Yuzvendra Chahal: वर्ल्डकप संघातून बाहेर पडल्यावर चहलने केले हे बोल्ड विधान

मुंबई: वर्ल्डकप २०२३ साठी (world cup 2023) भारतीय संघात निवड न झालेला लेग स्पिनर युझवेंद्र चहलने(yuzvendra chahal) आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. युझवेंद्र चहलने आपल्या बोल्ड विधानाने साऱ्यांनाच आश्चर्यचकित केले आहे. भारताच्या या स्टार क्रिकेटरकडे सिलेक्टर्सनी अजिबात लक्ष दिले नाही. आशिया चषकामध्येही त्याला संधी दिली गेली नाही. त्यानंतर आता क्रिकेट वर्ल्डकपमधूनही त्याला बाहेरच ठेवण्यात आले.


वर्ल्डकप २०२३साठी संघात भारताच्या गोलंदाजी लाईनअपमध्ये वेगवान गोलंदाजांशिवाय कुलदीप यादव, अक्षऱ पटेल आणि रवींद्र जडेजा यांच्या रूपाने तीन स्पिनर सामील आहेत.



वर्ल्डकप संघात समावेश न केल्याने चहलचे बोल्ड विधान


वर्ल्डकप संघातून बाहेर गेल्यानंतर युझवेंद्र चहलने आपल्या मागणीने सर्वांना हैराण केले आहे. आपली प्रतिक्रिया देताना तो म्हणाला की सिलेक्शन त्यांच्या हातात नाही. युझवेंद्रने सांगितले की त्याचे सगळ्यात मोठे स्वप्न हे भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळणे आहे. युझवेंद्र चहललने एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत हे सांगितले.


आपल्या देशासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. जेव्हा हा क्रिकेटर आपल्या देशासाठी सफेद रंगाच्या ड्रेसमध्ये लाल बॉलने खेळत असतो तेव्हा तो टॉपवर असतो. मलाही असेच काही मिळवीयचे आहे. मी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अनेक यश मिळवले आहे. माझे ध्येय आता भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळणे आहे.


चहल पुढे म्हणाला, मला माझ्या नावाच्या पुढे टेस्ट क्रिकेटर हा टॅग पाहायचा आहे. युझवेंद्र चहलने काऊंटी चॅम्पियनशिपचे तीन सामने खेळल्यानंतर इंग्लिश काऊंटी टीम कँटसोबत कॉन्ट्रॅक्ट केले.


युझवेंद्र चहलने भारतासाठी ७२ वनडे सामन्यात १२१ विकेट घेतल्या आहेत. चहलने वनडेत दोन वेळा ५ विकेट घेण्याची किमया केली. युझवेंद्र चहलने या वर्षात केवळ दोन वनडे सामने खेळले. यात त्याने तीन विकेट मिळवल्या.

Comments
Add Comment

हर्षित राणाची जागा जाणार? टीम इंडियात आणखी एका खेळाडूचे पुनरागमन !

मुंबई : टीम इंडियामध्ये आणखी एक वरिष्ठ खेळाडू संघात परतण्याच्या तयारीत असून, त्याच्या पुनरागमनामुळे मुख्य

टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरची प्रकृती सुधारतेय: भारतात कधी परतणार?

ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर पुन्हा एकदा दुखापतीच्या संकटात सापडला आहे. नुकताच

भारत - ऑस्ट्रेलिया पहिला T20 सामना २९ ऑक्टोबरला, पहा टीम इंडियाची संभाव्य Playing XI

मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचा पराभव झाला. ही मालिका ऑस्ट्रेलियाने २-१

बाईपण भारी देवा ! ७ महिन्यांची गरोदर तरीही १४५ किलो वजन उचलत जिंकली वेटलिफ्टिंग स्पर्धा

दिल्ली : आयुष्यात काहीही अशक्य नसत फक्त जिद्द असायला हवी . दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल सोनिका यादव यांनी हे सिद्ध

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचा २९ ऑक्टोबरपासून थरार

दुपारी १.४५ वाजता सामन्यांना होणार सुरुवात मुंबई  : भारतीय संघाचा सध्या ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे. नुकतीच तीन

श्रेयस अय्यर आयसीयूमधून बाहेर

गंभीर दुखापतीनंतर प्रकृती स्थिर मुंबई  : भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज श्रेयस अय्यर याची प्रकृती अद्यापही