World Cup 2023: भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी खुशखबर, बीसीसीआयने केली ही मोठी घोषणा

मुंबई: भारत पहिल्यांदा पूर्णपणे एकहाती वर्ल्डकपचे आयोजन करत आहे. वर्ल्डकप २०२३ची सुरूवात ५ ऑक्टोबरपासून होत आहे. तर या स्पर्धेचा फायनला सामना १९ नोव्हेंबरला खेळवला जाईल.


भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या स्पर्धेआधी क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे जी क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबरपेक्षा कमी नाही. या स्पर्धेत टीम इंडिया ९ विविध शहरांमध्ये आपल्या ग्रुप स्टेजमधील ९ सामने खेळणार आहे.



वर्ल्डकपआधी बीसीसीआयची ही मोठी घोषणा


वर्ल्डकप सामन्यांच्या तिकीटांची वाढती मागणी पाहता भारतीय क्रिकेट बोर्डाने या बहुप्रतिक्षित स्पर्धेसाठीच्या पुढील फेजसाठी तब्बल चार लाख तिकीटे जारी करणार आहे. बीसीसीआयकडून जारी करण्यात आलेल्या प्रेस रिलीजमध्ये हे स्पष्ट करण्यात आलेले नाही की या चार लाख तिकीटांमध्ये भारताच्या सामन्यांचे किती टक्के तिकीटे असतील. अधिकाधिक चाहत्यांना तिकीटे मिळावीत असा बीसीसीआयचा प्रयत्न आहे.


 


बीसीसीआयने प्रेस रिलीजमध्ये म्हटले की, जगभरातील क्रिकेट प्रेमी आता या सगळ्यात मोठ्या क्रिकेट स्पर्धेसाठी आपली जागा पक्की करू शकतात. यानुसार ८ सप्टेंबर २०२३ला भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजल्यापासून तिकीटांची विक्री सुरू होईल. क्रिकेट चाहते अधिकृत वेबसाईट https://tickets.cricketworldcup.com.वर जाऊन तिकीट खरेदी करू शकतात.



वर्ल्डकप २०२३मध्ये टीम इंडियाचे सामने


टीम इंडिया वर्ल्डकप २०२३मध्ये आपल्या अभियानाची सुरूवात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कऱणार आहे. दोन्ही संघादरम्यान हा सामना ८ ऑक्टोबरला चेन्नईमध्ये खेळवला जाईल. टीम इंडिया येथे दुसरा सामना अफगाणिस्तानविरुद्ध ११ ऑक्टोबरला दिल्लीमध्ये खेळेल. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १४ ऑक्टोबरला रंगणार आहे. १९ ऑक्टोबरला टीम इंडियाचा सामना बांगलादेशविरुद्ध होईल. टीम इंडिया आपला पाचवा सामना न्यूझीलंडविरुद्ध २२ ऑक्टोबरला खेळणार आहे. त्यानंतर २९ ऑक्टोबरला लखनऊनमध्ये भारत वि इंग्लंड सामना रंगेल. श्रीलंकेविरुद्ध भारत २ नोव्हेंबरला खेळणार आहे. त्यानंतर कोलकातामध्ये ५ नोव्हेंबरला द. आफ्रिकेविरुद्ध भारत खेळणार आहे. टीम इंडिया ग्रुप स्टेजमध्ये आपला शेवटचा सामना १२ नोव्हेंबरला नेदरलँड्सविरुद्ध खेळणार आहे.

Comments
Add Comment

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात फटकेबाजी करत इंग्लंडने मारली बाजी

कोलंबो : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतीली इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना

IPL 2026 : आयपीएल कधी सुरू होणार ? हाती आली महत्त्वाची माहिती

मुंबई : मिनी ऑक्शन झाला त्यावेळी आयपीएल २०२६ ही स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून सुरू होईल असे सूतोवाच बीसीसीआयने केले

मुंबईत कबड्डी स्पर्धांसाठी मैदाने होणार अल्प दरात उपलब्ध

महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कबड्डी हा भारतीय सांघिक खेळ असून कबड्डीची पंढरी म्हणून

Indian Deaf Cricket Team : कौतुकास्पद! भारतीय कर्णबधिर संघाच्या नावावर पहिला आशिया कप टी-२० स्पर्धेचे जेतेपद

सूर्यकुमार यादवची सेना सध्या २०२६ च्या टी-२० विश्वचषकात व्यस्त आहे. संपूर्ण देश संघाच्या विजयासाठी प्रार्थना

टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंगच्या वडिलांचं निधन

मुंबई: टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंग याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रिंकु सिंग गेल्या दोन दिवसांपासून

IND vs ZIM : भारताचा दणदणीत विजय; २२ वर्षाचा नाबाद ९७ ठोकणारा युवा खेळाडून कोण?, जाणून घ्या...

मुंबई: वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारतीय संघाने सुपर ८ फेरीमध्ये झिम्बाब्वे संघाचा पराभव केला आहे. भारताने ७२ धावांनी