Asia Cup 2023: फायनलसाठी रिझर्व्ह डे नाही, पावसामुळे सामना रद्द झाल्यास असा ठरणार विजेता

नवी दिल्ली : श्रीलंकेमध्ये खेळवल्या जात असेल्या आशिया चषकातील (asia cup) सामने हे पावसामुळेच अधिक चर्चेत राहिले. असा कोणताच सामना झाला नाही ज्यात पावसाने खोडा घातला नाही. यातच आशिया चषकाच्या फायनलबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.


आशियाई क्रिकेट कौन्सिलकडून स्पष्ट करण्यात आले आहे की फायनलसाठी कोणताही रिझर्व्ह डे ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे पावसामुळे फायनलचा सामना पूर्ण झाला नाही तर दोन्ही संघाना विजयी घोषित करून ट्रॉफी शेअर केली जाईल.


आशिया चषकातील फायनलचा सामना १७ सप्टेंबरला खेळवला जाणार आहे. रिझर्व्ह डे नसल्याने मान्सूनमध्ये श्रीलंकेत या सामन्यांचे आयोजन केल्याबद्दल अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आधीच पावसामुळे खूप नुकसान झाल्याचे म्हटले आहे. पीसीबीचे म्हणणे आहे की, ते पावसाच्या मौसमामुळे ते श्रीलंकेऐवजी यूएईमध्ये सामन्यांचे आयोजन करायचे होते मात्र एसीसीचे अध्यक्ष जय शाहने यूएईच्या ऐवजी श्रीलंकेचा पर्याय निवडला.



कुठून सुरू झाला वाद?


या वादाची सुरूवात आशिया चषकाच्या यजमानपदाबाबत सुरू झाली होती. या वर्षी आशिया चषकाचे यजमानपदाचा अधिकार पाकिस्तानकडे होता. भारताने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानमध्ये संघाला पाठवण्यास नकार दिला. यानंतर यजमानपदासाठी अधिक पर्याय शोधण्याची सुरूवात झाली. अखेर यजमानपदासाठी हायब्रिड मॉडेल ठरवण्यात आले.

Comments
Add Comment

महिला क्रिकेट विश्वचषक : भारतीय संघाला विजयी हॅट्ट्रिकची संधी

विशाखापट्टणम: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक मोहिमेची सुरुवात विजयाने

IND vs AUS : फक्त १० धावा करताच रोहित शर्मा रचणार इतिहास

पर्थ/मेलबर्न: शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ १९ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन एकदिवसीय (ODI)

Asia Cup 2025 : बक्षीस मिळालेली कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकत नाही, जाणून घ्या कारण !

मुंबई : आशिया कप २०२५ मध्ये भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा याने चमकदार कामगिरी करत "प्लेअर ऑफ द टूर्नामेंट"चा किताब

IND vs PAK: वेल डन टीम इंडिया, वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला केले नेस्तनाबूत

कोलंबो: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये हा रविवार पुन्हा एकदा भारताच्या नावावर राहिला. आजच्या या सामन्यात

पाकिस्तानपुढे २४८ धावांचे आव्हान

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून

सुपरसंडे : पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात भारताची दमदार सुरुवात

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत पाकिस्तान सामन्याला सुरुवात झाली आहे. नाणेफेक जिंकून