Asia cup: पाऊस पुन्हा बिघडवू शकतो भारताचा खेळ, नेपाळविरुद्धचा सामना रद्द झाल्यास काय होणार...

  140

नवी दिल्ली : आशिया चषक २०२३मध्ये (asia cup 2023) भारताने आपल्या अभियानाची सुरूवात केली आहे. संघाने शनिवारी २ सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळला. मात्र हा सामना पावसाने धुतला. पावसामुळे हा सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना १-१ गुण देण्यात आला.


हा सामना रद्द झाल्याने पाकिस्तानचा संघ सुपर ४ मध्ये पोहोचला आहे. ग्रुप एमध्ये पाकिस्तानचे ३ गुण आहेत. तर भारतीय संघाकडे एकच गुण आहे. नेपाळला पहिल्या सामन्यात पराभव सहन करावा लागल्याने त्यांचे एकही गुण नाहीत.



सामना रद्द झाल्यास भारतीय संघ पात्र ठरणार


आता भारतीय संघ दुसरा सामना नेपाळविरुद्ध खेळत आहे. हा सामना सोमवारी पल्लेकल येथे खेळवला जाईल. जर हा सामना भारतीय संघाने जिंकल्यास ते सुपर ४मध्ये पोहोचतील. मात्र पल्लेकलचे हवामान खूप खराब दिसत आहे.


सोमवारी पल्लेकलमध्ये ८९ टक्के पावसाची शक्यता आहे. अशातच सामना रद्द होण्याची शक्यता आहे. जर असे घडले आणि पावसामुळे सामना रद्द झाला तर काय होणार असा प्रश्न भारतीय चाहत्यांच्या मनात असेल. जर हा सामना रद्द झाला तर भारत आणि नेपाळला १-१ गुण दिला जाईल. अशा स्थितीत भारताचा संघ सुपर ४मध्ये क्वालिफाय करेल.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र