Asia Cup 2023: पावसामुळे भारताविरुद्धचा सामना रद्द झाल्याने पाकिस्तानला बंपर फायदा

पल्लेकल: क्रिकेट चाहत्यांना ज्या सामन्याची आतुरतेने प्रतीक्षा होती त्या सामन्यात पावसाने खोडा घातला. भारत (india) आणि पाकिस्तान (pakistan) या महामुकाबल्यात पावसाने गोंधळ घातल्याने अखेर हा सामना रद्द करण्यात आला. ३ सप्टेंबरला हा सामना खेळवण्यात आला मात्र तो अर्धवटच.


मुसळधार पावसामुळे हा सामना रद्द झाला. सामन्यात भारतीय संघाने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर मुसळधार पाऊस सुरू झाला आणि बाबरच्या संघाला फलंदाजी करता आली नाही.






 

हा सामना रद्द झाल्याचा सगळ्यात मोठा फायदा पाकिस्तान संघाला झाला आहे. ते सुपर ४मध्ये पोहोचले आहेत. या आशिया चषकाच्या सुपर ४मध्ये पोहोचणारा पाकिस्तान पहिला संघ ठरला आहे. त्यांनी आपल्या पहिल्या सामन्यात नेपाळला २३८ धावांनी हरवले होते.


भारत आणि पाकिस्तान दोघेही आशिया चषकाच्या ग्रुप एमध्ये आहेत. तिसरा संघ नेपाळही आहे. ग्रुप सामन्यात पहिल्या सामन्यात पाकिस्तानने नेपाळला हरवले होते. आता बाबरच्या संघाचा दुसरा सामना भारताविरुद्ध होता त्यात पावसाने व्यत्यय आणला. अशातच भारत आणि पाकिस्तान संघाला १-१ गुण देण्यात आला. या पद्धतीने पाकिस्तान ३ गुणांसह सुपर ४मध्ये पोहोचले आहेत.



भारतीय संघासाठी करो वा मरो


आता भारतीय संघाला आशिया चषकात दुसरा सामना नेपाळविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना ४ सप्टेंबरला पल्लेकल येथे खेळवला जाणार आहे. हा सामना भारताने जिंकल्यास ते सुपर ४मध्येतील. हरल्यास नेपाळ बाहेर जाईल.

Comments
Add Comment

T20 World Cup 2026 Ind vs Nam: सामन्यापूर्वी भारताला मोठा झटका; बुमराच्या बॉलमुळे ईशान जखमी

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला असून गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारत

T20 World Cup 2026 Ind vs Nam: नामिबिया विरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माला आराम ?

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला असून गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारत

भारतीय संघाचा नामिबियाविरुद्ध सावध पवित्रा

नवी दिल्ली  : टी-२० विश्वचषक २०२६ च्या सलामीच्या सामन्यात अमेरिकेवर मात केल्यानंतर, भारत आता आपल्या दुसऱ्या

वेस्ट इंडीजचा इंग्लंडवर ३० धावांनी विजय

रदरफोर्डची वादळी फलंदाजी अन् मोटीची 'फिरकी' ठरली निर्णायक मुंबई  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये वेस्ट इंडीजने आपल्या

भारताला मोठा धक्का, नामिबियाविरुद्धच्या सामन्याआधी महत्त्वाचा खेळाडू रुग्णालयात

मुंबई : भारताने अमेरिकेविरुद्धचा सामना २९ धावांनी जिंकला. आता गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारताचा सामना नामिबिया

वानिंदू हसरंगा विश्वचषकातून बाहेर

कोलंबो  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये जेतेपदाचे स्वप्न पाहणाऱ्या श्रीलंकन संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा मुख्य