नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघ यावेळेस आशिया चषक २०२३ (asia cup 2023) खेळत आहे. त्यानंतर भारतीय संघ मायदेशातच क्रिकेट विश्वचषक (world cup 2023) खेळणार आहे. यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात विश्वचषक खेळणार आहे.
भारताने घोषित केलेल्या १५ सदस्यीय संघात युझवेंद्र चहलला पुन्हा नाकारण्यात आले आहे. आशिया कपमध्ये ट्रॅव्हल रिझर्व्ह म्हणून सामील असलेल्या संजू सॅमसनलाही या यादीतून वगळण्यात आले आहे. तिलक वर्मालाही संधी मिळालेली नाही. आशिया चषकात एकही सामना न खेळलेल्या केएल राहुलला मात्र विश्वचषकात संधी मिळाली आहे.
वनडे वर्ल्डकप २०२३ची सुरूवात ५ ऑक्टोबरपासून होत आहे. पहिलाच सामना गतविजेता इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवला जाणार आहे. न्यूझीलंड गेल्यावेळेस वर्ल्डकपच्या फायनलमध्ये हरला होता. यावेळेस वर्ल्डकपचा फायनल सामना १९ नोव्हेंबरला अहमदाबादमध्ये खेळवला जाईल.
विश्वचषक २०२३साठी मुख्य निवडकर्ते अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्माने आज संघाची घोषणा केली.
रोहित शर्मा(कर्णधार)
विराट कोहली
जसप्रीत बुमराह
शुभमन गिल
केएल राहुल
हार्दिक पांड्या(उप कर्णधार)
श्रेयस अय्यर
रवींद्र जडेजा
इशान किशन
सूर्यकुमार यादव
कुलदीप यादव
मोहम्मद सिराज
मोहम्मद शमी
अक्षर पटेल
शार्दूल ठाकूर
टीम इंडियामध्ये सगळ्यात मोठी बातमी म्हणजे विश्वचषकाच्या संघात के एल राहुलला संधी देण्यात आली आहे. राहुलला वर्षाच्या सुरूवातीला आयपीएलमध्ये दुखापत झाली होती दरम्यान तो बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे आणि आशिया चषकातील पुढील सामन्यांमध्ये टीम इंडियासोबत असण्याची शक्यता आहे.
असे पहिल्यांदाच होत आहे की भारत एकटाच विश्वचषकाचे यजमानपद सांभाळत आहे. याआधी १९८७, १९९६ आणि २०११मध्ये वर्ल्डकपचे संयुक्त यजमानपद केले होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात १४ ऑक्टोबरला सामना खेळवला जाणार आहे.
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…