नवी दिल्ली : श्रीलंकेमध्ये खेळवल्या जात असेल्या आशिया चषकातील (asia cup) सामने हे पावसामुळेच अधिक चर्चेत राहिले. असा कोणताच सामना झाला नाही ज्यात पावसाने खोडा घातला नाही. यातच आशिया चषकाच्या फायनलबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
आशियाई क्रिकेट कौन्सिलकडून स्पष्ट करण्यात आले आहे की फायनलसाठी कोणताही रिझर्व्ह डे ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे पावसामुळे फायनलचा सामना पूर्ण झाला नाही तर दोन्ही संघाना विजयी घोषित करून ट्रॉफी शेअर केली जाईल.
आशिया चषकातील फायनलचा सामना १७ सप्टेंबरला खेळवला जाणार आहे. रिझर्व्ह डे नसल्याने मान्सूनमध्ये श्रीलंकेत या सामन्यांचे आयोजन केल्याबद्दल अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आधीच पावसामुळे खूप नुकसान झाल्याचे म्हटले आहे. पीसीबीचे म्हणणे आहे की, ते पावसाच्या मौसमामुळे ते श्रीलंकेऐवजी यूएईमध्ये सामन्यांचे आयोजन करायचे होते मात्र एसीसीचे अध्यक्ष जय शाहने यूएईच्या ऐवजी श्रीलंकेचा पर्याय निवडला.
या वादाची सुरूवात आशिया चषकाच्या यजमानपदाबाबत सुरू झाली होती. या वर्षी आशिया चषकाचे यजमानपदाचा अधिकार पाकिस्तानकडे होता. भारताने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानमध्ये संघाला पाठवण्यास नकार दिला. यानंतर यजमानपदासाठी अधिक पर्याय शोधण्याची सुरूवात झाली. अखेर यजमानपदासाठी हायब्रिड मॉडेल ठरवण्यात आले.
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…