Asia cup: रोहितसमोर हे मोठे आव्हान, म्हणाला, आमच्यासाठी ही मोठी डोकेदुखी

मुंबई: भारत (india) आणि पाकिस्तान (pakistan) यांच्यात होणाऱ्या हायवोल्टेज सामन्यासाठी काहीच तास शिल्लक आहेत. अशातच चाहत्यांसोबत टीम इंडियाही आपली तयारी करत आहे. सामन्याच्या एक दिवस आधी भारताचा कर्णधार रोहित शर्माने (rohit sharma) मीडियाशी बातचीत केली. यासोबतच त्याने हे ही सांगितले की त्याच्यासाठी मोठी डोकेदुखी कोणती आहे.


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषक सामन्याबाबत सातत्याने चर्चा सुरू आहेत. दोन्ही संघ या महामुकाबल्यासाठी कंबर कसून तयार आहेत. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सामन्या्च्या एक दिवस आधी मीडियाशी बातचीत केली. तसेच मीडियाच्या प्रश्नांची उत्तरे दिली. त्याने मिडल ऑर्डरमध्ये सुरू असलेल्या उलथापालथीबाबत उत्तरे दिली.


रोहित म्हणाला, मधल्या फळीत कोणाला संधी द्यावी आणि कोणाला बाहेर बसवावे हीच आमच्यासाठी मोठी डोकेदुखी आहे. कारण संघात जितके खेळाडू आहेत तितके दमदार आहेत. अशातच कोणा एकाची प्लेईंग ११मध्ये निवड करणे हे सगळ्यात मोठे आव्हान आहे.



भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचे सावट


२ सप्टेंबरला शनिवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषकाचा सामना खेळवला जाणार आहे. श्रीलंका येथील कँडी येथे हा सामना होणार आहे. सामन्यावर पावसाचे सावट आहे. हवामान विभागाने ९१ टक्के पाऊस होईळ अशी शक्यता व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना

रायपूरमध्ये होणार भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना

रायपूर: दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा रांचीतील पहिला सामना जिंकून भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेची दमदार सुरुवात