Asia cup 2023: आशिया कपमधील सुपर ४चे सामने, पाहा कुठे, कधी रंगणार सामने

मुंबई: आशिया चषकाचे (asia cup 2023) सुपर ४मधील चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. अफगाणिस्तानला श्रीलंकेकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंततर सुपर ४ मध्ये कोणते संघ एकमेकांशी भिडणार हे समोर आले आहे. तसेच टीम इंडियाचे वेळापत्रकही समोर आले आहे. टाकूया यावर एक नजर


लाहोरमध्ये मंगळवारी खेळवण्यात आलेल्या अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यात अफगाणिस्तानच्या संघाला अवघ्या २ धावांनी पराभव सहन करावा लागला आणि श्रीलंकेला सुपर ४चे तिकीट मिळाले.



या संघांशी भिडणार टीम इंडिया


आशिया चषकमधील सुपर ४चे सामने आता अधिकच रोमांचक होणार आहेत. खासकरून टीम इंडियाला सुपर ४मध्ये चांगलीच टक्कर मिळणार आहे. सुपर ४मध्ये येत्या १० सप्टेंबला भारत आपला सुपर ४मधील पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. यानंतर भारतीय संघ १२ सप्टेंबरला आपला दुसरा सामना खेळणार आहे. हा सामना श्रीलंकेविरुद्ध रंगणार आहे.


त्यानंतर भारत आपला तिसरा सामना १५ सप्टेंबरला बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. यानंतर जर टीम इंडिया या सर्व सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करत असेल आणि सामने जिंकत असेल तर ते सरळ १७ सप्टेंबरला फायनल खेळतील. हे सर्व सामने कोलंबोमध्ये खेळवले जातील.




सुपर ४चे वेळापत्रक


६ सप्टेंबर पाकिस्तान वि बांगलादेश
९ सप्टेंबर श्रीलंका वि बांगलादेश
१० सप्टेंबर भारत वि पाकिस्तान
१२ सप्टेंबर भारत वि श्रीलंका
१४ सप्टेंबर पाकिस्तान वि श्रीलंका
१५ सप्टेंबर भारत वि बांगलादेश
१७ सप्टेंबर - फायनल


हे सर्व सामने दुपारी ३ वाजल्यापासून सुरू होतील.

Comments
Add Comment

T20 World Cup 2026 Ind vs Nam: सामन्यापूर्वी भारताला मोठा झटका; बुमराच्या बॉलमुळे ईशान जखमी

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला असून गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारत

T20 World Cup 2026 Ind vs Nam: नामिबिया विरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माला आराम ?

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला असून गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारत

भारतीय संघाचा नामिबियाविरुद्ध सावध पवित्रा

नवी दिल्ली  : टी-२० विश्वचषक २०२६ च्या सलामीच्या सामन्यात अमेरिकेवर मात केल्यानंतर, भारत आता आपल्या दुसऱ्या

वेस्ट इंडीजचा इंग्लंडवर ३० धावांनी विजय

रदरफोर्डची वादळी फलंदाजी अन् मोटीची 'फिरकी' ठरली निर्णायक मुंबई  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये वेस्ट इंडीजने आपल्या

भारताला मोठा धक्का, नामिबियाविरुद्धच्या सामन्याआधी महत्त्वाचा खेळाडू रुग्णालयात

मुंबई : भारताने अमेरिकेविरुद्धचा सामना २९ धावांनी जिंकला. आता गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारताचा सामना नामिबिया

वानिंदू हसरंगा विश्वचषकातून बाहेर

कोलंबो  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये जेतेपदाचे स्वप्न पाहणाऱ्या श्रीलंकन संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा मुख्य