Kishori Pednekar : किशोरी पेडणेकरांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार कायम

कोविड घोटाळा प्रकरण भोवणार; न्यायालयाचा दिलासा नाहीच...


मुंबई : कोविड काळात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सरकारने केलेला सगळा भ्रष्ट कारभार आता बाहेर येऊ लागला आहे. ईडीने चौकशीचा सपाटा लावला असून ठाकरे गटाच्या नेत्यांची यात पोलखोल होत आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच ठाकरे गटाच्या मोठ्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बॉडी बॅग (Body Bag) खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणात त्या आता आणखी अडचणीत सापडल्या आहेत. याचं कारण म्हणजे त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळून लावला आहे.


किशोरी पेडणेकर यांना मुंबई सत्र न्यायालयानं दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला. अटकेपासून संरक्षण मिळावं यासाठीचा त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळून लावला. त्यामुळं पेडणेकरांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. या प्रकरणात त्यांच्यासह ठेकेदार कंपनी असलेल्या वेदांताच्या संचालकांचाही समावेश आहे. दरम्यान, पेडणेकर यांच्यासह वेदांतानं देखील अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. पण त्यांचा अर्ज देखील कोर्टानं फेटाळून लावला.



माजी महापौरांनी काय घोटाळा केला?


ईडीच्या सूचनेनुसार मुंबईत मृत कोविड रुग्णांना वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारी बॉडीबॅग १,५०० रुपयांऐवजी ६८०० रुपयांना तत्कालीन महापौरांच्या सूचनेनुसार देण्यात आल्याचा आरोप आहे. कोविड काळात किशोरी पेडणेकर याच मुंबईच्या महापौर होत्या. त्यामुळे हा घोटाळा पेडणेकरांच्या सूचनेनुसार करण्यात आल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र