Friday, May 9, 2025

देशमहत्वाची बातमी

G-20 Summit : ही आहे २१व्या शतकातील भारताची ताकद, जगाला खास संदेश

G-20 Summit : ही आहे २१व्या शतकातील भारताची ताकद, जगाला खास संदेश

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये दोन दिवस सुरू असलेल्या जी-२० परिषदेला ९ सप्टेंबरपासून सुरूवात झाली आहे. परिषदेच्या पहिल्या दिवशी सदस्य देशांमध्ये आर्थिक सहकार्याच्या मुद्दयावर चर्चा झाली आणि काही निर्णय घेतले गेले. हे निर्णय भारताच्या ताकदीची जाणीव करून देतात की आता आम्ही निर्णय घेण्यासाठी आणि ते राबवण्यासाठी सक्षम आहोत.


यावेळी भारताने युक्रेन युद्धाबाबतच्या मुद्द्यावर स्पष्टपणे आपले मत मांडताना म्हटले की २१व्या शतकात युद्धासाठी कोणतीही जागा नाही. आपल्याला एकमेकांच्या सहाय्याने पुढे जात वसुधैव कुटुंबकमची भावना साकार करायची आहे.



भारताने काय म्हटले


भारताने पश्चिमेकडील देशांना म्हटले की युक्रेनमध्ये रशियाच्या आक्रमक भूमिकेवर जर आपण या परिषदेत नरमाईची भूमिका घेतली तर जी-२०च्या माध्यमातून मदत मिळेल. यावरून असेही संकेत मिळतात की जर भारत देश एखादा पर्याय शोधण्यास असमर्थ असता तर यामुळे केवळtw शिखर परिषद अयशस्वीच होण्याची जोखीम नव्हती तर एक वैकल्पिक आंतरराष्ट्रीय शक्ती बनण्याच्या चीनच्या प्रयत्नांना आणखी वेग मिळाला असता. पश्चिम देशांना सांगितले की जर यात नरमाईची भूमिका असेल तर केवळ धोका टाळताच येणार नाही तर रचनात्मक पद्धतीने पुढे जाऊ शकतो.



आफ्रिकन संघाला स्थायी सदस्यत्व


जी-२० शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी आफ्रिकन संघाला स्थायी सदस्याच्या रूपात सामील करणे हे सगळ्यात मोठे यश होते.

Comments
Add Comment