Weather: महाराष्ट्रासह या राज्यात बरसणार पाऊस, हवामान विभागाची माहिती

मुंबई : देशात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील पाच दिवसांमध्ये उत्तर, मध्य तसेच पूर्व भारतात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची स्थिती असेल. यासोबतच महाराष्ट्र, बिहार, झारखंड आणि मध्य प्रदेशात पावसाचे पुनरागमन होईल. या राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झालेला पाहायला मिळू शकतो.


उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे गुरूवारपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार होऊ शकतो. यामुळे पुढच्या ५ ते ७ दिवसांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. येत्या २ ते ३ दिवसात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.


यंदाच्या वर्षात संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा गेला. गेल्या शंभर वर्षात ऑगस्ट महिना कोरडा गेल्याची घटना घडली नव्हती. यामुळे बळीराजा चिंतेत पडला आहे. पाण्याविना पिके कशी जगणार अशी चिंता त्यांना लागली आहे. मात्र सप्टेंबरमध्ये तरी पुरेसा पाऊस पडावा अशीच आशा बळीराजा धरून आहे.



मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न गंभीर


मराठवाड्यात पावसाने पाठ फिरवल्याने तेथील पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. सप्टेंबर सुरू झाला मात्र तरीही अनेक जिल्ह्यांमध्ये पुरेसा पाऊस झालेला नाही. राज्यात बऱ्याच ठिकाणी टँकरने पाणीपुरवठ्याची सोय केली जात आहे. दरम्यान, ६ ते ९ सप्टेंबरदरम्यान मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका, मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.



Comments
Add Comment

सफाईच्या कामांचे ऑडिट करण्यासाठी आयआयटी मुंबईची मदत घेणार

मुंबई: मुंबईतील नालेसफाईच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून ज्याठिकाणी मिठी नदीच्या कामासाठी नव्याने निविदा

महापालिका शालेय वस्तूंच्या खरेदीसाठी आता जेम पोर्टलवरून निविदा

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये वितरीत केल्या जाणाऱ्या २७ शालेय वस्तूंची खरेदीची प्रक्रिया रद्द करून

महालक्ष्मी येथे लहान प्राणी, पक्ष्यांच्या मृतदेहांवर अंत्यविधीची सुविधा; लहान पाळीव प्राण्यांचे रुग्णालय लवकरच होणार सुरू

मुंबई: मुंबई महानगरपालिका आणि टाटा ट्रस्ट संचालित लहान प्राण्यांच्या रुग्णालयात लहान प्राणी व पक्ष्यांच्या

दिव्यांगांना शिक्षण, कौशल्य व रोजगाराच्या संधी देत मुख्य प्रवाहात आणण्यावर भर; दिव्यांग कल्याण विभाग आता दिव्यांग सक्षमीकरण विभाग नावाने ओळखला जाणार

मुंबई: राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत

शिधावाटप विभागाच्या धडक कारवाईत वरळीतील गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड

मुंबई: वरळी परिसरात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीवर शिधावाटप विभागाने धडक

राज्यातील अनधिकृत मोबाईल टॉवर्सचे लवकर सर्वेक्षण

मुंबई : केंद्र शासनाचे धोरण आणि राज्याची गरज यांचा मेळ घालून भविष्यात महाराष्ट्राची स्वतंत्र 'टॉवर पॉलिसी' कशी