Weather: महाराष्ट्रासह या राज्यात बरसणार पाऊस, हवामान विभागाची माहिती

मुंबई : देशात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील पाच दिवसांमध्ये उत्तर, मध्य तसेच पूर्व भारतात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची स्थिती असेल. यासोबतच महाराष्ट्र, बिहार, झारखंड आणि मध्य प्रदेशात पावसाचे पुनरागमन होईल. या राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झालेला पाहायला मिळू शकतो.


उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे गुरूवारपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार होऊ शकतो. यामुळे पुढच्या ५ ते ७ दिवसांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. येत्या २ ते ३ दिवसात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.


यंदाच्या वर्षात संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा गेला. गेल्या शंभर वर्षात ऑगस्ट महिना कोरडा गेल्याची घटना घडली नव्हती. यामुळे बळीराजा चिंतेत पडला आहे. पाण्याविना पिके कशी जगणार अशी चिंता त्यांना लागली आहे. मात्र सप्टेंबरमध्ये तरी पुरेसा पाऊस पडावा अशीच आशा बळीराजा धरून आहे.



मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न गंभीर


मराठवाड्यात पावसाने पाठ फिरवल्याने तेथील पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. सप्टेंबर सुरू झाला मात्र तरीही अनेक जिल्ह्यांमध्ये पुरेसा पाऊस झालेला नाही. राज्यात बऱ्याच ठिकाणी टँकरने पाणीपुरवठ्याची सोय केली जात आहे. दरम्यान, ६ ते ९ सप्टेंबरदरम्यान मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका, मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.



Comments
Add Comment

Ajit Pawar Passed Away : 'शरद पवारांचा आधारवड गेला..'; राज ठाकरे यांनी घेतली शरद पवारांची भेट

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज म्हणजेच गुरुवारी (दि. २९ जानेवारी) त्यांच्या

अडीच वर्षांच्या संसारावर काळाचा घाला; पिंकी माळी यांचं विमान दुर्घटनेत निधन

मुंबई : विमान दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह मृत्युमुखी पडलेल्या पिंकी माळी हिचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी काही

महापालिकेत एमआयएमचे महत्व वाढले

सत्ताधारी महायुतीसाठी डोकेदुखी मुंबई :मुंबई महानगरपालिकेत भाजपा शिवसेना महायुतीची सत्ता आली असली तरी, अवघे ८

हवेची गुणवत्ता जाणून घेणे नागरिकांचा मूलभूत अधिकार

प्रदूषणाची आकडेवारी सार्वजनिक संकेतस्थळावर प्रदर्शित करण्याचे निर्देश मुंबई : मुंबई आणि मुंबई महानगर

Ajit Pawar Passed Away : अजितदादांच्या या 'खास' गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का ?

बारामतीजवळ झालेल्या अत्यंत दुर्दैवी विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचे निधन

अजित पवार यांचे अंगरक्षक विदीप जाधव यांच्या पार्थिवावर साताऱ्यात अंत्यसंस्कार

मुंबई : बारामती येथील भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्राण गमावलेले त्यांचे वैयक्तिक