Asia cup: पाऊस पुन्हा बिघडवू शकतो भारताचा खेळ, नेपाळविरुद्धचा सामना रद्द झाल्यास काय होणार...

नवी दिल्ली : आशिया चषक २०२३मध्ये (asia cup 2023) भारताने आपल्या अभियानाची सुरूवात केली आहे. संघाने शनिवारी २ सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळला. मात्र हा सामना पावसाने धुतला. पावसामुळे हा सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना १-१ गुण देण्यात आला.


हा सामना रद्द झाल्याने पाकिस्तानचा संघ सुपर ४ मध्ये पोहोचला आहे. ग्रुप एमध्ये पाकिस्तानचे ३ गुण आहेत. तर भारतीय संघाकडे एकच गुण आहे. नेपाळला पहिल्या सामन्यात पराभव सहन करावा लागल्याने त्यांचे एकही गुण नाहीत.



सामना रद्द झाल्यास भारतीय संघ पात्र ठरणार


आता भारतीय संघ दुसरा सामना नेपाळविरुद्ध खेळत आहे. हा सामना सोमवारी पल्लेकल येथे खेळवला जाईल. जर हा सामना भारतीय संघाने जिंकल्यास ते सुपर ४मध्ये पोहोचतील. मात्र पल्लेकलचे हवामान खूप खराब दिसत आहे.


सोमवारी पल्लेकलमध्ये ८९ टक्के पावसाची शक्यता आहे. अशातच सामना रद्द होण्याची शक्यता आहे. जर असे घडले आणि पावसामुळे सामना रद्द झाला तर काय होणार असा प्रश्न भारतीय चाहत्यांच्या मनात असेल. जर हा सामना रद्द झाला तर भारत आणि नेपाळला १-१ गुण दिला जाईल. अशा स्थितीत भारताचा संघ सुपर ४मध्ये क्वालिफाय करेल.

Comments
Add Comment

आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतही जसप्रीत बुमराहच अव्वल

दुबई (वृत्तसंस्था): आयसीसीने बुधवारी त्यांची ताजी क्रमवारी जाहीर केली. भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज आणि कुलदीप

महिला क्रिकेट विश्वचषक : भारतीय संघाला विजयी हॅट्ट्रिकची संधी

विशाखापट्टणम: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक मोहिमेची सुरुवात विजयाने

IND vs AUS : फक्त १० धावा करताच रोहित शर्मा रचणार इतिहास

पर्थ/मेलबर्न: शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ १९ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन एकदिवसीय (ODI)

Asia Cup 2025 : बक्षीस मिळालेली कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकत नाही, जाणून घ्या कारण !

मुंबई : आशिया कप २०२५ मध्ये भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा याने चमकदार कामगिरी करत "प्लेअर ऑफ द टूर्नामेंट"चा किताब

IND vs PAK: वेल डन टीम इंडिया, वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला केले नेस्तनाबूत

कोलंबो: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये हा रविवार पुन्हा एकदा भारताच्या नावावर राहिला. आजच्या या सामन्यात

पाकिस्तानपुढे २४८ धावांचे आव्हान

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून