Asia Cup 2023: फायनलसाठी रिझर्व्ह डे नाही, पावसामुळे सामना रद्द झाल्यास असा ठरणार विजेता

नवी दिल्ली : श्रीलंकेमध्ये खेळवल्या जात असेल्या आशिया चषकातील (asia cup) सामने हे पावसामुळेच अधिक चर्चेत राहिले. असा कोणताच सामना झाला नाही ज्यात पावसाने खोडा घातला नाही. यातच आशिया चषकाच्या फायनलबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.


आशियाई क्रिकेट कौन्सिलकडून स्पष्ट करण्यात आले आहे की फायनलसाठी कोणताही रिझर्व्ह डे ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे पावसामुळे फायनलचा सामना पूर्ण झाला नाही तर दोन्ही संघाना विजयी घोषित करून ट्रॉफी शेअर केली जाईल.


आशिया चषकातील फायनलचा सामना १७ सप्टेंबरला खेळवला जाणार आहे. रिझर्व्ह डे नसल्याने मान्सूनमध्ये श्रीलंकेत या सामन्यांचे आयोजन केल्याबद्दल अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आधीच पावसामुळे खूप नुकसान झाल्याचे म्हटले आहे. पीसीबीचे म्हणणे आहे की, ते पावसाच्या मौसमामुळे ते श्रीलंकेऐवजी यूएईमध्ये सामन्यांचे आयोजन करायचे होते मात्र एसीसीचे अध्यक्ष जय शाहने यूएईच्या ऐवजी श्रीलंकेचा पर्याय निवडला.



कुठून सुरू झाला वाद?


या वादाची सुरूवात आशिया चषकाच्या यजमानपदाबाबत सुरू झाली होती. या वर्षी आशिया चषकाचे यजमानपदाचा अधिकार पाकिस्तानकडे होता. भारताने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानमध्ये संघाला पाठवण्यास नकार दिला. यानंतर यजमानपदासाठी अधिक पर्याय शोधण्याची सुरूवात झाली. अखेर यजमानपदासाठी हायब्रिड मॉडेल ठरवण्यात आले.

Comments
Add Comment

WC Semifinal: स्मृती मंधानाच्या विकेटवरून वाद, मैदानावर उभे असलेले अंपायरही झाले हैराण

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी महिला क्रिकेट वनडे वर्ल्डकपचा सेमीफायनल

सेमीफायनल सामन्यात काळी पट्टी बांधून खेळतायेत खेळाडू... कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

मुंबई : आयसीसी महिला विश्वचषक २०२५ चा दुसरा उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात आहे.

सेमी फायनलसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल ; ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला वन डे वर्ल्ड कप २०२५ चा सेमी फायनल सामना नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील

Ben Austin Dies News : एक चेंडू, सराव आणि जीवन संपलं…भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यापूर्वी १७ वर्षीय क्रिकेटपटूचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

ऑस्ट्रेलिया : सध्या भारतीय संघ (Indian Team) ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून, दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी-२०

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वूमन्स सेमी फायनल सामना पावसामुळे रद्द झाल्यास फायनलचं तिकीट कोणाला मिळणार ? जाणून घ्या नियम

मुंबई : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ ची दुसरी सेमी फायनल आज नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये

भारत ऑस्ट्रेलिया दुसऱ्या T- २० मॅच च्या आधी वाईट बातमी, युवा खेळाडूचा बॉल लागून मृत्यू

मुंबई : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला भारतीय संघ कांगारूं विरुद्ध पाच टी - २० सामन्यांची मालिका खेळत आहे. या