मराठ्यांना ओबीसीमधून नको, वेगळे आरक्षण द्या

  199

मराठा समाजाला आरक्षण मिळावे हा आमचा प्रामाणिक हेतू आहे मात्र त्यासाठी आमच्या कोट्यातून का ? असा सवाल करत मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण (Reservation) देण्यास ओबीसी जन मोर्चाचे अध्यक्ष प्रकाशआण्णा शेंडगे (Prakash Shendage) यांनी विरोध दर्शवला. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ओबीसीमधून (OBC Reservation) मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) दिल्यास त्या जातींवर अन्याय होईल, अशी भूमिका त्यांनी मांडली.


मराठा समाजाला खुल्या गटातून EWS चे आरक्षण मिळत आहे ते वाढवावे किंवा आवश्यक वाटल्यास घटना दुरुस्ती करून त्यांना ओबीसी प्रवर्ग वगळून स्वतंत्र प्रवर्ग तयार करून आरक्षण द्यावे. अशी मागणीही शेंडगे यांनी यावेळी केली. ओबीसी व मराठा यांची निश्चित लोकसंख्या सांगता येणार नाही. ओबीसी जनगणना झाली पाहिजे. मराठा समाजाचीही जनगणना झाली पाहिजे. सर्व डाटा एकत्र गोळा करून झाल्यावर लोकसंख्येच्या प्रमाणावर सामाजिक , शिक्षण , आर्थिक असा डाटा मिळाला की , लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाचा लाभ देता येईल, असे शेंडगे यांनी यावेळी स्पष्ट केले.


मराठा व कुणबी एकच आहेत, यावर जोपर्यंत अंतिम अहवाल येत नाही तोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न असंविधानिक पातळीवर घेऊ नये, अशीही त्यांनी मागणी केली. मराठा जातीचे ओबीसीकरण करू नये. मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊ नये. बिहार राज्याच्या धर्तीवर जतनिहाय जनगणना करून ओबीसी समाजाला न्याय द्यावा. नाहीतर मतदानाच्या मतपेटीतून या समाजाचा आक्रोश पाहावयास मिळेल व रस्त्यावरची लढाईही पाहवयास मिळेल, असा इशाराही ओबीसी जन मोर्चाचे अध्यक्ष प्रकाशआण्णा शेंडगे यांनी यावेळी दिला.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या