मुंबई: भारत (india) आणि पाकिस्तान (pakistan) यांच्यात होणाऱ्या हायवोल्टेज सामन्यासाठी काहीच तास शिल्लक आहेत. अशातच चाहत्यांसोबत टीम इंडियाही आपली तयारी करत आहे. सामन्याच्या एक दिवस आधी भारताचा कर्णधार रोहित शर्माने (rohit sharma) मीडियाशी बातचीत केली. यासोबतच त्याने हे ही सांगितले की त्याच्यासाठी मोठी डोकेदुखी कोणती आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषक सामन्याबाबत सातत्याने चर्चा सुरू आहेत. दोन्ही संघ या महामुकाबल्यासाठी कंबर कसून तयार आहेत. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सामन्या्च्या एक दिवस आधी मीडियाशी बातचीत केली. तसेच मीडियाच्या प्रश्नांची उत्तरे दिली. त्याने मिडल ऑर्डरमध्ये सुरू असलेल्या उलथापालथीबाबत उत्तरे दिली.
रोहित म्हणाला, मधल्या फळीत कोणाला संधी द्यावी आणि कोणाला बाहेर बसवावे हीच आमच्यासाठी मोठी डोकेदुखी आहे. कारण संघात जितके खेळाडू आहेत तितके दमदार आहेत. अशातच कोणा एकाची प्लेईंग ११मध्ये निवड करणे हे सगळ्यात मोठे आव्हान आहे.
२ सप्टेंबरला शनिवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषकाचा सामना खेळवला जाणार आहे. श्रीलंका येथील कँडी येथे हा सामना होणार आहे. सामन्यावर पावसाचे सावट आहे. हवामान विभागाने ९१ टक्के पाऊस होईळ अशी शक्यता व्यक्त केली आहे.
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…