मराठ्यांना ओबीसीमधून नको, वेगळे आरक्षण द्या

मराठा समाजाला आरक्षण मिळावे हा आमचा प्रामाणिक हेतू आहे मात्र त्यासाठी आमच्या कोट्यातून का ? असा सवाल करत मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण (Reservation) देण्यास ओबीसी जन मोर्चाचे अध्यक्ष प्रकाशआण्णा शेंडगे (Prakash Shendage) यांनी विरोध दर्शवला. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ओबीसीमधून (OBC Reservation) मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) दिल्यास त्या जातींवर अन्याय होईल, अशी भूमिका त्यांनी मांडली.


मराठा समाजाला खुल्या गटातून EWS चे आरक्षण मिळत आहे ते वाढवावे किंवा आवश्यक वाटल्यास घटना दुरुस्ती करून त्यांना ओबीसी प्रवर्ग वगळून स्वतंत्र प्रवर्ग तयार करून आरक्षण द्यावे. अशी मागणीही शेंडगे यांनी यावेळी केली. ओबीसी व मराठा यांची निश्चित लोकसंख्या सांगता येणार नाही. ओबीसी जनगणना झाली पाहिजे. मराठा समाजाचीही जनगणना झाली पाहिजे. सर्व डाटा एकत्र गोळा करून झाल्यावर लोकसंख्येच्या प्रमाणावर सामाजिक , शिक्षण , आर्थिक असा डाटा मिळाला की , लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाचा लाभ देता येईल, असे शेंडगे यांनी यावेळी स्पष्ट केले.


मराठा व कुणबी एकच आहेत, यावर जोपर्यंत अंतिम अहवाल येत नाही तोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न असंविधानिक पातळीवर घेऊ नये, अशीही त्यांनी मागणी केली. मराठा जातीचे ओबीसीकरण करू नये. मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊ नये. बिहार राज्याच्या धर्तीवर जतनिहाय जनगणना करून ओबीसी समाजाला न्याय द्यावा. नाहीतर मतदानाच्या मतपेटीतून या समाजाचा आक्रोश पाहावयास मिळेल व रस्त्यावरची लढाईही पाहवयास मिळेल, असा इशाराही ओबीसी जन मोर्चाचे अध्यक्ष प्रकाशआण्णा शेंडगे यांनी यावेळी दिला.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डॉक्टर तरुणी आणि प्रशांत बनकरमध्ये काय घडलं ?

सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालय येथे कार्यरत डॉक्टर तरुणीने एका हॉटेलच्या रुममध्ये आत्महत्या केली. या प्रकरणात

Nanded Mumbai Flight : प्रतीक्षा संपली! नांदेड-मुंबई, गोवा विमानसेवेचा 'मुहूर्त' ठरला, मुंबई, गोव्याचा प्रवास तासाभरात; पहिलं उड्डाण कधी?

नांदेड : नांदेडमधील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित नांदेड-मुंबई (Nanded-Mumbai) आणि नांदेड-गोवा

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर

कल्याण-डोंबिवलीला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचा विळखा

केडीएमसीतील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त कल्याण (प्रतिनिधी) : नुकताच दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्याचा तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला: पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना घडली,