Asia Cup 2023: फायनलसाठी रिझर्व्ह डे नाही, पावसामुळे सामना रद्द झाल्यास असा ठरणार विजेता

  152

नवी दिल्ली : श्रीलंकेमध्ये खेळवल्या जात असेल्या आशिया चषकातील (asia cup) सामने हे पावसामुळेच अधिक चर्चेत राहिले. असा कोणताच सामना झाला नाही ज्यात पावसाने खोडा घातला नाही. यातच आशिया चषकाच्या फायनलबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.


आशियाई क्रिकेट कौन्सिलकडून स्पष्ट करण्यात आले आहे की फायनलसाठी कोणताही रिझर्व्ह डे ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे पावसामुळे फायनलचा सामना पूर्ण झाला नाही तर दोन्ही संघाना विजयी घोषित करून ट्रॉफी शेअर केली जाईल.


आशिया चषकातील फायनलचा सामना १७ सप्टेंबरला खेळवला जाणार आहे. रिझर्व्ह डे नसल्याने मान्सूनमध्ये श्रीलंकेत या सामन्यांचे आयोजन केल्याबद्दल अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आधीच पावसामुळे खूप नुकसान झाल्याचे म्हटले आहे. पीसीबीचे म्हणणे आहे की, ते पावसाच्या मौसमामुळे ते श्रीलंकेऐवजी यूएईमध्ये सामन्यांचे आयोजन करायचे होते मात्र एसीसीचे अध्यक्ष जय शाहने यूएईच्या ऐवजी श्रीलंकेचा पर्याय निवडला.



कुठून सुरू झाला वाद?


या वादाची सुरूवात आशिया चषकाच्या यजमानपदाबाबत सुरू झाली होती. या वर्षी आशिया चषकाचे यजमानपदाचा अधिकार पाकिस्तानकडे होता. भारताने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानमध्ये संघाला पाठवण्यास नकार दिला. यानंतर यजमानपदासाठी अधिक पर्याय शोधण्याची सुरूवात झाली. अखेर यजमानपदासाठी हायब्रिड मॉडेल ठरवण्यात आले.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार