मुंबई: भारत पहिल्यांदा पूर्णपणे एकहाती वर्ल्डकपचे आयोजन करत आहे. वर्ल्डकप २०२३ची सुरूवात ५ ऑक्टोबरपासून होत आहे. तर या स्पर्धेचा फायनला सामना १९ नोव्हेंबरला खेळवला जाईल.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या स्पर्धेआधी क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे जी क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबरपेक्षा कमी नाही. या स्पर्धेत टीम इंडिया ९ विविध शहरांमध्ये आपल्या ग्रुप स्टेजमधील ९ सामने खेळणार आहे.
वर्ल्डकप सामन्यांच्या तिकीटांची वाढती मागणी पाहता भारतीय क्रिकेट बोर्डाने या बहुप्रतिक्षित स्पर्धेसाठीच्या पुढील फेजसाठी तब्बल चार लाख तिकीटे जारी करणार आहे. बीसीसीआयकडून जारी करण्यात आलेल्या प्रेस रिलीजमध्ये हे स्पष्ट करण्यात आलेले नाही की या चार लाख तिकीटांमध्ये भारताच्या सामन्यांचे किती टक्के तिकीटे असतील. अधिकाधिक चाहत्यांना तिकीटे मिळावीत असा बीसीसीआयचा प्रयत्न आहे.
बीसीसीआयने प्रेस रिलीजमध्ये म्हटले की, जगभरातील क्रिकेट प्रेमी आता या सगळ्यात मोठ्या क्रिकेट स्पर्धेसाठी आपली जागा पक्की करू शकतात. यानुसार ८ सप्टेंबर २०२३ला भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजल्यापासून तिकीटांची विक्री सुरू होईल. क्रिकेट चाहते अधिकृत वेबसाईट https://tickets.cricketworldcup.com.वर जाऊन तिकीट खरेदी करू शकतात.
टीम इंडिया वर्ल्डकप २०२३मध्ये आपल्या अभियानाची सुरूवात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कऱणार आहे. दोन्ही संघादरम्यान हा सामना ८ ऑक्टोबरला चेन्नईमध्ये खेळवला जाईल. टीम इंडिया येथे दुसरा सामना अफगाणिस्तानविरुद्ध ११ ऑक्टोबरला दिल्लीमध्ये खेळेल. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १४ ऑक्टोबरला रंगणार आहे. १९ ऑक्टोबरला टीम इंडियाचा सामना बांगलादेशविरुद्ध होईल. टीम इंडिया आपला पाचवा सामना न्यूझीलंडविरुद्ध २२ ऑक्टोबरला खेळणार आहे. त्यानंतर २९ ऑक्टोबरला लखनऊनमध्ये भारत वि इंग्लंड सामना रंगेल. श्रीलंकेविरुद्ध भारत २ नोव्हेंबरला खेळणार आहे. त्यानंतर कोलकातामध्ये ५ नोव्हेंबरला द. आफ्रिकेविरुद्ध भारत खेळणार आहे. टीम इंडिया ग्रुप स्टेजमध्ये आपला शेवटचा सामना १२ नोव्हेंबरला नेदरलँड्सविरुद्ध खेळणार आहे.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…