसळधार पावसामुळे सामना थांबवण्यात आला आहे. पिच कव्हर्सने झाकण्यात आले आहे.


सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर भारतीय संघाने सलामीला दमदार कामगिरी केली. कर्णधार रोहित शर्मा आणि आणि शुभमन गिलने मिळून १२१ धावांची सलामी केली.



रोहित आणि गिलचे अर्धशतक


सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने अर्धशतकी खेळी केली. त्याने ४९ बॉलमध्ये ५६ धावा केल्या. या दरम्यान ४ षटकार आणि ६ चौकार ठोकले. रोहितने ४२ बॉलमध्ये आपले अर्धशतक ठोकले. तर शुभमन गिलने ५२ बॉलमध्ये ५८ धावांची खेळी केली.


पावसामुळे खेळ थांबला तेव्हा भारतीय संघाने २ बाद १४७ धावा केल्या. खेळ थांबला तेव्हा विराट कोहली ८ आणि के एल राहुल १७ धावा करून नाबाद राहिला आहे. आता चाहत्यांच्या मनात सवाल आहे की जर पावसामुळे खेळ झाला नाही तर काय होईल. दुसरे हे की जर पाऊस उशिरापर्यंत राहिला तर पाकिस्तानला किती षटकांमध्ये किती धावा मिळणार आहे.


 


रिझर्व्ह डेला होऊ शकतो सामना


जर पाऊस थांबला नाही तर सामना पुढील दिवस रिझर्व्ह डेला खेळवला जाईल. आशियाई क्रिकेट कौन्सिलने फायनलशिवाय भारत-पाकिस्तान सामन्यासाठी एक रिझर्व्ह डे ठेवला. अशातच चाहते निराश होण्याची गरज नाही.


जर आज पाऊस थोडा थांबला तर त्या स्थितीत भारताला बॅटिंग दिली जाणार नाही. वेळेनुसार पाऊस थांबला तर २० ते २४ षटकांचा खेळ होऊ शकतो.



सामना झाल्यास पाकिस्तानला किती धावांचे मिळणार आव्हान?


२० षटकांत - १८१ धावांचे आव्हान
२१ षटकांत - १८७ धावांचे आव्हान
२२ षटकांत - १९४ धावांचे आव्हान
२३ षटकांत - २०० धावांचे आव्हान
२४ षटकांत - २०६ धावांचे आव्हान

Comments
Add Comment

महिला क्रिकेट विश्वचषक : भारतीय संघाला विजयी हॅट्ट्रिकची संधी

विशाखापट्टणम: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक मोहिमेची सुरुवात विजयाने

IND vs AUS : फक्त १० धावा करताच रोहित शर्मा रचणार इतिहास

पर्थ/मेलबर्न: शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ १९ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन एकदिवसीय (ODI)

Asia Cup 2025 : बक्षीस मिळालेली कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकत नाही, जाणून घ्या कारण !

मुंबई : आशिया कप २०२५ मध्ये भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा याने चमकदार कामगिरी करत "प्लेअर ऑफ द टूर्नामेंट"चा किताब

IND vs PAK: वेल डन टीम इंडिया, वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला केले नेस्तनाबूत

कोलंबो: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये हा रविवार पुन्हा एकदा भारताच्या नावावर राहिला. आजच्या या सामन्यात

पाकिस्तानपुढे २४८ धावांचे आव्हान

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून

सुपरसंडे : पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात भारताची दमदार सुरुवात

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत पाकिस्तान सामन्याला सुरुवात झाली आहे. नाणेफेक जिंकून