Weather: महाराष्ट्रासह या राज्यात बरसणार पाऊस, हवामान विभागाची माहिती

मुंबई : देशात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील पाच दिवसांमध्ये उत्तर, मध्य तसेच पूर्व भारतात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची स्थिती असेल. यासोबतच महाराष्ट्र, बिहार, झारखंड आणि मध्य प्रदेशात पावसाचे पुनरागमन होईल. या राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झालेला पाहायला मिळू शकतो.


उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे गुरूवारपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार होऊ शकतो. यामुळे पुढच्या ५ ते ७ दिवसांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. येत्या २ ते ३ दिवसात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.


यंदाच्या वर्षात संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा गेला. गेल्या शंभर वर्षात ऑगस्ट महिना कोरडा गेल्याची घटना घडली नव्हती. यामुळे बळीराजा चिंतेत पडला आहे. पाण्याविना पिके कशी जगणार अशी चिंता त्यांना लागली आहे. मात्र सप्टेंबरमध्ये तरी पुरेसा पाऊस पडावा अशीच आशा बळीराजा धरून आहे.



मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न गंभीर


मराठवाड्यात पावसाने पाठ फिरवल्याने तेथील पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. सप्टेंबर सुरू झाला मात्र तरीही अनेक जिल्ह्यांमध्ये पुरेसा पाऊस झालेला नाही. राज्यात बऱ्याच ठिकाणी टँकरने पाणीपुरवठ्याची सोय केली जात आहे. दरम्यान, ६ ते ९ सप्टेंबरदरम्यान मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका, मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.



Comments
Add Comment

राज्यात ५,८६६ कोटी रुपये बँकांमध्ये बेवारस

मुंबई : देशभरात सुमारे १ लाख ३५ हजार कोटी रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी विविध बँकांमध्य शिल्लक आहेत. महाराष्ट्र

मुंबई महापालिका प्रभाग आरक्षण सोडत चक्राकार पद्धतीनेच

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक २०२५ निवडणुकीकरता प्रभाग आरक्षण कार्य प्रणाली कशी

मुंबईत 'मेगा ब्लॉक'मुळे होणार 'या' मार्गांवरील प्रवाशांचे हाल!

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर देखभाल दुरुस्तीचे काम; अनेक गाड्या रद्द, वळवण्यात आल्या किंवा अर्ध्यातच स्थगित मुंबई:

मुंबईतील २९५ बेकरींवर महापालिकेचा 'प्रहार'; बेकरींना 'पीएनजी-एलपीजी' किंवा इलेक्ट्रिक ओव्हन वापरणे बंधनकारक

मुंबई: स्वच्छ, हरित इंधनाकडे (Cleaner, Green Fuels) वळण्याच्या अनिवार्य आदेशाचे पालन करण्यात अपयशी ठरलेल्या शहरातील मोठ्या

मुंबईतील कबूतर प्रकरण चिघळलं; जैन मुनींच्या वक्तव्यांवरून राजकीय वातावरण तापलं

मुंबई : मुंबईत सध्या कबूतरांमुळे उद्भवलेल्या आरोग्यविषयक समस्यांवरून मोठा गदारोळ सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर

Kabutarkhana Jain Community Dharm Sabha : कबुतर आमचं चिन्ह! जैन समाज सर्वाधिक टॅक्स भरतो, आता आमचाही पक्ष असेल; जैन मुनींची घोषणा!

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईमध्ये कबूतर खाण्याचा प्रश्न (Pigeon Feeding Issue) मोठ्या प्रमाणावर गाजत आहे. कबुतरांना