Asia Cup 2023: पावसामुळे भारताविरुद्धचा सामना रद्द झाल्याने पाकिस्तानला बंपर फायदा

पल्लेकल: क्रिकेट चाहत्यांना ज्या सामन्याची आतुरतेने प्रतीक्षा होती त्या सामन्यात पावसाने खोडा घातला. भारत (india) आणि पाकिस्तान (pakistan) या महामुकाबल्यात पावसाने गोंधळ घातल्याने अखेर हा सामना रद्द करण्यात आला. ३ सप्टेंबरला हा सामना खेळवण्यात आला मात्र तो अर्धवटच.


मुसळधार पावसामुळे हा सामना रद्द झाला. सामन्यात भारतीय संघाने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर मुसळधार पाऊस सुरू झाला आणि बाबरच्या संघाला फलंदाजी करता आली नाही.






 

हा सामना रद्द झाल्याचा सगळ्यात मोठा फायदा पाकिस्तान संघाला झाला आहे. ते सुपर ४मध्ये पोहोचले आहेत. या आशिया चषकाच्या सुपर ४मध्ये पोहोचणारा पाकिस्तान पहिला संघ ठरला आहे. त्यांनी आपल्या पहिल्या सामन्यात नेपाळला २३८ धावांनी हरवले होते.


भारत आणि पाकिस्तान दोघेही आशिया चषकाच्या ग्रुप एमध्ये आहेत. तिसरा संघ नेपाळही आहे. ग्रुप सामन्यात पहिल्या सामन्यात पाकिस्तानने नेपाळला हरवले होते. आता बाबरच्या संघाचा दुसरा सामना भारताविरुद्ध होता त्यात पावसाने व्यत्यय आणला. अशातच भारत आणि पाकिस्तान संघाला १-१ गुण देण्यात आला. या पद्धतीने पाकिस्तान ३ गुणांसह सुपर ४मध्ये पोहोचले आहेत.



भारतीय संघासाठी करो वा मरो


आता भारतीय संघाला आशिया चषकात दुसरा सामना नेपाळविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना ४ सप्टेंबरला पल्लेकल येथे खेळवला जाणार आहे. हा सामना भारताने जिंकल्यास ते सुपर ४मध्येतील. हरल्यास नेपाळ बाहेर जाईल.

Comments
Add Comment

आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतही जसप्रीत बुमराहच अव्वल

दुबई (वृत्तसंस्था): आयसीसीने बुधवारी त्यांची ताजी क्रमवारी जाहीर केली. भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज आणि कुलदीप

महिला क्रिकेट विश्वचषक : भारतीय संघाला विजयी हॅट्ट्रिकची संधी

विशाखापट्टणम: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक मोहिमेची सुरुवात विजयाने

IND vs AUS : फक्त १० धावा करताच रोहित शर्मा रचणार इतिहास

पर्थ/मेलबर्न: शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ १९ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन एकदिवसीय (ODI)

Asia Cup 2025 : बक्षीस मिळालेली कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकत नाही, जाणून घ्या कारण !

मुंबई : आशिया कप २०२५ मध्ये भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा याने चमकदार कामगिरी करत "प्लेअर ऑफ द टूर्नामेंट"चा किताब

IND vs PAK: वेल डन टीम इंडिया, वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला केले नेस्तनाबूत

कोलंबो: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये हा रविवार पुन्हा एकदा भारताच्या नावावर राहिला. आजच्या या सामन्यात

पाकिस्तानपुढे २४८ धावांचे आव्हान

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून