World Cup 2023: भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी खुशखबर, बीसीसीआयने केली ही मोठी घोषणा

मुंबई: भारत पहिल्यांदा पूर्णपणे एकहाती वर्ल्डकपचे आयोजन करत आहे. वर्ल्डकप २०२३ची सुरूवात ५ ऑक्टोबरपासून होत आहे. तर या स्पर्धेचा फायनला सामना १९ नोव्हेंबरला खेळवला जाईल.


भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या स्पर्धेआधी क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे जी क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबरपेक्षा कमी नाही. या स्पर्धेत टीम इंडिया ९ विविध शहरांमध्ये आपल्या ग्रुप स्टेजमधील ९ सामने खेळणार आहे.



वर्ल्डकपआधी बीसीसीआयची ही मोठी घोषणा


वर्ल्डकप सामन्यांच्या तिकीटांची वाढती मागणी पाहता भारतीय क्रिकेट बोर्डाने या बहुप्रतिक्षित स्पर्धेसाठीच्या पुढील फेजसाठी तब्बल चार लाख तिकीटे जारी करणार आहे. बीसीसीआयकडून जारी करण्यात आलेल्या प्रेस रिलीजमध्ये हे स्पष्ट करण्यात आलेले नाही की या चार लाख तिकीटांमध्ये भारताच्या सामन्यांचे किती टक्के तिकीटे असतील. अधिकाधिक चाहत्यांना तिकीटे मिळावीत असा बीसीसीआयचा प्रयत्न आहे.


 


बीसीसीआयने प्रेस रिलीजमध्ये म्हटले की, जगभरातील क्रिकेट प्रेमी आता या सगळ्यात मोठ्या क्रिकेट स्पर्धेसाठी आपली जागा पक्की करू शकतात. यानुसार ८ सप्टेंबर २०२३ला भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजल्यापासून तिकीटांची विक्री सुरू होईल. क्रिकेट चाहते अधिकृत वेबसाईट https://tickets.cricketworldcup.com.वर जाऊन तिकीट खरेदी करू शकतात.



वर्ल्डकप २०२३मध्ये टीम इंडियाचे सामने


टीम इंडिया वर्ल्डकप २०२३मध्ये आपल्या अभियानाची सुरूवात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कऱणार आहे. दोन्ही संघादरम्यान हा सामना ८ ऑक्टोबरला चेन्नईमध्ये खेळवला जाईल. टीम इंडिया येथे दुसरा सामना अफगाणिस्तानविरुद्ध ११ ऑक्टोबरला दिल्लीमध्ये खेळेल. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १४ ऑक्टोबरला रंगणार आहे. १९ ऑक्टोबरला टीम इंडियाचा सामना बांगलादेशविरुद्ध होईल. टीम इंडिया आपला पाचवा सामना न्यूझीलंडविरुद्ध २२ ऑक्टोबरला खेळणार आहे. त्यानंतर २९ ऑक्टोबरला लखनऊनमध्ये भारत वि इंग्लंड सामना रंगेल. श्रीलंकेविरुद्ध भारत २ नोव्हेंबरला खेळणार आहे. त्यानंतर कोलकातामध्ये ५ नोव्हेंबरला द. आफ्रिकेविरुद्ध भारत खेळणार आहे. टीम इंडिया ग्रुप स्टेजमध्ये आपला शेवटचा सामना १२ नोव्हेंबरला नेदरलँड्सविरुद्ध खेळणार आहे.

Comments
Add Comment

IND vs WI : वेस्ट इंडिजचा सुपडा साफ! टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर ७ विकेट्सने दणदणीत विजय, सलग १०वी कसोटी मालिका खिशात!

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या (India vs West Indies) दुसऱ्या कसोटी सामन्यात शानदार विजय मिळवून

Ranji Trophy: १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी बिहार रणजी संघाचा उपकर्णधार

साकिबुल गनीकडे नेतृत्वाची धुरा मुंबई : १५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफी २०२५-२६ हंगामासाठी बिहार

कुलदीप यादवने दिल्लीमध्ये केले नको ते शतक, बनवला हा खराब रेकॉर्ड

नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाचा चायनामन फिरकी

भारताला शेवटच्या दिवशी जिंकण्यासाठी हव्या ५८ धावा

नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये कसोटी सामना सुरू आहे. या

भारताला जिंकण्यासाठी हव्या १२१ धावा

नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये कसोटी सामना सुरू आहे. या

IND vs WI:चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात, भारताला विकेटची प्रतीक्षा

नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या खेळाला