Asia Cup 2023: पावसामुळे भारताविरुद्धचा सामना रद्द झाल्याने पाकिस्तानला बंपर फायदा

Share

पल्लेकल: क्रिकेट चाहत्यांना ज्या सामन्याची आतुरतेने प्रतीक्षा होती त्या सामन्यात पावसाने खोडा घातला. भारत (india) आणि पाकिस्तान (pakistan) या महामुकाबल्यात पावसाने गोंधळ घातल्याने अखेर हा सामना रद्द करण्यात आला. ३ सप्टेंबरला हा सामना खेळवण्यात आला मात्र तो अर्धवटच.

मुसळधार पावसामुळे हा सामना रद्द झाला. सामन्यात भारतीय संघाने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर मुसळधार पाऊस सुरू झाला आणि बाबरच्या संघाला फलंदाजी करता आली नाही.

 

हा सामना रद्द झाल्याचा सगळ्यात मोठा फायदा पाकिस्तान संघाला झाला आहे. ते सुपर ४मध्ये पोहोचले आहेत. या आशिया चषकाच्या सुपर ४मध्ये पोहोचणारा पाकिस्तान पहिला संघ ठरला आहे. त्यांनी आपल्या पहिल्या सामन्यात नेपाळला २३८ धावांनी हरवले होते.

भारत आणि पाकिस्तान दोघेही आशिया चषकाच्या ग्रुप एमध्ये आहेत. तिसरा संघ नेपाळही आहे. ग्रुप सामन्यात पहिल्या सामन्यात पाकिस्तानने नेपाळला हरवले होते. आता बाबरच्या संघाचा दुसरा सामना भारताविरुद्ध होता त्यात पावसाने व्यत्यय आणला. अशातच भारत आणि पाकिस्तान संघाला १-१ गुण देण्यात आला. या पद्धतीने पाकिस्तान ३ गुणांसह सुपर ४मध्ये पोहोचले आहेत.

भारतीय संघासाठी करो वा मरो

आता भारतीय संघाला आशिया चषकात दुसरा सामना नेपाळविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना ४ सप्टेंबरला पल्लेकल येथे खेळवला जाणार आहे. हा सामना भारताने जिंकल्यास ते सुपर ४मध्येतील. हरल्यास नेपाळ बाहेर जाईल.

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

9 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

10 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

10 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

11 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

12 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

12 hours ago