World Cup 2023: विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, राहुल-कुलदीपला संधी

Share

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघ यावेळेस आशिया चषक २०२३ (asia cup 2023) खेळत आहे. त्यानंतर भारतीय संघ मायदेशातच क्रिकेट विश्वचषक (world cup 2023) खेळणार आहे. यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात विश्वचषक खेळणार आहे.

भारताने घोषित केलेल्या १५ सदस्यीय संघात युझवेंद्र चहलला पुन्हा नाकारण्यात आले आहे. आशिया कपमध्ये ट्रॅव्हल रिझर्व्ह म्हणून सामील असलेल्या संजू सॅमसनलाही या यादीतून वगळण्यात आले आहे. तिलक वर्मालाही संधी मिळालेली नाही. आशिया चषकात एकही सामना न खेळलेल्या केएल राहुलला मात्र विश्वचषकात संधी मिळाली आहे.

वनडे वर्ल्डकप २०२३ची सुरूवात ५ ऑक्टोबरपासून होत आहे. पहिलाच सामना गतविजेता इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवला जाणार आहे. न्यूझीलंड गेल्यावेळेस वर्ल्डकपच्या फायनलमध्ये हरला होता. यावेळेस वर्ल्डकपचा फायनल सामना १९ नोव्हेंबरला अहमदाबादमध्ये खेळवला जाईल.

विश्वचषक २०२३साठी मुख्य निवडकर्ते अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्माने आज संघाची घोषणा केली.

विश्वचषकासाठी टीम इंडिया

रोहित शर्मा(कर्णधार)
विराट कोहली
जसप्रीत बुमराह
शुभमन गिल
केएल राहुल
हार्दिक पांड्या(उप कर्णधार)
श्रेयस अय्यर
रवींद्र जडेजा
इशान किशन
सूर्यकुमार यादव
कुलदीप यादव
मोहम्मद सिराज
मोहम्मद शमी
अक्षर पटेल
शार्दूल ठाकूर

केएल राहुलच्या नावाने आश्चर्य

टीम इंडियामध्ये सगळ्यात मोठी बातमी म्हणजे विश्वचषकाच्या संघात के एल राहुलला संधी देण्यात आली आहे. राहुलला वर्षाच्या सुरूवातीला आयपीएलमध्ये दुखापत झाली होती दरम्यान तो बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे आणि आशिया चषकातील पुढील सामन्यांमध्ये टीम इंडियासोबत असण्याची शक्यता आहे.

१४ ऑक्टोबरला होणार भारत-पाकिस्तान सामना

असे पहिल्यांदाच होत आहे की भारत एकटाच विश्वचषकाचे यजमानपद सांभाळत आहे. याआधी १९८७, १९९६ आणि २०११मध्ये वर्ल्डकपचे संयुक्त यजमानपद केले होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात १४ ऑक्टोबरला सामना खेळवला जाणार आहे.

Recent Posts

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २१ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…

35 minutes ago

Summer Tips : उन्हाळ्यात कशी घ्यावी डोळ्यांची काळजी, जाणून घ्या ‘या’ गोष्टी!

मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…

56 minutes ago

क्रिकेटपटूंच्या कराराची BCCI ने केली घोषणा, ३४ खेळाडूंशी करार; फक्त चार खेळाडूंचा ए+ मध्ये समावेश

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…

1 hour ago

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा २६/११ च्या हल्ल्यामागे अदृश्य हात, भाजपाच्या माधव भांडारींचा आरोप

मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…

2 hours ago

Benefits Of Watermelon : कलिंगड खा अन् हायड्रेट राहा!

ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…

2 hours ago