मराठ्यांना ओबीसीमधून नको, वेगळे आरक्षण द्या

मराठा समाजाला आरक्षण मिळावे हा आमचा प्रामाणिक हेतू आहे मात्र त्यासाठी आमच्या कोट्यातून का ? असा सवाल करत मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण (Reservation) देण्यास ओबीसी जन मोर्चाचे अध्यक्ष प्रकाशआण्णा शेंडगे (Prakash Shendage) यांनी विरोध दर्शवला. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ओबीसीमधून (OBC Reservation) मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) दिल्यास त्या जातींवर अन्याय होईल, अशी भूमिका त्यांनी मांडली.


मराठा समाजाला खुल्या गटातून EWS चे आरक्षण मिळत आहे ते वाढवावे किंवा आवश्यक वाटल्यास घटना दुरुस्ती करून त्यांना ओबीसी प्रवर्ग वगळून स्वतंत्र प्रवर्ग तयार करून आरक्षण द्यावे. अशी मागणीही शेंडगे यांनी यावेळी केली. ओबीसी व मराठा यांची निश्चित लोकसंख्या सांगता येणार नाही. ओबीसी जनगणना झाली पाहिजे. मराठा समाजाचीही जनगणना झाली पाहिजे. सर्व डाटा एकत्र गोळा करून झाल्यावर लोकसंख्येच्या प्रमाणावर सामाजिक , शिक्षण , आर्थिक असा डाटा मिळाला की , लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाचा लाभ देता येईल, असे शेंडगे यांनी यावेळी स्पष्ट केले.


मराठा व कुणबी एकच आहेत, यावर जोपर्यंत अंतिम अहवाल येत नाही तोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न असंविधानिक पातळीवर घेऊ नये, अशीही त्यांनी मागणी केली. मराठा जातीचे ओबीसीकरण करू नये. मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊ नये. बिहार राज्याच्या धर्तीवर जतनिहाय जनगणना करून ओबीसी समाजाला न्याय द्यावा. नाहीतर मतदानाच्या मतपेटीतून या समाजाचा आक्रोश पाहावयास मिळेल व रस्त्यावरची लढाईही पाहवयास मिळेल, असा इशाराही ओबीसी जन मोर्चाचे अध्यक्ष प्रकाशआण्णा शेंडगे यांनी यावेळी दिला.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा