
मुंबई: आशिया कप २०२३ची (asia cup 2023) सुरूवात पाकिस्तानने (pakistan) विजयासह केली आहे. कर्णधार बाबर आझम आणि इफ्तिखार अहमद यांच्या शतकी खेळीच्या जोरावर तसेच दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी झालेल्या २१४ धावांच्या भागीदारीच्या जोरावर पाकिस्तानने नेपाळवर जबरदस्त विजय मिळवला. नेपाळला पाकिस्तानने तब्बल २३८ धावांच्या फरकाने हरवले.
पाकिस्तानच्या या मोठ्या विजयानंतर कर्णधार बाबर आझमने खेळाडूंचे तोंडभरून कौतुक केले आणि भारताविरुद्धच्या सामन्याबाबतही मोठे विधान केले.
भारत-पाकिस्तान सामन्यावर काय म्हणाला बाबर?
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम म्हणाला, आशिया कपच्या पहिल्या सामन्यात नेपाळविरुद्ध २३८ धावांनी मोठ्या विजयाने शनिवारी पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारताविरुद्धच्या बहुप्रतिक्षित सामन्याआधी आमच्या खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला आहे. पाकिस्तानने ग्रुप एमध्ये कमकुवत नेपाळला २३८ धावांच्या मोठ्या अंतराने हरवत आशिया कपमध्ये विजयी सुरूवात केली. पाकिस्तान आता भारताविरुद्ध सामना खेळण्यासाठी पल्लेकलमध्ये खेळण्यासाठी श्रीलंकेत जाणार आहे.
बाबर आझमने सामन्यानंतर केले हे विधान
बाबरने सामना संपल्यानंंतर म्हटले की, हासामना भारताविरुद्धच्या सामन्याआधीची चांगली तयारी होती. कारण यामुळे आमचा आत्मविश्वास उंचावला. आम्हाला प्रत्येक सामन्यात १०० टक्के द्यायचे आहेत.
पाकिस्तानचा मोठा स्कोर
पाकिस्तानने नेपाळविरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना सहा बाद ३४३ धावांचा मोठा स्कोर केला. बाबर आझमने १३१ चेंडूत १४ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने १५१ धावा केल्या.