Asia cup 2023: आशिया कपमधील सुपर ४चे सामने, पाहा कुठे, कधी रंगणार सामने

मुंबई: आशिया चषकाचे (asia cup 2023) सुपर ४मधील चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. अफगाणिस्तानला श्रीलंकेकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंततर सुपर ४ मध्ये कोणते संघ एकमेकांशी भिडणार हे समोर आले आहे. तसेच टीम इंडियाचे वेळापत्रकही समोर आले आहे. टाकूया यावर एक नजर


लाहोरमध्ये मंगळवारी खेळवण्यात आलेल्या अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यात अफगाणिस्तानच्या संघाला अवघ्या २ धावांनी पराभव सहन करावा लागला आणि श्रीलंकेला सुपर ४चे तिकीट मिळाले.



या संघांशी भिडणार टीम इंडिया


आशिया चषकमधील सुपर ४चे सामने आता अधिकच रोमांचक होणार आहेत. खासकरून टीम इंडियाला सुपर ४मध्ये चांगलीच टक्कर मिळणार आहे. सुपर ४मध्ये येत्या १० सप्टेंबला भारत आपला सुपर ४मधील पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. यानंतर भारतीय संघ १२ सप्टेंबरला आपला दुसरा सामना खेळणार आहे. हा सामना श्रीलंकेविरुद्ध रंगणार आहे.


त्यानंतर भारत आपला तिसरा सामना १५ सप्टेंबरला बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. यानंतर जर टीम इंडिया या सर्व सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करत असेल आणि सामने जिंकत असेल तर ते सरळ १७ सप्टेंबरला फायनल खेळतील. हे सर्व सामने कोलंबोमध्ये खेळवले जातील.




सुपर ४चे वेळापत्रक


६ सप्टेंबर पाकिस्तान वि बांगलादेश
९ सप्टेंबर श्रीलंका वि बांगलादेश
१० सप्टेंबर भारत वि पाकिस्तान
१२ सप्टेंबर भारत वि श्रीलंका
१४ सप्टेंबर पाकिस्तान वि श्रीलंका
१५ सप्टेंबर भारत वि बांगलादेश
१७ सप्टेंबर - फायनल


हे सर्व सामने दुपारी ३ वाजल्यापासून सुरू होतील.

Comments
Add Comment

WC Semifinal: स्मृती मंधानाच्या विकेटवरून वाद, मैदानावर उभे असलेले अंपायरही झाले हैराण

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी महिला क्रिकेट वनडे वर्ल्डकपचा सेमीफायनल

सेमीफायनल सामन्यात काळी पट्टी बांधून खेळतायेत खेळाडू... कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

मुंबई : आयसीसी महिला विश्वचषक २०२५ चा दुसरा उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात आहे.

सेमी फायनलसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल ; ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला वन डे वर्ल्ड कप २०२५ चा सेमी फायनल सामना नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील

Ben Austin Dies News : एक चेंडू, सराव आणि जीवन संपलं…भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यापूर्वी १७ वर्षीय क्रिकेटपटूचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

ऑस्ट्रेलिया : सध्या भारतीय संघ (Indian Team) ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून, दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी-२०

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वूमन्स सेमी फायनल सामना पावसामुळे रद्द झाल्यास फायनलचं तिकीट कोणाला मिळणार ? जाणून घ्या नियम

मुंबई : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ ची दुसरी सेमी फायनल आज नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये

भारत ऑस्ट्रेलिया दुसऱ्या T- २० मॅच च्या आधी वाईट बातमी, युवा खेळाडूचा बॉल लागून मृत्यू

मुंबई : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला भारतीय संघ कांगारूं विरुद्ध पाच टी - २० सामन्यांची मालिका खेळत आहे. या